शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

समस्यांचे रूपांतर संधीत करा- नितीन गडकरी

By admin | Updated: December 26, 2015 02:44 IST

मराठा सेवा संघाच्या महाअधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी युवकांना आवाहन

अकोला : समस्या सर्वांच्याच जीवनात असतात. समस्यांना घाबरण्याऐवजी, त्यांचे रुपांतर संधीत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत केंद्रिय नागरी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी अकोल्यात व्यक्त केले. मराठा सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी महाअधिवेशनाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर होते. यावेळी मंचावर स्वागताध्यक्ष गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज संभाजी राजे, खा. संजय धोत्रे, खा. भावना गवळी, खा. प्रतापराव जाधव, उत्तरप्रदेशमधील खासदार अनुप्रिता पटेल, आ. भाऊसाहेब फुंडकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिसन बाजोरिया, आ. रणधिर सावरकर, आ. हरीष पिंपळे, आ. आकाश फुंडकर,माजी मंत्री वसंतराव धोत्रे, महापौर उज्वला देशमुख, उद्योजक सुरेश हावरे, सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहकरे आदींसह सेवा संघाचे विविध राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. मराठा सेवा संघाने सामाजिक क्षेत्रात भरपूर काम केले, आता शेतकर्‍यांच्या भल्यासाठी कामाला लागावे असे आवाहन गडकरी यांनी केले. महापुरुषांची बरोबरी आम्ही करु शकत नाही, मात्र महापुरुषांच्या विचारांचे आचारण आम्ही करु शकतो. आपला सगळा भर परमेश्‍वर अथवा सरकारवर असतो. सगळ त्यांनीच करावं ही आपली अपेक्षा असते. परंतु सरकार व परमेश्‍वरावर विश्‍वास ठेवू नका, तर त्यांचा आशीर्वाद प्राप्त करुन, स्वयंप्ररेणेने काम करा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. समाजवाद, साम्यवाद, पुंजीवाद याचा आता उपयोग नाही, तर भविष्यात रोजगार निर्माण करणारी निती आम्हाला अवलंबवावी लागेल, असे मत गडकरी यांनी मांडले. सामाजिक अर्थनिती रुजविण्यासाठी आता मराठा सेवा संघाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. टाकाऊ वस्तुपासून अनेक टिकाऊ वस्तु बनविता येतात, त्यादृष्टीने येणार्‍या काळात प्रयत्न झाले पाहिजेत, असे सांगतांना गडकरी यांनी इथेनॉल, सांडपाणी, पिकांचा कचरा, डोक्याचे केस आदी वस्तुंचा कशा पद्धतीने नागपूर परिसरात उपयोग केला, याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी खासदार भावना गवळी, अनुप्रिया पटेल, संभाजी महाराज यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून पुरुषोत्तम खेडेकर यांनी शेतकर्‍यांच्या कर्जाला मुदतवाढ देऊन त्यांचे व्याज भरण्याची तसदी शासनाने घ्यावी असे आवाहन केले. स्वागतपर मनोगत राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक मुधकर मेहकरे यांनी केले. संचालन अमोल मिटकरी यांनी केले.