शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नितेश राणेंनी मत्स्य आयुक्तांच्या अंगावर फेकले मासे

By admin | Updated: July 6, 2017 15:06 IST

मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवर नितेश राणे फारच आक्रमक झाले आहेत

ऑनलाइन लोकमतसिंधुदुर्ग, दि. 6 - मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवर नितेश राणे फारच आक्रमक झाले आहेत. मच्छीमारांच्या प्रश्नावर नितेश राणेंनी थेट सहाय्यक मत्स्य आयुक्तांनाच धारेवर धरलं आहे. यावेळी आक्रमक झालेल्या स्वाभिमान संघटनेचे नेते आणि काँग्रेस आमदार नितेश राणेंनी मत्स्य आयुक्तांवर थेट मासे फेकले आहेत. वैभववाडी-कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मालवण येथील जिल्हा कार्यालयात जाऊन सहाय्यक मत्स्य आयुक्तांची भेट घेतली होती. अचानक आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी थेट आयुक्तांच्या टेबलावर माशांची टोपली रिकामी केली. चर्चादरम्यानही नितेश राणेंनी आक्रमक पवित्र घेतल्यानं सगळेच अवाक् झाले. संताप अनावर झाल्यानंतर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी थेट मत्स्य आयुक्तांना मासे फेकून मारले. तुम्ही तुमची कामं नीट करत नाहीत, जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, पैसे खाता, तुम्ही पैसे खात असल्यामुळेच आम्हाला इथवर यावं लागलं. मच्छीमा-यांच्या प्रश्नावरून नितेश राणेंनी मत्स्य आयुक्तांना खडे बोलही सुनावले आहेत.

आणखी वाचा(शिवसेनेचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवा- नितेश राणे)(नागरिकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांविरोधात आवाज उठविणार -नितेश राणे)(तेजस एक्सप्रेसला कणकवलीत थांबा द्या: नितेश राणे)

गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी बांदा परिसरातील माकडतापग्रस्त भागाला भेट दिली होती. परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी प्रशासनावर टीका केली होती.  माकडतापाकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेसह सत्ताधाऱ्यांचा त्यांनी यावेळी समाचार घेतला होता.  माकडताप नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे कोणतेही पूर्व नियोजन नाही.  वचक नसल्यानेच प्रशासनाने  माकडतापाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले.  माकडतापाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात पसरल्यास आवश्यक लसीचा पुरवठा प्रशासनाकडे नाही, असे आरोप यावेळी राणे यांनी प्रशासनावर केले होते. सिंधुदुर्गात मंत्री आणि आमदार येतात व जातात .  भेट द्यायला हे काय पर्यटनस्थळ आहे ?, असा संतप्त  सवालही त्यांनी उपस्थित केला होता.  माकडतापाने मेलेली 50 ते 60 माकडं शेजारच्या एका राज्याने जिल्ह्यात पुरल्याने माकडतापाचा प्रादुर्भाव वाढला. पण ही माहिती प्रशासन का  लपवून ठेवतयं ?, असा हल्लाबोलही त्यांनी केला होता. 
फक्त आढावा बैठका घेऊन आणि कॅमेऱ्यासमोर प्रशासनाला दम भरून माकडताप आटोक्यात येणार नाही, असा टोलाही नितेश राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांना लगावला होता.