शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

निशांतच्या अवयवदानातून तिघांना नवे आयुष्य!

By admin | Updated: February 28, 2017 01:50 IST

समाजासमोर ठेवला आदर्श!

खामगाव, दि. २७- एकुलत्या एक मुलाच्या अवयव दानातून आई-वडिलांच्या पुढाकारातून चौघांच्या आयुष्याला संजीवनी देण्यात आली. खामगावातील निशांत बोबडे याचा पुण्यात अपघाती मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेतून सावरत कुटुंबीयांनी निशांतचे देहदान केले.२१ फेब्रुवारी रोजी खामगाव येथील निशांत नितीन बोबडे याच्या दुचाकीला अपघात होऊन डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यामुळे त्याला उपचारार्थ प्रथम मेडिपॉईंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला डेक्कन जिमखाना भागातील सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले; परंतु त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. हॉस्पिटलकडून त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. यावेळी निशांतच्या कुटुंबीयांनी धैर्याने प्रसंगाला सामोरे जात त्याच्या देहदानाची तयारी दर्शविली. त्यामुळे ताबडतोब विविध अवयव काढून त्याचे यशस्वी प्रत्यारोपण गरजुंना करण्यात आले. निशांतचे हार्ट, किडनी, लिव्हर, डोळे व त्वचा दान करण्यात आली असून, त्याच्या हार्टचे प्रत्यारोपण गंभीर हृदयविकाराने पीडित २९ वर्षीय रुग्णाच्या शरीरात करण्यात आले. मुंबई येथील कोकीळाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये हा रुग्ण भरती होता. सह्याद्री हॉस्पिटल ते पुणे एअरपोर्ट दरम्यानची संपूर्ण वाहतूक थांबवून ठेवत अँम्बुलन्सद्वारे तातडीने निशांतचे हृदय मेडिकल प्रिझर्व्हेशन सोल्यूशन बॉक्समधून २0 मिनिटात लोहेगाव एअरपोर्टवर पोहोचविण्यात आले. तेथून चार्टर्ड विमानाने ते मुंबईला कोकीळाबेन हॉस्पिटलमध्ये नेऊन तातडीने प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे २९ वर्षीय तरुणास जीवनदान मिळाले. तर लिव्हरचे प्रत्यारोपण ४६ वर्षीय इसमाच्या शरीरात करण्यात आले असून, किडन्यांमुळे ६१ वर्षीय इसमास जीवनदान मिळाले आहे. हे दोघेही पुण्यातील सहृयाद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. निशांतच्या आई संगीता ऊर्फ नेहा बोबडे यांचेही निशांतच्या देहदानात महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांनी अतिशय संयम राखीत या धाडसी निर्णयावर होकार दर्शविला. समाजासमोर ठेवला आदर्श!निशांतच्या कुटुंबीयांनी उदार भावनेतून घेतलेल्या या निर्णयामुळे तिघांना जीवनदान मिळाल्याचेही सहृयाद्रीचे विभाग प्रमुख केतन आपटे यांनी सांगितले. बोबडे कुटुंबीयांनी दु:खद प्रसंगातही मनावर दगड ठेवून घेतलेला हा निर्णय समाजासमोर आदर्श प्रस्थापित करणारा ठरला आहे.