शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्या

By admin | Updated: April 16, 2016 02:51 IST

राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासचा शेरा देऊन पुनर्परीक्षा घेण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक

मुंबई : राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासचा शेरा देऊन पुनर्परीक्षा घेण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांकडे केली आहे. इयत्ता दहावीच्या गुणपत्रिकेवर नापास ऐवजी कौशल्य विकसित असा शेरा करण्याची घोषणा तावडे यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शिक्षण प्रवाहातून बाहेर पडणाऱ्या नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग करण्याची मागणी सुळे यांनी केली आहे.राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील वार्षिक परीक्षा अंतिम टप्प्यात आहेत. दहावी व बारावीचा निकाल जास्त लागावा म्हणून काही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांत अभ्यासात कमकुवत असलेल्या नववी व अकरावी मधील विद्यार्थ्यांना नापास केले जाते. त्यामुळे नापास झालेली मुले दहावी आणि बारावीसाठी बाहेरून अर्ज करतात. मात्र त्यांतील बहुतांश विद्यार्थी पुन्हा नापास झाल्यावर शिक्षण प्रवाहातून बाहेर पडतात. जर पहिली ते आठवी व दहावीतील विद्यार्थी यांच्या गुणपत्रिकेवरील नापासाचा शेरा हद्दपार झाला आहे, तर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचीही ताबडतोब पुनर्परीक्षा घेऊन पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी सरकारने आदेश देण्याची मागणी सुळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)असे करता येईल नियोजन१ मेपर्यंत नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अपेक्षित असतो. त्यामुळे परीक्षांना नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी ४५ दिवसांचा अवधी दिला जाईल. त्यानंतर जूनच्या तिसऱ्या आठवड्यात नापास विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यात येईल, ज्याचा निकाल परीक्षा झाल्याच्या आठ दिवसांत लावला जाईल. त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच पुढील इयत्तेसाठी प्रवेश देता येईल. जेणेकरून विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाणार नाही.