शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नऊ वर्षांच्या लढाईचा करुण अंत !

By admin | Updated: July 8, 2015 02:13 IST

२००६ साली मुंबईत झालेल्या भीषण रेल्वे बॉम्बस्फोटांत जखमी झालेल्या पराग सावंत यांची ९ वर्षे मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली.

७/११ बॉम्बस्फोटातील पीडित पराग यांचा मृत्यूमुंबई : २००६ साली मुंबईत झालेल्या भीषण रेल्वे बॉम्बस्फोटांत जखमी झालेल्या पराग सावंत यांची ९ वर्षे मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली. माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात मंगळवारी सकाळी ६ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते ३६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. बुधवार, ८ जुलैला दुपारी १च्या सुमारास पराग यांच्या पार्थिवावर भार्इंदर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चर्चगेटकडून विरारकडे जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवासादरम्यान ११ जुलै २००६ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात पराग यांच्या मेंदूला जबर मार बसला होता. १२ जुलै २००६ रोजी पराग यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांच्या मेंदूवर एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन दिवसांनी त्यांच्या मेंदूवर अजून एक शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर सलग दोन वर्षे पराग कोमात होते. यानंतर आश्चर्यजनकरीत्या त्यांनी डोळे उघडले, हाक मारल्यावर मान वळवून प्रतिसाद देत होते. पण यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. ते अर्ध संवेदना जागृतावस्थेत (५ीॅी३ं३्र५ी २३ं३ी) स्थितीत होते. मंगळवार, ७ जुलैला पहाटे साडेपाच वाजता पराग यांची सामान्य तपासणी करण्यात आली, तेव्हा सर्व ठीक होते. यानंतर थोड्याच वेळात पराग यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे त्यांच्या आईला जाणवले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.