शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

..अन झाले ‘कालिदास’चे नामकरण!

By admin | Updated: July 5, 2016 13:06 IST

‘मेघदूत’सारखे अजरामर महाकाव्य लिहिणाऱ्या महाकवी कालिदासांच्या स्मृतींना आषाढाच्या पहिल्या दिवशी सर्वत्र उजाळा दिला जात असला, तरी नाशिकमध्ये मात्र खास महापालिकेच्या वतीने कालिदास दिन साजरा केला जातो

सुदीप गुजराथी
ऑनलाइन लोकमत, नाशिक : 
‘मेघदूत’सारखे अजरामर महाकाव्य लिहिणाऱ्या महाकवी कालिदासांच्या स्मृतींना आषाढाच्या पहिल्या दिवशी सर्वत्र उजाळा दिला जात असला, तरी नाशिकमध्ये मात्र खास महापालिकेच्या वतीने कालिदास दिन साजरा केला जातो. त्याला कारणीभूत आहे ती महाकवी कालिदास कलामंदिर ही वास्तू... कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी या वास्तूला स्वत:चे नाव देणे नाकारून कालिदासांच्या स्मृती जपल्याने नाशिकमध्ये दरवर्षी हा योग जुळून येतो. 
नाशिकमध्ये शालिमार परिसरात महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिर ही वास्तू उभारण्यात आली. तत्पूर्वी, सन १९५५-५६ मध्ये याच ठिकाणी तत्कालीन नगरपालिकेच्या वतीने खुले नाट्यगृह बांधण्यात आले. ते काही वर्षे व्यवस्थित चालल्यानंतर पुढे त्याची रया गेली व बंद पडले. डॉ. वसंतराव गुप्ते यांच्यासह काही लोकप्रतिनिधी व रंगकर्मींनी या जागेवर नाट्यगृह उभारण्याचा प्रस्ताव मांडला; मात्र सन १९८२ मध्ये महापालिका अस्तित्वात आल्यानंतर या कामाला गती आली. या वास्तूचे भूमिपूजन महापालिकेचे प्रथम प्रशासक सुधाकर जोशी यांच्या हस्ते झाले, तर रत्नाकर कुलकर्णी यांच्या कारकीर्दीत ते बांधून पूर्ण झाले. त्याच्या बांधकामासाठी १७५ लाख रुपये खर्च आला. गुढीपाडव्याला दि. ३० मार्च १९८७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत या नाट्यमंदिराचे उद्घाटन झाले. 
दरम्यान, या वास्तूच्या देखरेखीसाठी एक समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यात कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, शंकरराव अंधृटकर, हेमंत टकले आदिंचा समावेश होता. तर मधुकर झेंडे हे कलामंदिराचे प्रथम व्यवस्थापक होते. या वास्तूला कोणाचे नाव द्यावे, याविषयी विचारविनिमय सुरू झाला व कुसुमाग्रजांच्या नावावर शिक्कामोर्तबही झाले. कुसुमाग्रजांसारखा प्रतिभावंत कवी व साहित्यिक शहरात असताना, अन्य दुसºया कोणाच्या नावाचा विचारही करण्याची गरज नव्हती; मात्र हा प्रस्ताव ऐकल्यावर तात्यासाहेबांनी तो मोठ्या खुबीने नाकारला. ‘आपण हयात असताना एखाद्या वास्तूला आपले नाव देणे योग्य वाटत नाही. पुढे कोणी कोठे ना कोठे आपले नाव देईलच’, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यावर अन्य मान्यवरांनी आपले नाही, तर किमान आपल्या नाटकाचे- ‘नटसम्राट’चे नाव देण्याला तरी मान्यता द्यावी, अशी विनंती केली; मात्र तात्यासाहेबांनी त्यालाही नकार देत महाकवी कालिदासांचे नाव देण्याचा पर्याय सुचवला. त्यामुळे त्यांच्या नावासाठी आग्रही असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला. कालिदासांसारख्या महान कवीचे नाव देशात अन्यत्र कोठेही दिले जाईल; पण कुसुमाग्रजांचे नाव नाशिकशिवाय अन्य कोठे दिले जाणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला; मात्र कुसुमाग्रजांनी त्याला बगल देत अत्यंत विनम्रतेने आपल्या नावाच्या प्रस्तावाला नकार कायम ठेवला व अखेर या वास्तूचे ‘महाकवी कालिदास कलामंदिर’ असे नामकरण करण्यात आले.  
दरम्यान, कालिदासांच्या नावाचे कोंदण लाभल्याने आजही दरवर्षी आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदास दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने खास कार्यक्रम आयोजित केला जातो व त्यातून कालिदासांच्या स्मृतीला उजाळा मिळतो. नाट्य परिषद व अन्य संस्थांच्या वतीने नाट्यप्रयोग, काव्यवाचन, नृत्य आदि कार्यक्रम सादर केले जातात. याशिवाय शहरात अन्य संस्थांच्या वतीनेही कालिदास दिनानिमित्त गायन-वादनासह विविध उपक्रम आयोजित केले जातात.  यानिमित्त कवी कालिदासांचे स्मरण होते. अन्य शहरांत हा दिवस केवळ शाळा-महाविद्यालयांपुरताच मर्यादित राहतो. नाशकात मात्र तात्यासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे महाकवी कालिदास हे येथील सांस्कृतिक क्षेत्रात स्थान कायम ठेवून आहेत.
 
‘ते’ शिल्प पडद्याआड
महाकवी कालिदास लिखित ‘शाकुंतल’ नाटकातील दुष्यंत-शकुंतला या पात्रांचे शिल्प महाकवी कालिदास कलामंदिराच्या समोर असलेल्या विस्तीर्ण पिंपळाच्या झाडाखाली साकारण्यात आले होते. प्रख्यात शिल्पकार मदन गर्गे यांनी ते तयार केले होते; मात्र तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी हे पिंपळाचे झाड कोसळल्याने त्याखालचे शिल्पही उद्ध्वस्त झाले. त्याची पुनर्उभारणी केली जाणार होती; मात्र त्याला अद्याप मुहूर्त लागू शकलेला नाही.