शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून नऊ ठार

By admin | Updated: October 3, 2015 03:54 IST

राज्यातील बहुसंख्य भागात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. मात्र त्यात मराठवाड्यासह विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात वीज पडून नऊ जणांचा मृत्यू झाला.

मुंबई : राज्यातील बहुसंख्य भागात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. मात्र त्यात मराठवाड्यासह विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात वीज पडून नऊ जणांचा मृत्यू झाला. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातील परभणी आणि जालना जिल्ह्यात चार, विदर्भात वाशिम जिल्ह्यात मायलेकीसह तीन, नाशिकमध्ये १५ वर्षांचा एक मुलगा व नगर जिल्ह्यात एका महिलेचा वीज पडून बळी गेला. नांदेड वगळता मराठवाड्यात जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातही दोन दिवस पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये मिळून तब्बल १६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सोलापूर, कोल्हापूर, रायगडलाही पावसाने झोडपले. हस्ताच्या पावसाने रब्बी पिकाच्या आशा पल्लवित केल्यात. ठाणे जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटात अचानक पावसाने हजेरी लावली. मुंबईकरांना दिलासाअरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलामुळे कोकणसह मुंबईत शुक्रवारी दमदार सरींनी हजेरी लावली. सकाळी पडलेले ऊन आणि दुपारी दाटून आलेले ढग, अशा दुहेरी वातावरणानंतर सायंकाळी दाखल झालेल्या जलधारांनी तापलेल्या मुंबईला थंडगार केले.