शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

दीक्षाभूमीवर अवतरला निळा जनसागर

By admin | Updated: October 15, 2014 01:40 IST

१४ आॅक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवारी तब्बल दोन लाखावर निळा जनसागर

जयभीमच्या घोषणांनी निनादला परिसर नागपूर : १४ आॅक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवारी तब्बल दोन लाखावर निळा जनसागर दीक्षाभूमीवर अवतरला होता. यावेळी जयभीमच्या घोषणांनी परिसर निनादला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमीच्या दिवशी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या दिवशी दसरा होता. त्यामुळे दीक्षाभूमीवरील धम्मदीक्षेचा सोहळा दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी आयोजित केला जातो. त्या दिवशी देश-विदेशातून बौद्ध, आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. नागपुरातील उपासक-उपासिका त्यांच्या सेवेत असतात. त्यामुळे नागपूर व आजूबाजूच्या परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका १४ आॅक्टोबर रोजी धम्मदीक्षेचा सोहळा साजरा करीत असतात. गेल्या ५७ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. आज बुधवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिकांनी गर्दी केली. मध्यवर्ती स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. हातात पंचशीलेचे ध्वज घेऊन जयभीमच्या घोषणांनी तरुणाईने परिसर निनादला होता.गोव्याच्या परेश परवार यांनी घेतली बुद्ध धम्माची दीक्षा गोवा येथील परेश ऊर्फ पांडुरंग परवार या तरुणाने आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. भंते सुगत बोधी यांनी परेश यांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. परेश हे गोवा येथील पेडणे तालुक्यातील इब्रामपूर या गावचे रहिवासी आहेत. ते राज्य शासनाच्या नियोजन विभागामध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहेत. ते मागासवर्गीय समाजाचे असून त्यांच्या कुटुंबामध्ये बुद्ध धम्माची दीक्षा घेणारे ते पहिले आहेत. वयाच्या १४ व्या वर्षांपासून त्यांना बाबासाहेब समजू लागले. तेव्हापासून ते आंबेडकरी चळवळीत कार्य करीत आहे. कुटुंबातील कुणीही बौद्ध नसल्याची खंत त्याच्या मनाला नेहमी बोचत असे. कुटुंबात पत्नी व दोन मुलं आहेत. नागपुरातील बीएसएनएलचे डिव्हिजनल इंजिनियर बाबा लखोटे हे काही काळ गोव्यात नोकरीला होते. त्यावेळी त्यांच्याशी परवार यांचा संपर्क झाला. त्यांच्या प्रेरणेतून यावर्षी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचे त्यांनी निश्चित केले. १४ तारखेला कुटुंबासह दीक्षा घेण्याची त्यांची योजना होती. परंतु मुलीची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना आणता येणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी बुधवारी एकट्यानेच दीक्षा घेतली. (प्रतिनिधी)