शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

रात्रनिवाऱ्याची योजना कागदावरच

By admin | Updated: July 23, 2016 04:44 IST

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही राज्य सरकार आणि मुंबई महापालिका मुंबईत रात्र निवाऱ्यासाठी भूखंड देण्याबाबत उदासिन आहेत.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही राज्य सरकार आणि मुंबई महापालिका मुंबईत रात्र निवाऱ्यासाठी भूखंड देण्याबाबत उदासिन आहेत. त्यामुळे ही योजना केवळ कागदावरच आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीवेळी प्रशासनाने किती रात्र निवारे आणि किती कालावधीत बांधण्यात येणार, याची ठोस माहिती दिली नाही, तर थेट आदेश देण्याचा इशारा दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाने बेघरांसाठी प्रत्येक शहरात रात्र निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे. मात्र मुंबईत रात्र निवाऱ्यांची संख्या आवश्यकतेपेक्षा खूपच कमी असल्याने आणि राज्य सरकार व खुद्द महापालिकाच याबाबत उदासिन असल्याने ‘होमलेस कलेक्टीव’ या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. कांदिवली येथे रात्रनिवाऱ्यासाठी भूखंड देण्याचा विचार महापालिका करत होती. मात्र आता अन्य ठिकाणी भूखंड देण्यात येईल, असे शुक्रवारच्या सुनावणीत महापालिकेच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले. ‘ही योजना कागदावरच राहणार. तुमचे कृत्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आहे. किती रात्रनिवारे बांधणार आणि किती काळात ते काम पूर्ण कराल, याची माहिती पुढील सुनावणीत द्या. अन्यथा आम्ही थेट आदेश देऊ,’ असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी) >जनहित याचिकामुंबईत रात्र निवाऱ्यांची संख्या आवश्यकतेपेक्षा खूपच कमी असल्याने आणि राज्य सरकार व खुद्द महापालिकाच याबाबत उदासिन असल्याने ‘होमलेस कलेक्टीव’ या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.