शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

रात्रनिवाऱ्याची योजना कागदावरच

By admin | Updated: July 23, 2016 04:44 IST

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही राज्य सरकार आणि मुंबई महापालिका मुंबईत रात्र निवाऱ्यासाठी भूखंड देण्याबाबत उदासिन आहेत.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही राज्य सरकार आणि मुंबई महापालिका मुंबईत रात्र निवाऱ्यासाठी भूखंड देण्याबाबत उदासिन आहेत. त्यामुळे ही योजना केवळ कागदावरच आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीवेळी प्रशासनाने किती रात्र निवारे आणि किती कालावधीत बांधण्यात येणार, याची ठोस माहिती दिली नाही, तर थेट आदेश देण्याचा इशारा दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाने बेघरांसाठी प्रत्येक शहरात रात्र निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे. मात्र मुंबईत रात्र निवाऱ्यांची संख्या आवश्यकतेपेक्षा खूपच कमी असल्याने आणि राज्य सरकार व खुद्द महापालिकाच याबाबत उदासिन असल्याने ‘होमलेस कलेक्टीव’ या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. कांदिवली येथे रात्रनिवाऱ्यासाठी भूखंड देण्याचा विचार महापालिका करत होती. मात्र आता अन्य ठिकाणी भूखंड देण्यात येईल, असे शुक्रवारच्या सुनावणीत महापालिकेच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले. ‘ही योजना कागदावरच राहणार. तुमचे कृत्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आहे. किती रात्रनिवारे बांधणार आणि किती काळात ते काम पूर्ण कराल, याची माहिती पुढील सुनावणीत द्या. अन्यथा आम्ही थेट आदेश देऊ,’ असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी) >जनहित याचिकामुंबईत रात्र निवाऱ्यांची संख्या आवश्यकतेपेक्षा खूपच कमी असल्याने आणि राज्य सरकार व खुद्द महापालिकाच याबाबत उदासिन असल्याने ‘होमलेस कलेक्टीव’ या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.