शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआयए’चे दात ‘एनआयए’च्याच घशात

By admin | Updated: June 29, 2016 23:14 IST

साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला २०१५ मध्येच जामिनावेळी साक्षिदारांनी साक्ष फिरवली होती. तेव्हा विरोध करणारी एनआयए आता त्याच आधारावर साध्वीला जामीन देण्यासाठी कशी अनुकूल होते?

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २९ : साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला २०१५ मध्येच जामिनावेळी साक्षिदारांनी साक्ष फिरवली होती. तेव्हा विरोध करणारी एनआयए आता त्याच आधारावर साध्वीला जामीन देण्यासाठी कशी अनुकूल होते? असे ताशेरे ओढत विशेष न्यायालयाने ‘एनआयए’चे दात ‘एनआयए’च्याच घशात घातले आहेत. एनआयएने क्लीनचीट दिल्याने व तब्येतीच्या कारणास्तव साध्वीने मे महिन्यात जामिनसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. मंगळवारी विशेष न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून एनआयएला जोरदार झटका दिला. साध्वीच्या जामीन अर्जाच्या निकालाची ४० पानी प्रत बुधवारी प्रसारमाध्यामांना उपलब्ध झाली. साध्वीची जामिनावर सुटका न करण्याची अनेक कारणे न्यायालयाने दिली आहेत. एनआयएची दुटप्पी वृत्तीही यामुळे चव्हाट्यावर आली आहे. ............................................एनआयएचे दावे-साध्वीविरुद्ध साक्ष देणाऱ्या महत्त्वाच्या साक्षीदारांनी दिल्ली दंडाधिकाऱ्यांपुढे साक्ष फिरवली -या बॉम्बस्फोटाच्या केसमधील आरोपी नंबर ७, १० आणि १२ यांनी त्यांच्या कबुली जबाबात या बॉम्बस्फोटाच्या कटात साध्वीही सहभागी असल्याचे म्हटले आहे. मात्र या केसमधील आरोपींची मोक्कातून सुटका केल्याने त्यांच्या कबुलीजबाबाचा वापर साध्वीविरुद्ध केला जाऊ शकत नाही.-बॉम्बस्फोटासाठी ज्या मोटारसायकलचा वापर करण्यात आला होता, ती मोटारसायकल साध्वीने दोन वर्षांपूर्वीच रामचंद्र कलासंग्रा याला विकली होती...........................................साध्वीचा दावा-एनआयएने आरोपपत्र दाखल केल्यानंतर परिस्थितीत बदल झाला.-मोटारसायकल विकल्याने आपला बॉम्बस्फोटाशी संबंध नाही-ब्रेस्ट कॅन्सरने आजारी आहे. आरोपीलाही त्याच्या पसंतीनुसार हवे त्या रुग्णालयात उपचाराचा अधिकार आहे............................................. न्यायालयाचे निरीक्षण-एनआयएने दिलेल्या क्लीनचीट बाबत बोलताना विशेष न्या. श्रीपाद टेकाळे यांनी एनआयच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. साध्वीने २०१५ मध्ये जामीन अर्ज केला होता. अर्ज दाखल केला, तेव्हा तीन महत्त्वाच्या साक्षीदारांपैकी एका साक्षीदाराने एनआयएच्या अधिकाऱ्यापुढे साक्ष फिरवली होती. त्यानंतर साध्वीच्या जामीन अर्जावर एनआयएने उत्तर दिले. त्यावेळी दुसऱ्या साक्षीदारानेही साक्ष फिरवली होती. तर जामीन अर्जावर निकाल देण्यापूर्वी तिसऱ्या साक्षीदारानेही साक्ष फिरवली. अशावेळीही एनआयएने या तिघांच्याही साक्षीचा आधार न घेता उपलब्ध असलेल्या पुराव्यांवरून साध्वीच्या जामिनाला कडाडून विरोध केला होता. मग आता विरोध का करण्यात आला नाही? हे केवळ एनआयच्या वकिलांनाच माहित. साध्वीने एनआयएच्या क्लीनचीटच्या आधारावर जामीन अर्ज केला आहे. या कारणामुळे आम्हाला अर्जदाराची विनंती मान्य करणे कठीण आहे.-आरोपींचे कबुली जबाब वगळण्याबाबत न्यायालयाने म्हटले की, जरी आरोपींचे कबुलीजबाब वगळण्यात आले तरी अर्जदाराविरुद्ध केस होत आहे.-एनआयएच्या तपास अधिकाऱ्याने केलेल्या विश्लेषणानुसार प्रथमदर्शनी असे दिसून येते, की संबंधित अधिकाऱ्याने पुढील तपासाच्या नावाखाली काहीही तपास न करता, एटीएस अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या साक्षीच्या आधारे निष्कर्ष काढला. मात्र काढलेला निष्कर्ष या न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणांविरुद्ध आहे. निश्चितच ही ‘बदललेली परिस्थिती’ नाही. -साध्वीविरुद्ध थेट पुरावे नसल्याचे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे. परंतु, न्यायालयाने एनआयएचा हा दावा देखील फेटाळला. ‘कट रचल्याबाबत थेट पुरावे नसले तरी अप्रत्यक्ष पुरावे ग्राह्य धरले जाऊ शकतात. प्रत्येक कट सिद्ध करण्यासाठी थेट पुरावे उपलब्ध असतीलच, असे नाही म्हणूनच कायद्यात अप्रत्यक्ष पुरावे ग्राह्य धरण्याची तरतूद आहे,’ असे निरीक्षणही न्या. टेकाळे यांनी नोंदवले.-साध्वीने आणि एनआयएने मोटारसायकलवरून केलेला युक्तिवादही न्यायालयाने फेटाळला. ‘अर्जदाराच्या नावावर मोटारसायकल होती आणि तीच त्या मोटारसायकलची मालक होती. त्यामुळे तिच्याविरुद्ध केस होऊ शकते,’ असेही न्यायालयाने म्हटले. तसेच तिने तब्येतीची पुढे केलेली सबबही जामिनासाठी ग्राह्य धरण्यास न्यायालयाने नकार दिला. उच्च न्यायालयाने साध्वीवर सरकारी न्यायालयात उपचार करण्याचा आदेश दिला आहे.