शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

एनआयएची न्यायालयात धाव

By admin | Updated: April 14, 2017 02:04 IST

विशेष न्यायालयाने इसिसकडून प्रशिक्षण घेतल्याचा आरोप असलेल्या अरीब माजिदवरून युएपीए (बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायदा) हटवल्याने राष्ट्रीय तपास पथकाने

मुंबई: विशेष न्यायालयाने इसिसकडून प्रशिक्षण घेतल्याचा आरोप असलेल्या अरीब माजिदवरून युएपीए (बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायदा) हटवल्याने राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. व्ही. के. ताहिलरमाणी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एनआयएच्या अपिलावरील सुनावणी ६ जून रोजी ठेवली आहे. मात्र, उच्च न्यायालयाने विशेष एनआयए न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर स्थगिती देण्यास नकार दिला. माजिदने जेव्हा ईसीसकडून प्रशिक्षण घेतले, तेव्हा भारतीय कायद्यानुसार ईसीसला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित करण्यात आले नव्हते, असे म्हणत विशेष न्यायालयाने माजिदवरी युएपीएअंतर्गत नोंदवण्यात आलेले गुन्हे रद्द केले.एनआयएच्या म्हणण्यानुसार, कल्याण-डोंबिवलीमध्ये राहणारा माजिद आणि आणखी तीन युवक तीर्थयात्रेला जाण्याचा बहाण करून इसिसकडून प्रशिक्षण घेण्यासाठी गेले. नोव्हेंबर २०१४ मध्ये माजिद भारतात परत येत असताना त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर युएपीएचे कलम १६ (दहशतवादी कृत्य केल्याबद्दल शिक्षा), कलम १८ (कट रचल्याबद्दल शिक्षा) व भारतीय दंडसंहिता कलम १२५ (देशाविरुद्ध युद्ध पुकारणे) अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले. विशेष न्यायालयाने माजिदची युएपीए कलम २० मधून सुटका केल्याने एनआयने या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एनआयएनच्या म्हणण्यानुसार, युनायटेड नेशन्स सेक्युरिटी कौन्सिलने २०१४ मध्ये ईसीसीवर बंदी घालतली आहे. युएन सदस्यांमध्ये भारताचाही समावेश असल्याने ही बंदी भारतासाठीही लागू होते. त्यामुळे माजिदवर युएपीएच्या कलम २० अंतर्गत नोंदवलेला गुन्हा रद्द करणे चुकीचे आहे. (प्रतिनिधी)