शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण शुल्क कायद्याची अंमलबजावणी पुढील वर्षी

By admin | Updated: June 10, 2014 01:39 IST

समित्यांच्या स्थापनेची प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले. भाजपाचे देवेंद्र फडणवीस

दोन महिन्यांत समित्यांची स्थापना
मुंबई : शिक्षण शुल्क कायद्याची अंमलबजावणी 2क्15-16 च्या शैक्षणिक वर्षापासून केली जाईल. त्यासाठी आवश्यक असलेल्या समित्यांच्या स्थापनेची  प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले. 
भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा मूळ प्रश्न विचारला होता. सभागृहाच्या सदस्यांनी अत्यंत मेहनत करून कायद्याचे प्रारूप तयार केले. त्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा हेच होते. विधिमंडळाने त्यास मंजुरी दिली. आता पालक आणि पाल्यांच्या हितासाठी या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. 
या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक समिती, निवृत्त जिल्हा न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखालील समिती अशा समित्यांची स्थापना करावी लागणार आहे. एवढेच नव्हे तर शुल्क निश्चितीची माहिती शाळांना सहा महिने आधी देणो आवश्यक आहे हे लक्षात घेता आगामी सत्रपासून कायद्याची अंमलबजावणी करण्यात अडचणी असल्याचे दर्डा यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आपला विभाग आग्रही असल्याचे ते म्हणाले. 
समित्यांची स्थापना दोन महिन्यांच्या आत करण्यास काहीही हरकत नसावी, असे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. त्यावर तशी कार्यवाही केली जाईल, असे दर्डा यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)
 
कारखाने तीन हजार; निरीक्षक केवळ पाच
1एकटय़ा कल्याण विभागात 2 हजार 935 कारखाने असून त्यांची तपासणी करण्याचे काम केवळ पाच अधिका:यांच्या भरवश्यावर सुरू असल्याची बाब आज विधानसभेत समोर आली. या अधिका:यांच्या संख्येत वाढ करावी, अशी मागणी आपल्या विभागाने सामान्य  प्रशासन विभागाकडे केली आहे, अशी माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
2भाजपाचे विष्णू सावरा यांनी याबाबतचा मूळ  प्रश्न विचारला होता. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, जव्हार, वाडा, मोखाडा, शहापूर आणि भिवंडी परिसरात हे कारखाने आहेत. 
3या परिसरातील 2935 कारखान्यांपैकी 23 अतिधोकादायक आणि 249 रासायनिक आहेत. येथील कारखान्यांमध्ये एप्रिल 2क्13 ते एप्रिल 2क्14 या काळात 26 कामगारांचा विविध अपघातांत मृत्यू झाला असे मुश्रीफ यांनी सांगितले.