शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत ४० कोटी वृक्ष लावणार

By admin | Updated: June 30, 2016 04:05 IST

राष्ट्रीय वन धोरणानुसार राज्यात किमान ३३ टक्के वनाच्छादित क्षेत्र असणे अपेक्षित आहे.

जीवन रामावत,

नागपूर- राष्ट्रीय वन धोरणानुसार राज्यात किमान ३३ टक्के वनाच्छादित क्षेत्र असणे अपेक्षित आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात केवळ २० टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे. या पार्श्वभूमीवर पुढील तीन वर्षांत ४० कोटी वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) सर्जन भगत यांनी सांगितले.येत्या १ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी रोपट्यांची लागवड केली जाणार आहे. यानिमित्त ‘लोकमत’ प्रतिनिधीने पीसीसीएफ भगत यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राज्यातील २० टक्के वनाच्छादित असले तरी, यापैकी केवळ १६ टक्के क्षेत्रावरच घनदाट जंगल असून, इतर चार टक्के हा विरळ आहे. त्यामुळे या चार टक्के क्षेत्रावरील जंगल अधिक घनदाट करून, राज्यातील वनाच्छादित क्षेत्र वाढविण्यासाठी दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे भगत म्हणाले. या दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात वन विभागाने १ कोटी ५० लाख वृक्ष लागवडीची जबाबदारी स्वीकारली आहे. उर्वरित ५० लाख वृक्ष लागवड ही शासकीय विभाग, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केली जाणार आहे. तसेच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तीन कोटी वृक्ष लागवडीची नोंदणी वृक्ष लागवडीसाठी वन विभाग पूर्णत: सज्ज झाला आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी २५ जूनपर्यंत आॅनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. तब्बल तीन कोटी वृक्ष लागवडीची नोंदणी झाली असल्याचे भगत यांनी सांगितले. तसेच राज्यभरात तीन कोटी एक लाख खड्डे खोदून तयार असल्याचेही ते म्हणाले. पुढील तीन वर्षांचा ‘प्लॅन’ तयारराज्य शासन आणि वन विभागाने राज्यातील ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित करण्यासाठी पुढील तीन वर्षांत ४० कोटी वृक्ष लागवड करण्याचे लक्ष्य निश्चित केले असल्याचे भगत यांनी सांगितले. त्यानुसार पुढील वर्षी आणखी तीन कोटी वृक्षांची लागवड केली जाणार असून, त्यानंतर २०१८मध्ये १८ कोटी व २०१९ मध्ये २० कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी आतापासूनच वन विभागाने नियोजन सुरू केले असून, नर्सरी तयार केल्या जाणार आहेत. पुढील तीन वर्षांत ४० कोटी वृक्ष लागवड झाली, तरी बऱ्यापैकी वनाच्छादित क्षेत्र तयार होईल, असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला. प्रथमच आॅनलाइन रिपोर्टिंग या मोहिमेत प्रथमच अत्याधुनिक साधनसुविधांचा उपयोग केला जात आहे. आजपर्यंत वृक्ष लागवड ही केवळ कागदावरच होत होती. परंतु यावेळी तो सर्व प्रकार टाळण्यासाठी ‘आॅनलाईन रिपोर्टिंग’ केले जात आहे. शिवाय यात झाड लावण्यात येणाऱ्या खड्ड्याच्या छायाचित्रासह ते झाडे कोठे लावण्यात आले, त्याचे जीपीएस लोकेशन व लावण्यात आलेल्या झाडाचे छायाचित्र घेतले जाणार आहे. अशाप्रकारे १ जुलै रोजी सकाळी ६ वाजतापासून तर रात्री ८ वाजतापर्यंत प्रत्येक दोन तासांत किती वृक्ष लागवड झाली, याचा डाटा गोळा केला जाणार आहे. एक हजार झाडांसाठी एक व्यक्तीलागवड झालेल्या एकूण झाडांपैकी किमान ८० टक्के झाडे जगविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार वृक्ष लागवडीनंतर प्रत्येक एक हजार झाडामागे एक व्यक्ती अशी जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. शिवाय इतर शासकीय यंत्रणा आणि खासगी संस्थांनीसुद्धा त्यांनी लावलेली झाडे जगविण्याची स्वत: जबाबदारी स्वीकारली पाहिजे. अशाप्रकारे पुढील चार वर्षांपर्यंत या सर्व झाडांचे मॉनिटरिंग होणार असल्याचेही पीसीसीएफ भगत यांनी सांगितले.