शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

सामाजिक बांधिलकी जपत उमविचे पुढचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 08:19 IST

शहरापासून जवळ असूनही सोयी - सुविधांपासून कोसो दूर असलेल्या रामनगरसाठी सामाजिक बांधिलकी जपत जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने एक पुढचे उचलले आणि इथल्या लोकांनी विकासाचा सूर्य पाहिला

देवेंद्र पाठक / ऑनलाइन लोकमत
रामनगरची विकासाकडे वाटचाल : विद्यापिठाने दिली चक्की, सौरदिवे आणि संगणक 
धुळे, दि. 17 - रामनगर हा धुळे तालुक्यातील छोटा पाडा. शहरापासून जवळ असूनही सोयी - सुविधांपासून कोसो दूर. स्वातंत्र मिळूनही पारतंत्र्यात असल्याची लोकांची भावना. सामाजिक बांधिलकी जपत जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने एक पुढचे उचलले आणि इथल्या लोकांनी विकासाचा सूर्य पाहिला... त्यांच्या चेहऱ्यावर तोच आनंद अनुभवास येत आहे. 
 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ‘स्मार्ट व्हीलेज’ अतंर्गत खान्देशातील पाच गावे दत्तक घेतली. यात धुळे तालुक्यातील नगाव गु्रप ग्रामपंचायतीत असलेल्या रामनगर या गावाचाही समावेश आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. सुधीर मेश्राम यांनी प्रयत्न सुरु केले. स्मार्ट व्हीलेज ही त्यांचीच एक संकल्पना. 
 
रामनगर गावात केवळ ५० घरे आहेत. भिल्ल समाजाची इथे वस्ती. लहान मोठे धरुन आजच्या स्थितीत गावाची लोकसंख्या १२० एवढी. 
गावात कुठल्याही सुविधा नव्हत्या़ एवढेच काय तर दळण दळण्यासाठी चक्की सुध्दा नव्हती. नागरिक किंवा महिलांना गावापासून ५ ते ६ किमी अंतरावर असलेल्या तिसगाव ढंढाणे अथवा वडेल या ठिकाणी दळणासाठी पायपीट करावी लागत होती. तिथून पुन्हा पायी गावाकडे येत असताना दमछाक व्हायची ती वेगळी. पावसाळ्यात तर खूपच हाल व्हायचे. 
नेमकी ही समस्या जाणून विद्यापीठाने इथे दळणासाठी चक्की देण्याचे ठरविले. त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली. गावातीलच सुरेश रुपला ठाकरे यांच्यावर चक्कीची जबाबदारी सोपविण्यात आली. ते नियमित डिझेल आणतात आणि चक्की चालवितात़ या चक्कीमुळे आमचा वनवास संपला असल्याची नागरिकांची भावना आहे. सुरेश यांना यानिमित्ताने रोजगार मिळाला आणि गावातील नागरिकांना दिलासा. 
सौरदिव्यामुळे अंधार दूर
गावात वीज पुरवठा हा प्रकारच नव्हता. त्यामुळे सायंकाळ झाली की अंधारच अंधार. गाव अगदी जंगलात आहे की काय, अशी परिस्थिती व्हायची. नगाव ग्रुप ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करुनही उपयोग होत नव्हता. 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने याकडे लक्ष दिले. विद्यापीठाच्या माध्यमातून गावात दोन सौरदिवे बसविण्यात आले. सौर दिव्यांच्या लख्ख प्रकाशात गावातील लोकांचे चेहरेही उजळून निघाले. 
 
मुलांना मिळाले संगणक 
गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे़ पहिली ते चौथीचे मिळून विद्यार्थी पटसंख्या केवळ दहा. वर्गखोली एकच असली तरी त्यांना शिक्षण मात्र नियमित देण्याचा प्रयत्न सुरु आहे़ काळ झपाट्याने बदलत असताना याठिकाणी असलेल्या मुलांना देखिल शिक्षणाच्या नव्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न विद्यापीठाने सुरु केला. मग शाळेला संगणक देण्याचे ठरले. पण गावात विजपुरवठा नाही मग संगणक चालणार कसे. यावरही विद्यापीठाने सौरउर्जेचा पर्याय शोधला. 
शाळेच्या छतावर सौरउर्जेचो पॅनल बसविण्यात आले. त्यावर दिवे आणि तीन संगणक सुरु असतात. मुलांना संगणकाची ओळख करुन दिली जात आहे़ मुलेही हसत-खेळत संगणक हाताळणी करत आहेत़ संगणकावर चित्रे काढत आहेत़ आता तर लवकरच वर्गात ई-लर्निंग सुरु करण्याचा मानस प्राथमिक शिक्षक अशोक सोनवणे यांनी बोलून दाखविला.