शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

‘मेक इन इंडिया’तील पुढचे ठिकाण औरंगाबाद

By admin | Updated: August 22, 2015 00:30 IST

मेक इन इंडिया या पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमातहत औरंगाबाद हे पुढचे ठिकाण असेल. शेंद्रा-बिडकीनचा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर

मुंबई : मेक इन इंडिया या पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमातहत औरंगाबाद हे पुढचे ठिकाण असेल. शेंद्रा-बिडकीनचा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पात समावेश असल्याने आगामी काळात औरंगाबाद हे गुंतवणुकीचे केंद्र म्हणून उदयास येईल. स्मार्ट सिटी प्रस्तावातहत डीएमआयसी प्रकल्पावर भर दिला जाण्याची शक्यता आहे, असे नागरी विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पासाठी महाराष्ट्रातून निवड कण्यात आलेल्या दहा शहरांसाठी राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांची तज्ज्ञ सल्लागार (मेन्टॉर) म्हणून नियुक्ती केली असून औरंगाबादसाठी अपूर्वा चंद्रा (उद्योग आणि ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिव) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्मार्ट सिटीसाठी देशभरातील अन्य ९० शहरांसोबत राज्यातील दहा शहरे असल्याने तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्रातून मुंबई, ठाणे, पुणे-पिंप्री-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि औरंगाबादची निवड करण्यात आली. स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी या शहरांना स्वत:ची योजना तयार करावी लागणार आहे, त्यासाठी अनुभवी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे नागरी विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी सांगितले.नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना संबंधित शहराची सखोल माहिती असावी आणि त्यांनी यापूर्वी संबंधित शहरात किंवा महापालिकेत काम केलेले असावे, याची दक्षता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे, असे म्हैसकर यांनी सांगितले.दहा शहरांचे मेन्टॉर....अपूर्वा चंद्रा-औरंगाबाद, नितीन करीर-पुणे-पिंप्री-चिंचवड, अजय मेहता-मुंबई, मनूकुमार श्रीवास्तव-ठाणे, संजय भाटिया-नवी मुंबई, यू.पी.एस. मदान-कल्याण-डोंबिवली, प्रवीण परदेशी- नागपूर, मिलिंद म्हैसकर-सोलापूर.देशभरात १०० स्मार्ट शहरे विकसित करण्यासाठी केंद्राची ४८ हजार कोटी रुपये खर्चाची योजना आहे.