शहरं
Join us  
Trending Stories
1
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
2
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
3
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
4
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
5
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
6
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
7
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
8
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
9
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
10
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
11
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
12
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
13
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
14
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
15
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
16
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
17
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
18
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
19
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
20
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
Daily Top 2Weekly Top 5

मूळ मुद्द्यांना बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 01:28 IST

मुंबईकरांना नेमके काय हवे आहे, हे एक तर राजकीय पक्षांना धड कळलेले नाही किंवा कळूनही न कळल्याचे नाटक राजकीय पक्ष करीत आहेत

मुंबईकरांना नेमके काय हवे आहे, हे एक तर राजकीय पक्षांना धड कळलेले नाही किंवा कळूनही न कळल्याचे नाटक राजकीय पक्ष करीत आहेत, हेच राजकीय पक्षांचे वचननामे, जाहीरनामे वगैरे वाचल्यावर ठळकपणे जाणवते. मुंबईकरांच्या तीन मुख्य अपेक्षा आहेत. १) निवारा, २) वाहतूक व्यवस्था आणि ३) उत्तम नागरी सेवा. राजकीय पक्षांनी याचे सूतोवाच केलेले नाहीत, असे नाही. मात्र, राजकीय पक्षांचा पवित्रा हा ‘प्रलोभने’ दाखवण्याचा आहे. मुंबईतील कुठल्याही तरुणीने आत्मरक्षण प्रशिक्षण केंद्राची मागणी शिवसेनेकडे केलेली नाही किंवा मुंबईकरांची आरोग्यतपासणी मोफत करून देण्याची अपेक्षा कुणीही भाजपाकडे केलेली नाही. दिलेल्या आश्वासनांपैकी ३० टक्के आश्वासने ही पाच वर्षांत यापूर्वी सुुरू असलेल्या केंद्र, राज्य व महापालिकांच्या प्रकल्पांतून पूर्ण होत असतात. त्यामुळे अशी पूर्ण न होणारी वायफळ आश्वासने देण्याचा वर्षानुवर्षांचा प्रघात आहे.निवाऱ्याचा मुद्दा घेतला, तर या मुंबईतील ५२ लाख लोक झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्य करतात. झोपड्यांनी मुंबईतील व्यापलेली जमीन ही केवळ ८ टक्के आहे. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढवून त्यांना घरे देण्याचा कळवळा मायबाप सरकार दाखवत आहे. मात्र, यामुळे झोपडपट्ट्यांनी व्यापलेल्या त्या जमिनीवरील लोकसंख्येची घनता झपाट्याने वाढत आहे. आपल्याकडे मध्यमवर्गीयांची प्रतिमाणशी जमीनधारणा ८० चौ.फू. आहे. झोपडपट्टीत ती २० चौ.फू.देखील नाही. कोळीवाडे-गावठाणे यांच्या विकासाची भाषा सर्व पक्षांनी केली आहे. मात्र, त्यांच्या विकासाचा प्रश्न सीआरझेडमध्ये अडकला आहे. कायद्याने विकासाची परवानगी मिळत नसल्याने अनेकांनी गावठाणे व कोळीवाड्यांत एक किंवा दोन मजली बेकायदा बांधकामे करून टाकली असून, ती नियमित करणे अशक्य आहे. शहरातील ३० टक्के जमीन ही सीआरझेड, इको सेन्सेटिव्ह झोन अथवा ना विकास क्षेत्र यामध्ये येते. विकास आराखड्यात आपण या ३० टक्के जमिनीचा विचारही करत नाही. परिणामी, भूमाफिया या जमिनीवर अतिक्रमणे करून मोकळे होतात. वाहतूक व्यवस्था या शहरात भीषण अवस्थेत आहे. रेल्वेला लटकून प्रवास करताना पडून मरा किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रस्तेमार्गे जाताना तासन्तास रखडपट्टी करून घ्या, हे दोनच पर्याय मुंबईकरांना दिलेले आहेत. १९६७ साली मंजूर झालेल्या विकास आराखड्यात मेट्रो रेल्वेचा उल्लेख आपण केला होता. आजमितीस आपण मेट्रोचे दोन-चार टक्क्यांचे जाळे उभे केलेले नाही. तिसरा मुद्दा हा सक्षम सेवांचा आहे. मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इतक्या वर्षांत झालेली नाही. माणशी १३५ लीटर पाणी दरदिवशी सोसायट्यांमध्ये, तर केवळ ४५ लीटर पाणी दरदिवशी झोपडपट्ट्यांमध्ये दिले जाते. डॉ. माधव चितळे यांच्या समितीने मध्य वैतरणा, गारगाई, पिंजाळ, काळू वगैरे नद्यांवर धरणे उभारण्याचे वेळापत्रक २५ वर्षांपूर्वी आखून दिले होते. गतवर्षी रडतखडत आपण मध्य वैतरणा धरण पूर्ण केले. शहरात दररोज ११ हजार मे.ट. कचरा निर्माण होतो. त्यापैकी ६ हजार मे.ट. कचऱ्यावर प्रक्रिया करणे २०१८ पर्यंत आपल्याला शक्य होईल, असे महापालिकेने न्यायालयात सांगितल्याने, नव्या बांधकामावर बंदी आलेली आहे. शहरातील ७० टक्के मैला हा समुद्रात सोडला जातो. त्यापैकी ३० टक्के प्रक्रिया न करता सोडला जातो. पावसाळ्यात पुराचे पाणी साचून शहर ठप्प होते. त्याकरिता, २५ वर्षांपूर्वी तयार केलेल्या ब्रिमस्टोव्हॅड प्रकल्पात तासाला १०० मिमी पाऊस झाला, तरी मुंबई तुंबणार नाही, अशी क्षमता आपल्याला प्राप्त करायची होती. अजून आपण ५० मिमी पाऊस झाला, तरी मुंबई तुंबणार नाही, ही क्षमताही साध्य केलेली नाही. फेरीवाल्यांचा प्रश्न जटील असून, एक लाख फेरीवाल्यांना परवाने दिले, तर महापालिकेला ७०० कोटींचे उत्पन्न प्राप्त होईल, हा अहवाल दप्तरी असतानाही, अद्याप ही समस्या राजकीय हस्तक्षेपामुळे सुटलेली नाही. मुंबईकरांना मालमत्ताकरात माफी हवी आहे की, लोकोत्तर पुरुषांची स्मारके, याचा अंदाज न घेता वचननामे, जाहीरनामे तयार केले आहेत. यापूर्वी जे पक्ष काँग्रेसला निवडणुकीपूर्वी लोकानुनयी व स्मारकांसारखी भावनिक आश्वासने दिल्याबद्दल दात काढून हसत होते, ते वेगळे काहीच करीत नाहीत, हेच कटुसत्य आहे.- संदीप प्रधान