शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कारभारी नवे; प्रश्न जुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 01:42 IST

पारदर्शक कारभाराची हमी देणाऱ्या भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता महापालिकेत आली आहे.

पिंपरी : पारदर्शक कारभाराची हमी देणाऱ्या भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता महापालिकेत आली आहे. अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, पवना जलवाहिनी, पवनासुधार प्रकल्प, शास्तीकरमाफी, मेट्रो, बीआरटी आदी प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आव्हान नवीन कारभाऱ्यांसमोर असणार आहे. आता केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लागण्याची आशा नागरिकांनाआहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक नुकतीच झाली. त्यात भाजपाला अभूतपूर्व यश मिळालेले आहे. महापालिकेची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी विविध राजकीय पक्षांसमोरील आव्हाने काय यावर प्रकाश टाकला होता. भय आणि भ्रष्टाचारमुक्तशहराचा नारा देणाऱ्या भाजपाला महापालिकेच्या सत्तेची सूत्रे दिली आहेत. भाजपाचे ७७ नगरसेवक सभागृहात असणार आहेत. नवीन कारभाऱ्यांसमोर रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेणे हे प्रमुख आव्हान असणार आहे. पार्लमेंट ते पालिका ही विकासाची गंगा पोहोचविण्याचे प्रमुख आव्हान आहे. महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न असून एकूण चार लाख बांधकामांपैकी निम्म्याहून अधिक बांधकामे अनधिकृत आहेत. बांधकामे नियमितीकरणाचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाने या संदर्भातील अहवाल न्यायालयासमोर ठेवण्यात आला आहे. तो प्रश्न सुटलेला नाही.पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना बंदिस्त जलवाहिनीचे काम मावळात भाजपाने केलेल्या विरोधामुळे गेल्या सात वर्षांपासून रखडलेले आहे. याबाबत नवीन कारभारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहेत. तसेच नदीसुधार प्रकल्पाचा आराखडा तयार झाला असला, तरी त्यास केंद्राने आणि राज्याने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प कागदावरच आहे. तसेच काळेवाडी ते देहू-आळंदी रस्ता, निगडी ते दापोडी हे बीआरटी मार्गाचे प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना शास्ती लावण्यात येणार नाही. मात्र, पाचशेच्या आत घरांची संख्या अत्यंत कमी आहे. (प्रतिनिधी)>विस्तार : निगडीपर्यंत मेट्रोची मागणी स्वारगेट ते पिंपरी हा मेट्रोचा पहिला टप्पा शासनाने मंजूर केला आहे. मात्र, मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी अशी पिंपरी-चिंचवडकरांची मागणी आहे. ती कधी पूर्ण होणार याबाबत प्रश्न आहे. तसेच सेक्टर २२ मधील रखडलेला घरकुल प्रकल्प पूर्णत्वास कधी जाणार असे प्रमुख प्रश्न शहरवासीयांसमोर आहे. एकहाती सत्ता मिळाल्यानंतर अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, पवना जलवाहिनी, पवनासुधार प्रकल्प, शास्तीकर माफ करणे, मेट्रो, बीआरटी आदी प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आव्हान आहे.