शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कारभारी नवे; प्रश्न जुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 01:42 IST

पारदर्शक कारभाराची हमी देणाऱ्या भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता महापालिकेत आली आहे.

पिंपरी : पारदर्शक कारभाराची हमी देणाऱ्या भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता महापालिकेत आली आहे. अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, पवना जलवाहिनी, पवनासुधार प्रकल्प, शास्तीकरमाफी, मेट्रो, बीआरटी आदी प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आव्हान नवीन कारभाऱ्यांसमोर असणार आहे. आता केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लागण्याची आशा नागरिकांनाआहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक नुकतीच झाली. त्यात भाजपाला अभूतपूर्व यश मिळालेले आहे. महापालिकेची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी विविध राजकीय पक्षांसमोरील आव्हाने काय यावर प्रकाश टाकला होता. भय आणि भ्रष्टाचारमुक्तशहराचा नारा देणाऱ्या भाजपाला महापालिकेच्या सत्तेची सूत्रे दिली आहेत. भाजपाचे ७७ नगरसेवक सभागृहात असणार आहेत. नवीन कारभाऱ्यांसमोर रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेणे हे प्रमुख आव्हान असणार आहे. पार्लमेंट ते पालिका ही विकासाची गंगा पोहोचविण्याचे प्रमुख आव्हान आहे. महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न असून एकूण चार लाख बांधकामांपैकी निम्म्याहून अधिक बांधकामे अनधिकृत आहेत. बांधकामे नियमितीकरणाचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाने या संदर्भातील अहवाल न्यायालयासमोर ठेवण्यात आला आहे. तो प्रश्न सुटलेला नाही.पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना बंदिस्त जलवाहिनीचे काम मावळात भाजपाने केलेल्या विरोधामुळे गेल्या सात वर्षांपासून रखडलेले आहे. याबाबत नवीन कारभारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहेत. तसेच नदीसुधार प्रकल्पाचा आराखडा तयार झाला असला, तरी त्यास केंद्राने आणि राज्याने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प कागदावरच आहे. तसेच काळेवाडी ते देहू-आळंदी रस्ता, निगडी ते दापोडी हे बीआरटी मार्गाचे प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना शास्ती लावण्यात येणार नाही. मात्र, पाचशेच्या आत घरांची संख्या अत्यंत कमी आहे. (प्रतिनिधी)>विस्तार : निगडीपर्यंत मेट्रोची मागणी स्वारगेट ते पिंपरी हा मेट्रोचा पहिला टप्पा शासनाने मंजूर केला आहे. मात्र, मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी अशी पिंपरी-चिंचवडकरांची मागणी आहे. ती कधी पूर्ण होणार याबाबत प्रश्न आहे. तसेच सेक्टर २२ मधील रखडलेला घरकुल प्रकल्प पूर्णत्वास कधी जाणार असे प्रमुख प्रश्न शहरवासीयांसमोर आहे. एकहाती सत्ता मिळाल्यानंतर अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, पवना जलवाहिनी, पवनासुधार प्रकल्प, शास्तीकर माफ करणे, मेट्रो, बीआरटी आदी प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आव्हान आहे.