शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नवा वजीर, नव्या चाली

By admin | Updated: May 1, 2015 00:15 IST

कारण-राजकारण

कमळाबाईच्या कार्यालयात म्हणे गहजब सुरू झालाय. कारण डीसीसी बँकेच्या निवडणुकीत शेतकरी सहकार पॅनेलमधल्या पाच जागांसाठी सगळा पक्ष इस्लामपूरकर साहेबांच्या अर्थात जयंतरावांच्या दावणीला बांधला गेलाय. जिल्ह्यात कमळाबाईचा एक खासदार आणि चार आमदार असतानाही असं अघटित घडलं कसं? अरेरे! काय म्हणावं याला? पक्षाची अधोगती की अवनती?... लोकसभेच्या निकालानंतर ‘केडर बेस’ पक्ष संघटनेचा, राजकीय चातुर्याचा, इलेक्शन मॅनेजमेंटचा आणि संजयकाकांना निवडून आणल्याचा (काका ऐका बरं!) टेंभा मिरवणाऱ्या तमाम भाजपेयींना आणि नंतर ‘कन्व्हर्ट’ झालेल्या मोदीसेनेला हा सवाल सतावतोय. (काकांबाबत ही मंडळी केवळ हातांचे इशारे आणि नेत्रपल्लवीतून एकमेकांना प्रश्न विचारतात बरं का! उघड नाही ना बोलू शकत!)तशी गेल्या सात-आठ वर्षांपासून कमळाबाईची फरफट सुरूच आहे की! चाळीस वर्षांच्या दोस्तान्याला जागत संभाजी पवारांनी जयंतरावांच्या मागं कमळाबाईला फरफटत नेलं होतं. ती फरफट दिसत असतानाही समजून-उमजून करण्यात आलेली सोयीची सोयरीक या बिचाऱ्यांनी स्वीकारली होतीच की! (भाजपेयींनी साधनशूचितेच्या गप्पा सांगलीत मारून चालत नाहीत, हेच खरं!) उलट आता या भाजपेयींनी आणि नंतर ‘कन्व्हर्ट’ झालेल्या मोदीसेननं संजयकाका, जगतापसाहेब, पृथ्वीराजबाबा यांना मानलं पाहिजे! या तिघांनी ‘डीसीसी’त जयंतरावांशी खुबीनं हातमिळवणी केलीय. (खरं तर जयंतरावांनीच त्यांना पंखाखाली घेतलंय! बारामतीकरांच्या फडातून कमळाबाईच्या तंबूत त्यांना पाठवण्यात, काहींना निवडून आणण्यात कोणाचा हात होता?) त्यातच संजयकाका आणि जगतापसाहेबांनी जुन्या दोस्तीची याद ताजी करत मदनभाऊंनाही आपल्या गोटात ओढलं आणि सोनसळकर कंपनीचे पुरेपूर उट्टे काढले. एकेकाळी ‘डीसीसी’ बँक म्हणजे काय रे भाऊ, असा सवाल करणाऱ्या कमळाबाईच्या वाट्याला दोन-तीन संचालकपदं येणार असल्याचं दिसतंय, ते कुणामुळं?दुसरीकडं मदनभाऊंनी जयंतराव आणि कमळाबाईशी कसं जुळवून घेतलं, असा सवालही विचारला जातोय. भाऊंनी म्हणे स्वकियांचा हात सोडायला नको होता... असं म्हणणारे विधानसभेच्या दोन निवडणुकांत स्वकियांनीच भाऊंना केलेला दगाफटका विसरताहेत का? आणि सोनसळकर साहेबांचं जयंतरावांशी असलेलं ‘मॅचफिक्सिंग’ कोणालाच माहीत नाही का? ‘डीसीसी’ आणि वसंतदादा बँकेतल्या घोटाळ्यांतून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी भाऊंनी एक पाऊल मागं घेतलं, असं म्हणावं तर ‘डीसीसी’तल्या घोटाळ्यात बारामतीकरांच्या फडातली माणसं जशी अडकलीत, तशी कमळाबाईकडं गेलेली मंडळीही अडकलीतच की! बाजार समितीच्या इलेक्शनवर डोळा ठेवून भाऊंनी पडती बाजू घेतलीय, असाही सूर ऐकायला येतोय. खरं तर या सगळ्यांनाच एकमेकांचा टेकू पाहिजे. बदलत्या राजकारणाचा अदमास घेत यांची पावलं पडताहेत. ‘डीसीसी’तलं राजकारण वेगळं आणि इतर निवडणुकांतलं राजकारण वेगळं, असं कितीही म्हटलं तरी ‘डीसीसी’च्या निवडणुकीतच पुढल्या समीकरणांचं बीज रोवलं जाणारेय, हे दिसायला लागलंय.आता एक नवाच प्रश्न समोर आलाय. विळ्या-भोपळ्याचं सख्य असणारे एकत्र आले खरे, पण ते एकमेकांना खरंच हात देणार का? त्यांचं बँकेपुरतं झालेलं मनोमीलन तिसरी-चौथी फळी मनावर घेणार का? जगतापसाहेबांचं जतमधल्या राष्ट्रवादीच्या एका गटाशी फाटलंय, तर मिरज तालुक्यातल्या मदनभाऊंच्या कार्यकर्त्यांनी घड्याळवाल्यांशी उभा दावा घेतलाय. विट्याच्या अनिलभाऊंचं संजयकाका आणि कमळाबाईशी अजिबात पटत नाही, तर तासगाव-कवठेमहांकाळला आबा गटाचं संजयकाका गटाशी असलेलं सख्य जगजाहीर आहे! त्यातच घोडेबाजार तेजीत आला तर गणितं बिघडलीच म्हणून समजा...जाता-जाता : आर. आर. आबा गेल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते सैरभैर झालेत. काही उत्साही आबाप्रेमींनी सुरेशभाऊंकडं नेतृत्व दिल्याचं जाहीर केलं, तरी ते नेतृत्व पोक्त नसल्याचं सांगितलं जातंय. नेमकं हेच हेरून जयंतरावांनी जाळं टाकलं आणि त्यात आबांची माणसं घावली! आज तासगावमधले आबांचे सत्तर टक्के कार्यकर्ते जयंतरावांचं ऐकू लागलेत, तर काही संजयकाकांच्या वळचणीला जायचं कारण शोधताहेत. कवठेमहांकाळमधला आबा गटाचे अनेकजण जयंतरावांकडं, तर काही जण संजयकाकांना जाऊन मिळालेत! या गटाची ही राजकीय अपरिहार्यता. विधानसभेच्या निवडणुकीत संजयकाकांच्या चिंचणीत आबांना कधीच ‘लीड’ मिळालं नव्हतं, पण यंदा पोटनिवडणुकीत सुमनतार्इंना चिंचणीनं ‘लीड’ दिलं. संजयकाकांनी अजितदादांना दिलेला शब्द पाळला. काय सांगावं... उद्याच्या राजकीय उलथापालथीत संजयकाका पुन्हा अजितदादा पवारांचे साथीदार बनतील आणि जयंतरावांना शह देणारा नवा वजीर निर्माण होईल... किंवा जयंतरावच बारामतीकरांचा तंबू बदलतील..!- श्रीनिवास नागे