शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वाहनांना ब्रेक!

By admin | Updated: January 26, 2015 00:58 IST

नागपुरात वर्ष २०१२मध्ये ७० हजाराने वाहनांची संख्या वाढली. या वाढत्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्या निर्माण झाली होती, परंतु २०१३ पासून नव्या वाहनांच्या विक्रीवर ब्रेक लागला आहे.

२०१३ वर्षीच्या तुलनेत -९.०७ टक्के फरक : औद्योगिक विकास खुंटल्याचा परिणामसुमेध वाघमारे - नागपूरनागपुरात वर्ष २०१२मध्ये ७० हजाराने वाहनांची संख्या वाढली. या वाढत्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्या निर्माण झाली होती, परंतु २०१३ पासून नव्या वाहनांच्या विक्रीवर ब्रेक लागला आहे. परिणामी २०१३च्या तुलनेत मागील वर्षी उणे ९.०७ टक्के फरक पडला आहे. सलग दोन वर्षे दुष्काळी परिस्थिती आणि औद्योगिक विकास खुंटल्याने याचा फटका वाहन विक्रीवर झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दुचाकी, आॅटोरिक्षा, टॅक्सी, कार, ट्रक, टेम्पो आणि बस आदी वाहनांची संख्या २०१२ मध्ये झपाट्याने वाढली. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूककोंडी, पार्किंगची समस्या निर्माण झाली. वाहने उभी करण्यासाठी जागा मिळत नसल्याने मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केली जात असल्याच्या समस्येला नागपूरकर सामोरे जात असतानाच प्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या वाहनांच्या तुलनेत ५ हजार १५८ वाहनांची नोंद कमी झाली. २०१२ मध्ये नव्या ४९ हजार ९५ वाहनांची खरेदी झाली, २०१३ मध्ये यात ४३ हजार ८६० तर २०१४ मध्ये ३८ हजार ७०२ खरेदी झाली.दुचाकींची संख्या ४ हजार ९२१ने घटलीनागपुरात एकूण १४ लाख ९ हजार ७७८ वाहने आहेत. यात १२ लाख ६९ हजार ८२९ दुचाकी आहेत. २०१२ मध्ये ४१ हजार २४९ नव्या दुचाकींची नोंद झाली होती, या तुलनेत २०१३ मध्ये ३७ हजार ८६२ तर २०१४ मध्ये ३२ हजार ९४१ वाहनांची नोंद झाली असून मागील वर्षीच्या तुलनेत ४ हजार ९२१ने घट आली आहे. मागील वर्षी फक्त ५ हजार ७६१ नव्या कारशासकीय कर्मचाऱ्यांसह अनेक कंपन्यांचे खासगी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाल्याने २०१२ पर्यंत दुचाकीएवेजी चारचाकी खरेदीकडे अनेकांचा कल होता. मात्र २०१३ पासून ही संख्या कमी होत गेली, ती मागील वर्षांपर्यंत कायम होती. २०१२ मध्ये ७ हजार ८४६ नव्या कार्सची नोंद झाली. २०१३ मध्ये ५ हजार ९९८ तर २०१४ मध्ये ५ हजार ७६१ कारची नोंद झाली. म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत २३७ कारची संख्या कमी झाली आहे. रस्ते अपघातही घटलेनव्या वाहनांची कमी झालेली संख्या आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मागील वर्षीपासून व्यापक प्रमाणात केलेल्या रस्ता सुरक्षा जनजागृतीमुळे मागील वर्षीच्या तुलनेत नागपुरातील अपघातांच्या प्रमाणात ११६ ने घट झाली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत मृतांचा आकडा वाढला आहे. २०१३ मध्ये १२६५ अपघात झाले. यात २५५ जणांचा मृत्यू झाला तर २०१४ मध्ये ११४९ अपघात झाले असून यात २६३ जणांचा मृत्यू झाला.