शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

नव्या वाहनांना ब्रेक!

By admin | Updated: January 26, 2015 00:58 IST

नागपुरात वर्ष २०१२मध्ये ७० हजाराने वाहनांची संख्या वाढली. या वाढत्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्या निर्माण झाली होती, परंतु २०१३ पासून नव्या वाहनांच्या विक्रीवर ब्रेक लागला आहे.

२०१३ वर्षीच्या तुलनेत -९.०७ टक्के फरक : औद्योगिक विकास खुंटल्याचा परिणामसुमेध वाघमारे - नागपूरनागपुरात वर्ष २०१२मध्ये ७० हजाराने वाहनांची संख्या वाढली. या वाढत्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्या निर्माण झाली होती, परंतु २०१३ पासून नव्या वाहनांच्या विक्रीवर ब्रेक लागला आहे. परिणामी २०१३च्या तुलनेत मागील वर्षी उणे ९.०७ टक्के फरक पडला आहे. सलग दोन वर्षे दुष्काळी परिस्थिती आणि औद्योगिक विकास खुंटल्याने याचा फटका वाहन विक्रीवर झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दुचाकी, आॅटोरिक्षा, टॅक्सी, कार, ट्रक, टेम्पो आणि बस आदी वाहनांची संख्या २०१२ मध्ये झपाट्याने वाढली. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूककोंडी, पार्किंगची समस्या निर्माण झाली. वाहने उभी करण्यासाठी जागा मिळत नसल्याने मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केली जात असल्याच्या समस्येला नागपूरकर सामोरे जात असतानाच प्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या वाहनांच्या तुलनेत ५ हजार १५८ वाहनांची नोंद कमी झाली. २०१२ मध्ये नव्या ४९ हजार ९५ वाहनांची खरेदी झाली, २०१३ मध्ये यात ४३ हजार ८६० तर २०१४ मध्ये ३८ हजार ७०२ खरेदी झाली.दुचाकींची संख्या ४ हजार ९२१ने घटलीनागपुरात एकूण १४ लाख ९ हजार ७७८ वाहने आहेत. यात १२ लाख ६९ हजार ८२९ दुचाकी आहेत. २०१२ मध्ये ४१ हजार २४९ नव्या दुचाकींची नोंद झाली होती, या तुलनेत २०१३ मध्ये ३७ हजार ८६२ तर २०१४ मध्ये ३२ हजार ९४१ वाहनांची नोंद झाली असून मागील वर्षीच्या तुलनेत ४ हजार ९२१ने घट आली आहे. मागील वर्षी फक्त ५ हजार ७६१ नव्या कारशासकीय कर्मचाऱ्यांसह अनेक कंपन्यांचे खासगी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाल्याने २०१२ पर्यंत दुचाकीएवेजी चारचाकी खरेदीकडे अनेकांचा कल होता. मात्र २०१३ पासून ही संख्या कमी होत गेली, ती मागील वर्षांपर्यंत कायम होती. २०१२ मध्ये ७ हजार ८४६ नव्या कार्सची नोंद झाली. २०१३ मध्ये ५ हजार ९९८ तर २०१४ मध्ये ५ हजार ७६१ कारची नोंद झाली. म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत २३७ कारची संख्या कमी झाली आहे. रस्ते अपघातही घटलेनव्या वाहनांची कमी झालेली संख्या आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मागील वर्षीपासून व्यापक प्रमाणात केलेल्या रस्ता सुरक्षा जनजागृतीमुळे मागील वर्षीच्या तुलनेत नागपुरातील अपघातांच्या प्रमाणात ११६ ने घट झाली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत मृतांचा आकडा वाढला आहे. २०१३ मध्ये १२६५ अपघात झाले. यात २५५ जणांचा मृत्यू झाला तर २०१४ मध्ये ११४९ अपघात झाले असून यात २६३ जणांचा मृत्यू झाला.