शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

नवीन विद्यापीठ कायदा लागू

By admin | Updated: March 2, 2017 05:27 IST

राज्यात नवीन विद्यापीठ कायदा १ मार्चपासून लागू झाला आहे.

मुंबई : राज्यात नवीन विद्यापीठ कायदा १ मार्चपासून लागू झाला आहे. संशोधन मंडळ, नवउपक्रम, नवसंशोधन मंडळ, सल्लागार परिषद यांमधील उद्योग व संशोधन जगतातील तज्ज्ञांच्या सहभागाने विद्यापीठ शिक्षण अद्ययावत होईल, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.विद्यार्थी स्पर्धात्मक युगात अधिक सक्षम बनेल. या कायद्यामुळे शिक्षण हे विद्यार्थी केंद्रीत होणार असून विद्यापीठाच्या निर्णय प्रक्रियेमध्येही विद्यार्थ्यांचा सहभाग वाढणार आहे, असेही त्यांनी सांगितले.कायद्यासंदर्भातील माहितीसाठी राज्यातील सर्व विद्यापीठातील कुलगुरू, कुलसचिव व शिक्षण तज्ज्ञांची मुंबई येथे ३ मार्चला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. नवीन विद्यापीठ कायद्यामुळे विद्यापीठ प्रशासनात अनेक बदल होणार आहेत. व्यवस्थापन मंडळातील नवीन सदस्यांची निवड विद्यापीठाला ३१ आॅगस्टपर्यंत करावी लागणार आहे. तसेच व्यवस्थापन मंडळात विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार असून, विद्यार्थी महाविद्यालयीन जीवनापासूनच भारतीय लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेशी जोडले जावेत यासाठी १९९४ पासून रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थी निवडणुका आता या कायद्यामुळे होणार आहेत. (प्रतिनिधी)>नवीन विद्यापीठ कायद्यात अनेक बदल करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना ‘चॉईस बेस’ शिक्षण घेता येणार आहे. महाविद्यालयीन निवडणुकांमुळे त्यांना भारतीय लोकशाही निवडणूक प्रक्रियेचा अनुभव घेता येणार आहे. शैक्षणिक दृष्टीने हा कायदा महत्त्वाचा आहे. - प्रा. पी. पी. पाटील, कुलगुरु, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ.