शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

मग्रारोहयोच्या अंमलबजावणीसाठी नवी पदस्थापना

By admin | Updated: July 31, 2014 01:30 IST

उपमुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाची १२ पदे : राज्यातील १२ जिल्ह्यांचा समावेश.

गिरीश राऊत / खामगावमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासनाने राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाची पदं निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्यावरील कामाचा ताण कमी होऊन, त्यांची तसेच मग्रारोहयोची कामे सुरळीत होण्यास मदत होणार आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येणार्‍या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे ग्रामपंचायतीने करणे अनिवार्य आहे. यासाठीचे नियोजन पंचायत समिती, जिल्हा परिषदला करावे लागते. या योजनेंतर्गत करावयाच्या कामांच्या अंमलबजावणीस ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदकडून मंजुरी दिली जाते. जिल्हा स्तरावर या योजनेचे समन्वयन जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हाधिकारी तसेच सहजिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे करतात. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांना त्यांच्या मूळ विभागाची जबाबदारी सांभाळून मग्रारोहयोची कामेसुद्धा सांभाळावी लागतात. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये र्मयादा येत होत्या. या बाबींचा विचार करता तसेच मग्रारोहयोच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गटविकास अधिकारी (रोहयो) (वर्ग २) हे पद पुरेसे नसल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट अ या संवर्गातील पदास समकक्ष १२ पदं निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कामाची मागणी मोठय़ा प्रमाणावर असल्याने आणि कामं सुरु असलेले तसेच जास्तीत जास्त मजूर उपस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २ अशा १२ पदांना भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, नंदुरबार, अहमदनगर, नांदेड, औरंगाबाद, पालघर (ठाणे) व उस्मानाबाद इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. या जागेचे पदनाम उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक असे करण्यात आले आहे. ही पदं अस्थायी स्वरुपाची राहणार असून, त्यांची नियुक्ती एक वर्षासाठी राहणार आहे. * मग्रारोहयोच्या कामासाठी ग्रामसेवकांना मदत व्हावी म्हणून ग्रामरोजगार सेवक, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामाचा ताण हलका व्हावा आणि योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी ही नवीन पदं निर्माण करण्यात आली आहेत. या पदांची उपयोगिता पडताळल्यानंतर, आवश्यकता असल्यास पदांना मुदतवाढ देण्यात येणार आहे.