शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन टक्केवारीची नवीन कार्यपद्धती

By admin | Updated: August 28, 2016 03:19 IST

दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रात कोट्यवधी रुपये खर्च होऊनही शेतीचे सिंचन क्षेत्र केवळ ०.१ टक्का इतकेच वाढले, असा आर्थिक पाहणी अहवाल आघाडी सरकारच्या काळात

- यदु जोशी,  मुंबई

दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रात कोट्यवधी रुपये खर्च होऊनही शेतीचे सिंचन क्षेत्र केवळ ०.१ टक्का इतकेच वाढले, असा आर्थिक पाहणी अहवाल आघाडी सरकारच्या काळात आल्यानंतर प्रचंड खळबळ माजली होती. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी आता सिंचनाची टक्केवारी मोजण्याची नवीन कार्यपद्धती लागू केली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना २०१२-१३च्या आर्थिक पाहणी अहवालात ०.१ टक्का सिंचन क्षेत्रवाढीचा उल्लेख होता आणि त्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठविली होती. त्या वेळी वर्षानुवर्षे सिंचन खाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने या वादावरून राष्ट्रवादीची कोंडी होताना पाहून काँग्रेसजनही सुखावले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर सिंचन घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने सिंचनाखालील पीकक्षेत्राची कार्यपद्धती निश्चित करण्याची महत्त्वाची शिफारस केली होती. त्यानुसार या कार्यपद्धतीबाबतचा आदेश जलसंपदा विभागाने जारी केला आहे. त्यामुळे यापुढील काळात ०.१ टक्क्याच्या वादाची पुनरावृत्ती होणार नाही.त्यानुसार आता सिंचन आणि बिगरसिंचन क्षेत्राची गावनिहाय माहिती गोळा करण्यात येणार आहे. त्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक गावात समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीमध्ये विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, प्रगतीशील शेतकरी महिला, पुरुष, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहायक, जलसंपदा आणि जलसंधारण विभागाचा एकेक प्रतिनिधी हे सदस्य तर तलाठी हे सदस्य सचिव असतील. प्रत्येक हंगामामध्ये गाव कामगार, तलाठी, कालवा निरीक्षक व कृषी सहायक हे स्वतंत्रपणे त्यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे पिकांखालील क्षेत्राची माहिती संकलित करतील. त्याचा अहवाल तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे पाठविला जाईल. ही समिती संपूर्ण तालुक्यातील सिंचनाखालील क्षेत्राची आकडेवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवेल. जिल्हाधिकारी संकलित अहवाल हे कृषी आयुक्त, विभागीय आयुक्त, मुख्य अभियंता; जलसंपदा व मुख्य अभियंता; जलसंधारण यांच्याकडे पाठवतील. कृषी आयुक्त या माहितीची पडताळणी एमआरसॅक यंत्रणेमार्फत रिमोटसेंन्सिगद्वारे करतील आणि सिंचनाखालील आणि बिगरसिंचनाखालील क्षेत्राबाबतची अंतिम माहिती कृषी, महसूल, जलसंपदा, जलसंधारण व नियोजन विभागाच्या सचिवांकडे पाठवतील.गाव पातळीवरील अहवाल जानेवारीपर्यंत - खरीप हंगामात गाव पातळीवरील अहवाल दरवर्षी ३० नोव्हेंबरपर्यंत, तालुका पातळीवरील अहवाल १५ डिसेंबरपर्यंत, जिल्हा पातळीवरील अहवाल ३१ डिसेंबरपर्यंत तर राज्य पातळीवरील अहवाल १५ जानेवारीपर्यंत संकलित करण्यात येणार आहेत. - रब्बी हंगामासाठी या तारखा अनुक्रमे १५ एप्रिल, ३० एप्रिल, १५ मे आणि ३१ मे अशा असतील. तर, उन्हाळी पिकांसाठी अनुक्रमे १५ आॅगस्ट, ३१ आॅगस्ट, १५ सप्टेंबर आणि ३० सप्टेंबर अशा असतील.