शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

राज्यातील नवीन सरकार दिवाळीनंतरच

By admin | Updated: October 21, 2014 14:06 IST

महाराष्ट्रातील भाजपाचे पक्ष निरीक्षक केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी दिवाळीनंतरच मुंबईत येऊ असं जाहीर केल्याने महाराष्ट्रात दिवाळीनंतरच सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २१ - महाराष्ट्रातील भाजपाचे पक्ष निरीक्षक व केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी दिवाळीनंतरच मुंबईत येऊ असं जाहीर केल्याने महाराष्ट्रात दिवाळीनंतरच सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महाराष्ट्रात सर्वाधिक जागांवर विजय मिळवत भाजपाने आघाडी घेतली असली तरी सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेली मॅजिक फिगर गाठण्यात त्यांना अपयश आले आहे. भाजपाला १२२ जागांवर विजय मिळवला असून सत्तास्थापनेसाठी त्यांना आणखी २२ आमदारांची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच भाजपाला बाहेरुन पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र भाजपाने त्यावर अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवसेनेसोबत चर्चा सुरु असल्याचे वृत्त आहे. तर शिवसेनेला सोबत न घेता मनसे, अपक्ष आणि उर्वरित पक्षांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाने हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यासाठी भाजपाला अथक मेहनत करावी लागणार आहे.

मंगळवारी राज्यातील भाजप आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी पक्ष निरीक्षक राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा मुंबईत येणार होते. मात्र मंगळवारी सकाळी राजनाथ सिंह यांनी दिवाळीनंतरच मुंबईत येऊ असे जाहीर केले. तर भाजप आमदारांची मुंबईत होणारी बैठकही रद्द झाली असून दिवाळी साजरी करण्यासाठी भाजपचे आमदार स्वगृही रवाना झाले आहेत. त्यामुळे दिवाळीनंतरच सत्ता स्थापन होणार हे स्पष्ट झाले आहे.