शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

अकरावी प्रवेशाची नवी संधी

By admin | Updated: July 25, 2016 04:46 IST

अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केलेल्या (नॉट रिपोर्टेड) विद्यार्थ्यांना सोमवारी व मंगळवारी प्रवेशाची दुसरी संधी मिळणार आहे

मुंबई : अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केलेल्या (नॉट रिपोर्टेड) विद्यार्थ्यांना सोमवारी व मंगळवारी प्रवेशाची दुसरी संधी मिळणार आहे. सुमारे ७० हजार नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला नव्हता, त्यांना रिक्त जागांची संख्या पाहून त्याच महाविद्यालयात प्रवेश देण्याचे मेसेजेस पाठवण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आॅनलाइनचा लॉगीन आणि त्यावर नोंदणीकृत केलेला मोबाइल क्रमांक तपासावा, असे आवाहनही उपसंचालक कार्यालयाने केले आहे.सोमवारी व मंगळवारी मेसेज आल्यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. सर्वच विद्यार्थ्यांना मेसेजेस येणार नाहीत, असेही उपसंचालक कार्यालयाने सांगितले. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मेसेजेस येणार नाहीत, त्यांना ९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या पहिल्या विशेष फेरीमध्ये आणखी एक संधी देण्यात येईल. त्यामुळे मेसेजेस आले नाहीत, म्हणून नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी गोंधळून जाऊ नये, असे उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले. २८ जुलैला सर्व महाविद्यालये त्यांच्याकडे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे अपलोडिंग करतील. त्यानंतर, रिक्त जागांची निश्चित आकडेवारी समोर येईल.या आधी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत अर्धवट अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना आत्ता अर्ज पूर्ण भरण्याची संधी दिली जाईल. सुमारे १ हजार २०० विद्यार्थ्यांनी अर्धवट अर्ज भरले होते. ३० जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना अर्धवट राहिलेले अर्ज पूर्ण भरता येतील. त्यानंतर या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी पाचवी गुणवत्ता यादी ४ आॅगस्टला जाहीर केली जाईल. गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना ५ व ६ आॅगस्ट रोजी संबंधित कनिष्ट महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करता येईल, तर या फेरीत ज्या विद्यार्थ्यांचे नाव जाहीर होणार नाही, त्यांना ९ आॅगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या पहिल्या विशेष फेरीत सामील केले जाईल. एकंदरीतच नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांमधून शिल्लक राहणारे विद्यार्थी आणि पाचव्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळणार नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या विशेष फेरीत प्रवेशाची आणखी एक संधी मिळणार आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना दूरचे महाविद्यालय मिळाले आहे, त्यांच्यासाठी तीन विशेष फेऱ्यांचे आयोजन केले. (प्रतिनिधी)