शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
3
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
4
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
5
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
6
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
7
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
8
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
9
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
10
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
11
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
12
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
13
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
14
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
15
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
16
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
17
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
18
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
19
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
20
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...

मध्यान्ह भोजन कंत्राटावरून नवा वाद

By admin | Updated: July 13, 2017 02:12 IST

५० हजार विद्यार्थ्यांना मोफत पोषक आहार पुरवण्यासाठी अक्षय पात्र या संस्थेला पवईतील ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाची जागा देण्यात येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पालिका शाळांमधील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना मोफत पोषक आहार पुरवण्यासाठी अक्षय पात्र या संस्थेला पवईतील ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाची जागा देण्यात येत आहे. मात्र गटनेत्यांच्या बैठकीत झालेल्या या निर्णयावर पहारेकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत ही एकमेव संस्था आहे का? असा आक्षेप विरोधी पक्षांबरोबरच भाजपानेही घेतला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये वादाचा एक नवीन मुद्दा समोर येणार आहे.मध्यान्ह भोजनाच्या पुरवठ्याकरिता या संस्थेला स्वयंपाकगृहासाठी जागा देण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. ही जागा या संस्थेला मोफत देण्यात येणार आहे. ५० हजार मुलांचे भोजन बनवण्यासाठी या जागेचा वापर केला जाणार आहे. मात्र प्रथम पाच हजार विद्यार्थ्यांना भोजनाचे वाटप करण्यात येणार आहे, त्यानंतर टप्प्याटप्प्याने ५० हजार मुलांना पोषक आहार देण्यात येणार आहे. फक्त पाच हजार मुलांना पोषण आहार पुरवण्यासाठी ३० हजार चौरस फुटांची जागा या संस्थेच्या घशात घातली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.पश्चिम उपनगरांतील एका पंचतारांकित हॉटेलमधील ही ३० हजार चौरस फूट जागा ‘सेंट्रल किचन’ म्हणून वापरण्यात येणार आहे. मात्र या कामाच्या निविदा का मागवल्या नाहीत, या जागेचा भविष्यात व्यावसायिक वापर कशावरून होणार नाही, असे प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध केला आहे. तर भाजपानेही या प्रकरणी जाब विचारला आहे. मात्र या विरोधानंतरही सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला.>तीस हजार फुटांचे ‘किचन’पालिकेतील विद्यार्थ्यांना भोजन देण्यासाठी पश्चिम उपनगरांतील एका हॉटेलच्या ३० हजार चौरस फूट जागेचा सेंट्रल किचन म्हणून वापर करण्यात येणार आहे. या जागेचा वापर ‘किचन’ म्हणून सुरू आहे तोपर्यंतच ही जागा संस्थेला मिळणार आहे. या संस्थेने तीन महिन्यांनंतर ५० हजार विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन मोफत देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र अशा प्रकारे जागा देण्यासाठी जाहिरात काढून त्याचे वाटप करणे अपेक्षित असल्याचे मत रवी राजा यांनी व्यक्त केले.5000 मुलांचे भोजन बनवण्यासाठी ३० हजार चौरस फुटांची जागा देण्याची कल्पना आपल्याला मान्य नाही. संपूर्ण मुंबईत केवळ ही एकमेव संस्था आहे का? की कोणी महापालिकेकडे येत नाही? याचा खुलासा करण्याची मागणी केल्याचे भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी सांगितले. इतर संस्थांकडूनही अंदाज घेऊन हा निर्णय घेतला जावा, अशी सूचनाही त्यांनी केली.