शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मध्यान्ह भोजन कंत्राटावरून नवा वाद

By admin | Updated: July 13, 2017 02:12 IST

५० हजार विद्यार्थ्यांना मोफत पोषक आहार पुरवण्यासाठी अक्षय पात्र या संस्थेला पवईतील ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाची जागा देण्यात येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पालिका शाळांमधील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना मोफत पोषक आहार पुरवण्यासाठी अक्षय पात्र या संस्थेला पवईतील ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाची जागा देण्यात येत आहे. मात्र गटनेत्यांच्या बैठकीत झालेल्या या निर्णयावर पहारेकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत ही एकमेव संस्था आहे का? असा आक्षेप विरोधी पक्षांबरोबरच भाजपानेही घेतला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये वादाचा एक नवीन मुद्दा समोर येणार आहे.मध्यान्ह भोजनाच्या पुरवठ्याकरिता या संस्थेला स्वयंपाकगृहासाठी जागा देण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. ही जागा या संस्थेला मोफत देण्यात येणार आहे. ५० हजार मुलांचे भोजन बनवण्यासाठी या जागेचा वापर केला जाणार आहे. मात्र प्रथम पाच हजार विद्यार्थ्यांना भोजनाचे वाटप करण्यात येणार आहे, त्यानंतर टप्प्याटप्प्याने ५० हजार मुलांना पोषक आहार देण्यात येणार आहे. फक्त पाच हजार मुलांना पोषण आहार पुरवण्यासाठी ३० हजार चौरस फुटांची जागा या संस्थेच्या घशात घातली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.पश्चिम उपनगरांतील एका पंचतारांकित हॉटेलमधील ही ३० हजार चौरस फूट जागा ‘सेंट्रल किचन’ म्हणून वापरण्यात येणार आहे. मात्र या कामाच्या निविदा का मागवल्या नाहीत, या जागेचा भविष्यात व्यावसायिक वापर कशावरून होणार नाही, असे प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध केला आहे. तर भाजपानेही या प्रकरणी जाब विचारला आहे. मात्र या विरोधानंतरही सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला.>तीस हजार फुटांचे ‘किचन’पालिकेतील विद्यार्थ्यांना भोजन देण्यासाठी पश्चिम उपनगरांतील एका हॉटेलच्या ३० हजार चौरस फूट जागेचा सेंट्रल किचन म्हणून वापर करण्यात येणार आहे. या जागेचा वापर ‘किचन’ म्हणून सुरू आहे तोपर्यंतच ही जागा संस्थेला मिळणार आहे. या संस्थेने तीन महिन्यांनंतर ५० हजार विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन मोफत देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र अशा प्रकारे जागा देण्यासाठी जाहिरात काढून त्याचे वाटप करणे अपेक्षित असल्याचे मत रवी राजा यांनी व्यक्त केले.5000 मुलांचे भोजन बनवण्यासाठी ३० हजार चौरस फुटांची जागा देण्याची कल्पना आपल्याला मान्य नाही. संपूर्ण मुंबईत केवळ ही एकमेव संस्था आहे का? की कोणी महापालिकेकडे येत नाही? याचा खुलासा करण्याची मागणी केल्याचे भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी सांगितले. इतर संस्थांकडूनही अंदाज घेऊन हा निर्णय घेतला जावा, अशी सूचनाही त्यांनी केली.