शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

मध्यान्ह भोजन कंत्राटावरून नवा वाद

By admin | Updated: July 13, 2017 02:12 IST

५० हजार विद्यार्थ्यांना मोफत पोषक आहार पुरवण्यासाठी अक्षय पात्र या संस्थेला पवईतील ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाची जागा देण्यात येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पालिका शाळांमधील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना मोफत पोषक आहार पुरवण्यासाठी अक्षय पात्र या संस्थेला पवईतील ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाची जागा देण्यात येत आहे. मात्र गटनेत्यांच्या बैठकीत झालेल्या या निर्णयावर पहारेकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत ही एकमेव संस्था आहे का? असा आक्षेप विरोधी पक्षांबरोबरच भाजपानेही घेतला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये वादाचा एक नवीन मुद्दा समोर येणार आहे.मध्यान्ह भोजनाच्या पुरवठ्याकरिता या संस्थेला स्वयंपाकगृहासाठी जागा देण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. ही जागा या संस्थेला मोफत देण्यात येणार आहे. ५० हजार मुलांचे भोजन बनवण्यासाठी या जागेचा वापर केला जाणार आहे. मात्र प्रथम पाच हजार विद्यार्थ्यांना भोजनाचे वाटप करण्यात येणार आहे, त्यानंतर टप्प्याटप्प्याने ५० हजार मुलांना पोषक आहार देण्यात येणार आहे. फक्त पाच हजार मुलांना पोषण आहार पुरवण्यासाठी ३० हजार चौरस फुटांची जागा या संस्थेच्या घशात घातली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.पश्चिम उपनगरांतील एका पंचतारांकित हॉटेलमधील ही ३० हजार चौरस फूट जागा ‘सेंट्रल किचन’ म्हणून वापरण्यात येणार आहे. मात्र या कामाच्या निविदा का मागवल्या नाहीत, या जागेचा भविष्यात व्यावसायिक वापर कशावरून होणार नाही, असे प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध केला आहे. तर भाजपानेही या प्रकरणी जाब विचारला आहे. मात्र या विरोधानंतरही सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला.>तीस हजार फुटांचे ‘किचन’पालिकेतील विद्यार्थ्यांना भोजन देण्यासाठी पश्चिम उपनगरांतील एका हॉटेलच्या ३० हजार चौरस फूट जागेचा सेंट्रल किचन म्हणून वापर करण्यात येणार आहे. या जागेचा वापर ‘किचन’ म्हणून सुरू आहे तोपर्यंतच ही जागा संस्थेला मिळणार आहे. या संस्थेने तीन महिन्यांनंतर ५० हजार विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन मोफत देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र अशा प्रकारे जागा देण्यासाठी जाहिरात काढून त्याचे वाटप करणे अपेक्षित असल्याचे मत रवी राजा यांनी व्यक्त केले.5000 मुलांचे भोजन बनवण्यासाठी ३० हजार चौरस फुटांची जागा देण्याची कल्पना आपल्याला मान्य नाही. संपूर्ण मुंबईत केवळ ही एकमेव संस्था आहे का? की कोणी महापालिकेकडे येत नाही? याचा खुलासा करण्याची मागणी केल्याचे भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी सांगितले. इतर संस्थांकडूनही अंदाज घेऊन हा निर्णय घेतला जावा, अशी सूचनाही त्यांनी केली.