शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

‘दीपोत्सव’मध्ये शोधपत्रकारितेचा नवा आयाम

By admin | Updated: November 8, 2015 23:38 IST

जिल्ह्यात जोरदार स्वागत : ठिकठिकाणी मान्यवरांनी केले मनापासून स्वागत

सातारा : ‘रोजच्या अंकातून निर्भिड पत्रकारिता करणाऱ्या ‘लोकमत’ने ‘दीपोत्सव’मधूनही शोधपत्रकारितेचा नवा आदर्श निर्माण केला आहे,’ अशा शब्दात जिल्ह्यातील मान्यवर नेतेमंडळींनी ‘दीपोत्सव’चे जोरदार स्वागत केले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते या अंकाचे शानदार स्वागत करण्यात आले.विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील पत्रकारांसमोर या ‘दीपोत्सव’चे प्रकाशन केले. यावेळी बोलताना रामराजे म्हणाले, की, ‘संपूर्ण महाराष्ट्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘लोकमत’ने ‘दीपोत्सव’चेही स्वतंत्र अस्तित्व मोठ्या दिमाखात सिद्ध केले आहे. यापुढेही ‘लोकमत’ची घोडदौड अशीच राहो.’ कोरेगाव तालुक्यात आमदार शशिकांत शिंदे यांनी या अंकाचे स्वागत केले. प्रकाशन झाल्यानंतर शिंदे म्हणाले, ‘वाचनाची सवय कमी होत असताना तरुण वर्गालाही ‘लोकमत’ने वाचनसंस्कृतीशी जुळवून ठेवले आहे. मी दरवर्षी मोठ्या आवडीने ‘दीपोत्सव’ वाचतो. जपून ठेवतो. ‘लोकमत’चा ‘दीपोत्सव’ तरुणांना भेट देण्यायोग्य असतात. शोधपत्रकारितेचे वारसा ‘लोकमत’ने यापुढेही असाच सुरू ठेवावा.’माण-खटाव तालुक्यांत ‘दीपोत्सव’चे स्वागत करताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले की, ‘दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या व्यथा मांडणाऱ्या ‘लोकमत’ने देशाबाहेरही जाऊन कुंपणात अडकलेल्या सिरियावासीयांच्या कथा दीपोत्सवमधून सादर केल्या आहेत. ‘लोकमत’चा दीपोत्सव वरचेवर वाचनीय व दर्जेदार बनत चालला आहे.’वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यांत या ‘दीपोत्सव’चे स्वागत करताना आमदार मकरंद पाटील म्हणले की, ‘लोकमत’ची पत्रकारिता नेहमीच पवित्र अन् आदर्श राहिली आहे. विकासाच्या मुद्द्यावर लोकप्रतिनिधींची सकारात्मक बाजू मांडणाऱ्या ‘लोकमत’ने वेळप्रसंगी जनतेसाठी कठोरपणे आसूडही ओढला आहे. ‘दीपोत्सव’मधूनही वास्तववादी पत्रकारितेचा नवा इतिहास घडला आहे. याचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटत आला आहे.’कऱ्हाडमध्ये भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते दीपोत्सवचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. अतुल भोसले म्हणाले की, ‘कथा, कादंबरी आणि कविता या नेहमीच्या सरळसोट साहित्याला छेद देत ‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव’ने वास्तववादी पत्रकारितेची नवी वाट चोखाळली आहे. सतत वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या ‘लोकमत’ने ‘दीपोत्सव’च्या माध्यमातूनही आपली वेगळी छाप संपूर्ण महाराष्ट्रभर उमटवली आहे. यामुळे वाचकांना नवीन वाचन्याची सवय लागणार आहे.’ (प्रतिनिधी)साताऱ्याच्या लेखणीचाही सर्वत्र गौरवहरियाणा येथील महावीरसिंग फोगट यांच्या मुली आॅलिम्पिक व आशियाई स्पर्धेत कुस्तीचे मैदान मारून येतात. या घटनेवर आमिर खान ‘दंगल’ नावाचा चित्रपट काढतोय, यावर प्रकाशझोत टाकणारी स्टोरी साताऱ्याच्या लेखणीने तयार केली आहे. राज्याबाहेर जाऊन एखाद्या वेगळ्या बातमीचा शोध घेण्याचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या साताऱ्याच्या लेखणीचाही जिल्ह्यात ठिकठिकाणी कौतुक करण्यात आले.