शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

किल्ले पर्यटनवृद्धीसाठी नवी शक्कल!

By admin | Updated: May 14, 2014 01:59 IST

महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचे जतन करीत तेथे पर्यटनवृद्धी व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) नवा प्रकल्प हाती घेतला आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचे जतन करीत तेथे पर्यटनवृद्धी व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) नवा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून राज्यातील किल्ल्यांचा विकास करण्यात येणार आहे.देशोदेशीच्या पर्यटकांनी महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचा आनंद घ्यावा, त्या माध्यमातून किल्ल्यांची महती परदेशातील अभ्यासकांना आणि पर्यटकांना व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातील ३५० किल्ल्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण २० वर्षांचा कालावधी लागणार असून त्यासाठी प्रत्येक किल्ल्याला अडीच कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पांतर्गत किल्ल्याच्या आवारात पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. प्रकल्पातील काही किल्ले केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित तर काही किल्ले राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागात अंर्तभूत आहेत. मात्र राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाची परवानगी मिळाल्यामुळे त्या अंतर्गत असणार्‍या किल्ल्यांचे काम सुरु झाले आहे. पर्यटनवृद्धीसाठीच्या या प्रकल्पात मुख्यत्त्वे किल्ल्याकडे जाणारा मार्ग, पाण्याचे व्यवस्थापन, फराळाचे स्टॉल्स, किल्लेभ्रमंतीसाठी योग्य सोयी-सुविधा, पर्यटकांना राहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. प्रकल्पातील पहिल्या सहा किल्ल्यांचे काम सुरु झाले असून त्यात राजगड, तोरणा, राजमाची, लोहगड, सिंहगड आणि शिवनेरीचा समावेश आहे. (प्रतिनिधी)..........................गेल्या काही वर्षांत किल्ल्यांच्या दुरावस्थेमुळे दुर्गवैभवाकडे पर्यटकांचे दुर्लक्ष झाले आहे. मात्र किल्ले पर्यटन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून एमटीडीसीचा हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी ठरेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुन्हा एकदा किल्ले पर्यटनाला बहर येईल. याशिवाय, काही किल्ल्यांच्या डागडुजीचे कामही पुरातत्त्व विभागामार्फत सुरु असल्याने महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचे संवर्धन होईल.- राहुल वसईकर, कार्यकारी अभियंता, एमटीडीसी.........................