शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रंगभूमीसाठी नवीन कलाकार हवेत : देशपांडे

By admin | Updated: November 5, 2014 00:08 IST

अशी अपेक्षा साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी व्यक्त केली.

उत्तमकुमार जाधव- चिपळूण -गेल्या काही वर्षांत विविध कारणांनी मराठी रंगभूमीवरील नाट्य चळवळ काहीशी थंडावलेली दिसते. दूरदर्शनवरील नवीन मालिकांमुळे प्रेक्षकांचे घरबसल्या मनोरंजन होत आहे. त्यामुळे नाट्यगृहात जाऊन नाटक बघणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. कोकण ही खऱ्या अर्थाने कलावंतांची भूमी असून, या भूमीतील कलाकारांनी रंगभूमीसाठी प्रचंड योगदान दिले आहे. मराठी रंगभूमीसाठी नवीन कलाकार निर्माण व्हायला हवेत, अशी अपेक्षा साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी व्यक्त केली.गणपतराव जोशी, केशवराव दाते, मामा पेंडसे, शंकर घाणेकर, काशिनाथ घाणेकर, मच्छींद्र कांबळी अशा प्रदीर्घ कलावंतांनी मराठी रंगभूमीसाठी योगदान दिले आहे. आजही वैभव मांगलेंसारखा कलाकार रंगभूमी गाजवताना दिसतो. कोकणात नाटक हे नुसते मनोरंजनाचे साधन नव्हे; तर ती ईश्वरसेवा म्हणून सादर केली जाते आणि ही सेवा करण्यासाठीच कोकणच्या मातीत अनेक कलाकार घडतात. बदलत्या युगातही ग्रामीण भागात आजही देवांचे उत्सव होतात. त्यावेळी लळीतप्रसंगी नाटक सादर केले जाते. जशी कलावंतांची परंपरा आहे, तशीच नाट्यलेखकांची, संगीतकारांची परंपरा आहे, असे देशपांडे म्हणाले. वसंत देसाई, राम मराठे, गोविंदराव पटवर्धन अशी दिग्गज मंडळी नाट्यसंगीत क्षेत्रात गाजली. वसंत जाधव यांनी लिहिलेली नाटके खेडोपाडी आजही होतात. त्याचे शेकडो प्रयोग झाले. चिपळूणमध्ये असणारे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र बंद पडले. तीच स्थिती आज कोकणातील अन्य शहरांची आहे. सुसज्ज असे नाट्यगृह नाही. वाढती महागाई, तिकिटांचे दर सामान्यांच्या खिशाला न परवडणारे आहेत. त्यामुळे ही चळवळ काहीशी थंडावलेली आहे. तरीही न थांबता, न थकता इथले कलाकार घेतला वसा न टाकता सांभाळत आहेत. रत्नागिरीतील खल्वायनसारखी संस्था संगीत नाटकांचे प्रयोग सादर करताना दिसते. अनिल दांडेकरांसारखा लेखक प्रायोगिक रंगभूमीवर प्रयोग सादर करीत आहे. या पंखांना नटराजाबरोबरच आम्हा सर्व रसिकांनी भक्कम बळ दिले, तर पुन्हा कोकण प्रांतात खेडोपाडी झापांच्या थिएटरात रात्र रात्र प्रयोग रंगतील, असे देशपांडे म्हणाले.युवक - युवतीही उत्साहाने एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेऊन स्पर्धा उत्साहपूर्वक होतील. यातूनच नवीन कलाकार निर्माण होतील. यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न व्हायला हवेत. सध्या काहीशी ही चळवळ मंदावली असली तरी ती थांबणार नाही. असा विश्वास वाटतो, असे देशपांडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.