शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

रंगभूमीसाठी नवीन कलाकार हवेत : देशपांडे

By admin | Updated: November 5, 2014 00:08 IST

अशी अपेक्षा साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी व्यक्त केली.

उत्तमकुमार जाधव- चिपळूण -गेल्या काही वर्षांत विविध कारणांनी मराठी रंगभूमीवरील नाट्य चळवळ काहीशी थंडावलेली दिसते. दूरदर्शनवरील नवीन मालिकांमुळे प्रेक्षकांचे घरबसल्या मनोरंजन होत आहे. त्यामुळे नाट्यगृहात जाऊन नाटक बघणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. कोकण ही खऱ्या अर्थाने कलावंतांची भूमी असून, या भूमीतील कलाकारांनी रंगभूमीसाठी प्रचंड योगदान दिले आहे. मराठी रंगभूमीसाठी नवीन कलाकार निर्माण व्हायला हवेत, अशी अपेक्षा साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी व्यक्त केली.गणपतराव जोशी, केशवराव दाते, मामा पेंडसे, शंकर घाणेकर, काशिनाथ घाणेकर, मच्छींद्र कांबळी अशा प्रदीर्घ कलावंतांनी मराठी रंगभूमीसाठी योगदान दिले आहे. आजही वैभव मांगलेंसारखा कलाकार रंगभूमी गाजवताना दिसतो. कोकणात नाटक हे नुसते मनोरंजनाचे साधन नव्हे; तर ती ईश्वरसेवा म्हणून सादर केली जाते आणि ही सेवा करण्यासाठीच कोकणच्या मातीत अनेक कलाकार घडतात. बदलत्या युगातही ग्रामीण भागात आजही देवांचे उत्सव होतात. त्यावेळी लळीतप्रसंगी नाटक सादर केले जाते. जशी कलावंतांची परंपरा आहे, तशीच नाट्यलेखकांची, संगीतकारांची परंपरा आहे, असे देशपांडे म्हणाले. वसंत देसाई, राम मराठे, गोविंदराव पटवर्धन अशी दिग्गज मंडळी नाट्यसंगीत क्षेत्रात गाजली. वसंत जाधव यांनी लिहिलेली नाटके खेडोपाडी आजही होतात. त्याचे शेकडो प्रयोग झाले. चिपळूणमध्ये असणारे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र बंद पडले. तीच स्थिती आज कोकणातील अन्य शहरांची आहे. सुसज्ज असे नाट्यगृह नाही. वाढती महागाई, तिकिटांचे दर सामान्यांच्या खिशाला न परवडणारे आहेत. त्यामुळे ही चळवळ काहीशी थंडावलेली आहे. तरीही न थांबता, न थकता इथले कलाकार घेतला वसा न टाकता सांभाळत आहेत. रत्नागिरीतील खल्वायनसारखी संस्था संगीत नाटकांचे प्रयोग सादर करताना दिसते. अनिल दांडेकरांसारखा लेखक प्रायोगिक रंगभूमीवर प्रयोग सादर करीत आहे. या पंखांना नटराजाबरोबरच आम्हा सर्व रसिकांनी भक्कम बळ दिले, तर पुन्हा कोकण प्रांतात खेडोपाडी झापांच्या थिएटरात रात्र रात्र प्रयोग रंगतील, असे देशपांडे म्हणाले.युवक - युवतीही उत्साहाने एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेऊन स्पर्धा उत्साहपूर्वक होतील. यातूनच नवीन कलाकार निर्माण होतील. यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न व्हायला हवेत. सध्या काहीशी ही चळवळ मंदावली असली तरी ती थांबणार नाही. असा विश्वास वाटतो, असे देशपांडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.