शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नेवाळी जमीनप्रश्नी लवकरच तोडगा काढणार

By admin | Updated: April 27, 2016 03:51 IST

नेवाळी येथील जमिनीचा वाद प्रदीर्घ काळ रेंगाळला असून शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही आणि नौदलाचेही नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने सन्माननीय तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.

ठाणे/कल्याण : नेवाळी येथील जमिनीचा वाद प्रदीर्घ काळ रेंगाळला असून शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही आणि नौदलाचेही नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने सन्माननीय तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री यांच्यासह संरक्षण मंत्री यांची भेट घेऊन मार्ग काढण्यात येईल,अशी ग्वाही ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे दिली.नेवाळी परिसरातील सुमारे १६०० एकर जमिनीवर स्थानिक ग्रामस्थ आणि नौदल असे दोघेही हक्क सांगत असून नौदलाने येथे संरक्षक भिंत बांधण्याचे काम काही ठिकाणी सुरू केले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता वाढली आहे. याबाबत शेतकऱ्यांनीआपल्या व्यथा पालकमंत्री यांच्याकडे मांडल्या होत्या. त्यानुसारच मंगळवारी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी, महसूल विभागाचे अधिकारी, नौदलाचे अधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक बोलवून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी नौदलाला सध्या सुरू असलेले काम थांबवण्याची सूचना केली. याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांसह संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन यातून सन्माननीय तोडगा काढू, असे सांगितले. (प्रतिनिधी)>दोन्ही बाजूंनी संयम बाळगावे असे आवाहन जवान आणि किसान हे दोघेही देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे दोघांपैकी कोणावरही अन्याय होता कामा नये. म्हणूनच या प्रश्नी मध्यममार्ग काढण्याची गरज असून चर्चेनेच हा प्रश्न सुटू शकेल. मात्र, जोरजबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवेल. त्यामुळे दोन्ही बाजूंनी संयम बाळगावा,असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.