शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नीटग्रस्त विद्यार्थी-पालकांचा आज मेळावा

By admin | Updated: May 18, 2016 00:49 IST

केंद्र शासनावर दबाव गट निर्माण करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे बुधवारी नीटग्रस्त विद्यार्थी-पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला

पुणे : नीटचे (नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) अचानक आलेले संकट दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनावर दबाव गट निर्माण करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे बुधवारी नीटग्रस्त विद्यार्थी-पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीईटी परीक्षा रद्द करून पुन्हा नीट परीक्षा द्यावी, असे आदेश दिल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण आहे. विद्यार्थी व पालकांमधील उद्रेकाला वाट करून देण्यासाठी आणि अन्यायाल वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला आहे. शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात हा मेळावा होईल. यंदा विद्यार्थ्यांवर लादण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करून केवळ सीईटी परीक्षेच्या गुणांच्या आधारेच मेडिकलचे प्रवेश द्यावेत, अशी भूमिका लोकमतच्या व्यासपीठावरून राज्य व केंद्र शासनापर्यंत पोहोचविली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थी व पालकांची सह्यांची मोहीम राबवून त्याबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले जाणार आहे. तसेच, नीटच्या प्रश्नाला कसे सामोरे जायचे, या विषयावर विद्यार्थ्यांना पुण्यातील शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. लोकमतने सर्वप्रथम नीट प्रश्नाला वाचा फोडली. नीटबाबत अध्यादेश काढून राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देता येऊ शकतो. तसेच, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत लक्ष घालून केंद्राकडे पाठपुरावा करावा. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे हे या मेळाव्याचे निमंत्रक आहेत. तसेच, डिस्ट्रिक्ट एन्ट्रन्स एक्झामिनेशन परफॉर्मन्स इनहान्समेंट अ‍ॅण्ड रिसर्चचे (डिपर) संस्थापक-सचिव हरीश बुटले, दि आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक दुर्गेश मंगेशकर यांच्या सहकार्याने हा मेळावा घेतला जात आहे. पुण्यातील लोकप्रतिनिधींसह शिक्षणक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींना मेळाव्यासाठी निमंत्रित केले आहे.केंद्र शासनाने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून यंदा मेडिकलचे प्रवेश सीईटीनुसार देण्याबाबत अध्यादेश काढणे आवश्यक आहे. मेडिकलच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांना पुन्हा नीट परीक्षा द्यावी लागणे, हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे राज्य शासनाने व राज्यातील खासदारांनी केंद्रावर या संदर्भात दबाव आणण्याची गरज आहे. नीट परीक्षेला कोणाचाही विरोध नाही; परंतु विद्यार्थ्यांना अचानक परीक्षा देण्यास सांगणे सयुक्तिक नाही. त्यामुळे यंदा नीट परीक्षा रद्द करावी, अशी भूमिका मेळाव्यात मांडली जाणार आहे. पालकांच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून केला जाईल. तसेच, नीट परीक्षा रद्द करण्यात सरकार अयपशी ठरले, तर विद्यार्थ्यांनी दोन महिन्यांत कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा, परीक्षेसाठी कोणत्या साहित्याचा वापर करावा, कोणत्या प्रश्नपत्रिकांचा सराव करावा, याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. (प्रतिनिधी)>नीटग्रस्त विद्यार्थ्यांना ‘लोकमत’ने दिला आवाजसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अचानक नीट परीक्षेचे संकट विद्यार्थ्यांवर आल्यावर सर्वांत प्रथम ‘लोकमत’ने या संदर्भात आवाज उठविला. शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांची चर्चा घडवून आणली. केंद्र शासनाकडून अध्यादेश हा एकमेव उपाय असल्याचे सुचविले. त्यातूनच अध्यादेशाचा पर्याय वापरण्यावर चर्चा झाली. त्याचबरोबर नीट परीक्षेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायालाही आकडेवारीसह वाचा फोडण्यात आली.