शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

नीटग्रस्त विद्यार्थी-पालकांचा आज मेळावा

By admin | Updated: May 18, 2016 00:49 IST

केंद्र शासनावर दबाव गट निर्माण करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे बुधवारी नीटग्रस्त विद्यार्थी-पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला

पुणे : नीटचे (नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) अचानक आलेले संकट दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनावर दबाव गट निर्माण करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे बुधवारी नीटग्रस्त विद्यार्थी-पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीईटी परीक्षा रद्द करून पुन्हा नीट परीक्षा द्यावी, असे आदेश दिल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण आहे. विद्यार्थी व पालकांमधील उद्रेकाला वाट करून देण्यासाठी आणि अन्यायाल वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला आहे. शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात हा मेळावा होईल. यंदा विद्यार्थ्यांवर लादण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करून केवळ सीईटी परीक्षेच्या गुणांच्या आधारेच मेडिकलचे प्रवेश द्यावेत, अशी भूमिका लोकमतच्या व्यासपीठावरून राज्य व केंद्र शासनापर्यंत पोहोचविली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थी व पालकांची सह्यांची मोहीम राबवून त्याबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले जाणार आहे. तसेच, नीटच्या प्रश्नाला कसे सामोरे जायचे, या विषयावर विद्यार्थ्यांना पुण्यातील शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. लोकमतने सर्वप्रथम नीट प्रश्नाला वाचा फोडली. नीटबाबत अध्यादेश काढून राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देता येऊ शकतो. तसेच, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत लक्ष घालून केंद्राकडे पाठपुरावा करावा. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे हे या मेळाव्याचे निमंत्रक आहेत. तसेच, डिस्ट्रिक्ट एन्ट्रन्स एक्झामिनेशन परफॉर्मन्स इनहान्समेंट अ‍ॅण्ड रिसर्चचे (डिपर) संस्थापक-सचिव हरीश बुटले, दि आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक दुर्गेश मंगेशकर यांच्या सहकार्याने हा मेळावा घेतला जात आहे. पुण्यातील लोकप्रतिनिधींसह शिक्षणक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींना मेळाव्यासाठी निमंत्रित केले आहे.केंद्र शासनाने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून यंदा मेडिकलचे प्रवेश सीईटीनुसार देण्याबाबत अध्यादेश काढणे आवश्यक आहे. मेडिकलच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांना पुन्हा नीट परीक्षा द्यावी लागणे, हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे राज्य शासनाने व राज्यातील खासदारांनी केंद्रावर या संदर्भात दबाव आणण्याची गरज आहे. नीट परीक्षेला कोणाचाही विरोध नाही; परंतु विद्यार्थ्यांना अचानक परीक्षा देण्यास सांगणे सयुक्तिक नाही. त्यामुळे यंदा नीट परीक्षा रद्द करावी, अशी भूमिका मेळाव्यात मांडली जाणार आहे. पालकांच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून केला जाईल. तसेच, नीट परीक्षा रद्द करण्यात सरकार अयपशी ठरले, तर विद्यार्थ्यांनी दोन महिन्यांत कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा, परीक्षेसाठी कोणत्या साहित्याचा वापर करावा, कोणत्या प्रश्नपत्रिकांचा सराव करावा, याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. (प्रतिनिधी)>नीटग्रस्त विद्यार्थ्यांना ‘लोकमत’ने दिला आवाजसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अचानक नीट परीक्षेचे संकट विद्यार्थ्यांवर आल्यावर सर्वांत प्रथम ‘लोकमत’ने या संदर्भात आवाज उठविला. शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांची चर्चा घडवून आणली. केंद्र शासनाकडून अध्यादेश हा एकमेव उपाय असल्याचे सुचविले. त्यातूनच अध्यादेशाचा पर्याय वापरण्यावर चर्चा झाली. त्याचबरोबर नीट परीक्षेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायालाही आकडेवारीसह वाचा फोडण्यात आली.