शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात स्वच्छ भारत अभियानाचा निव्वळ फार्स

By admin | Updated: November 16, 2014 23:35 IST

घाणीचे साम्राज्य : कायमस्वरुपी स्वच्छतेच्या यंत्रणेची मागणी; ठेकेदारांचे सफाई कर्मचारी फिरकत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी

अशोक पाटील - इस्लामपूर --माजी मंत्री आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा अभियान राज्यभरात राबवले. यासाठी मोठ्या रकमेची बक्षिसेही होती. तरीसुध्दा इस्लामपूर शहरात घाणीचे साम्राज्य कायम होते. सध्याचीही परिस्थिती तशीच आहे. केंद्र सरकारने संत गाडगेबाबा अभियानाला खो देऊन आता स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. इस्लामपूर पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीलाही या अभियानाचा साक्षात्कार झाला आहे. त्यांनी केवळ प्रसिध्दीसाठी प्रभागनिहाय स्वच्छता अभियानाचा फार्स केला आहे. मोदी यांच्या संकल्पनेतून आलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा उपक्रम इस्लामपूर पालिकेने राबविण्याचे ठरवले आहे. १४ ते २0 नोव्हेंबरअखेर हा उपक्रम प्रत्येक प्रभागातून राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पक्षप्रतोद विजय पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे, मुख्याधिकारी नीलेश देशमुख आणि काही नगरसेवकांनी हातात खोरे घेऊन गेल्या २५ वर्षांपासून साचलेली घाण उपसण्यास सुरुवात केली आहे. हे नेते केवळ छायाचित्र काढेपर्यंत नाला साफ करण्याचा फार्स करीत आहेत, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून आहे.सर्वसामान्यांच्या मते केवळ एक दिवसाचा उपक्रम राबवून शहरातील स्वच्छता होणार नाही. यासाठी दररोज पालिकेने स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शहरात साठलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. यातूनच डेंग्यूसारख्या साथीने थैमान घातले आहे. काही प्रभागातील गटारी वर्षानुवर्षे तुंबल्या आहेत. स्वच्छता ठेकेदाराचे कर्मचारी सफाईसाठी फिरकतही नाहीत. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या गटारी तुंबून त्यातील पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. सत्ताधारी भुयारी गटारींची भाषा करत आहेत. त्या अंमलात कधी येणार? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यात राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मोदींच्या या अभियानाचा पुळका राष्ट्रवादीला आल्याचे दिसते, अशीही भावना काही नागरिकांनी व्यक्त केली.शहर स्वच्छतेस शुक्रवारपासून प्रारंभ..!पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्याहस्ते १४ नोव्हेंबरला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. हा उपक्रम २0 नोव्हेंबरअखेर सुरु राहणार असून शहरातील सर्व प्रभागात ही मोहीम राबविली जाणार आहे. उद्घाटनावेळी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, नगरसेवक चंद्रकांत पाटील, बी. ए. पाटील, सौ. अरुणादेवी पाटील, छाया देसाई, सुभाष देसाई, शहाजी पाटील, विजय कोळेकर, रणजित मंत्री, संदेश शहा, सदानंद पाटील, रवी सूर्यवंशी, अभिजित कुर्लेकर, जालिंदर कोळी उपस्थित होते.स्वच्छता अभियान हे काही तासांसाठी करुन चालणार नाही. शहरामध्ये प्रचंड कचरा साठलेला आहे. तो कचरा युध्दपातळीवर हटवला पाहिजे. नियमितपणे शहराची स्वच्छता केली पाहिजे. शहरातील गटारी तुंबलेल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावरुन वाहते. भुयारी गटार योजनेचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे.- बाबासाहेब सूर्यवंशी, माजी नगरसेवक