शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

संचमान्यतेमुळे रात्रशाळांतील शिक्षक बेरोजगार

By admin | Updated: May 30, 2016 03:51 IST

रात्रशाळांसाठी २८ आॅगस्ट २०१५च्या निकषानुसारच संचमान्यता होत असल्याने अनेक शिक्षकांवर नोकरी गमावण्याची वेळ आली

मुंबई : मुंबईसह राज्यातील रात्रशाळांसाठी २८ आॅगस्ट २०१५च्या निकषानुसारच संचमान्यता होत असल्याने अनेक शिक्षकांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासन निर्णयातील उल्लेखाप्रमाणे रात्रशाळांसाठी वेगळे निकष लावण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.शासन निर्णयामध्ये उल्लेख असतानाही रात्रशाळांत जुन्या निकषांनुसार संचमान्यता होत असल्याची माहिती शिक्षक परिषदेने दिली आहे. शिक्षक आमदार रामनाथ मोते म्हणाले की, जुन्या संचमान्यतेच्या निकषांमुळे अनेक रात्रशाळांतील शिक्षकांना नोकरी गमवावी लागत आहे. तरी रात्रशाळांची संचमान्यता करताना शासनाने जाहीर केलेले वेगळे निकष लावण्याची गरज मोते यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.मुंबईसह राज्यात १७६ रात्रशाळा आहेत. त्यांत शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. मात्र या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्धवेळ समजले जाते. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ शिक्षकाच्या वेतनश्रेणीच्या निम्मी वेतनश्रेणी दिली जाते. बहुतेक रात्रशाळांतील अनेक शिक्षक हे फक्त संबंधित रात्रशाळेतच काम करीत आहेत. परिणामी, संचमान्यतेच्या जाचक निकषांमुळे अशा अनेक अर्धवेळ शिक्षकांना नोकरी गमावून घरी बसावे लागेल, असा आरोप शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)>विद्यार्थ्यांचेही नुकसान२० नोव्हेंबर २०१३च्या शासन निर्णयात रात्रशाळांच्या संचमान्यतेबाबत वेगळे निकष लवकरच जाहीर केले जातील, असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र दोन वर्षे उलटली तरी याबाबत वेगळे निकष जाहीर झालेले नाहीत. उलट शिक्षणाधिकारी २८ आॅगस्ट २०१५च्या नियमित शाळांच्या निकषानुसार रात्रशाळांची संचमान्यता करीत आहेत. त्यामुळे अनेक शिक्षकांना नोकरी गमवावी लागेलच, मात्र शाळा बंद झाल्यास विद्यार्थीही शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याची भीती शिक्षक परिषदेने व्यक्त केली आहे. म्हणूनच शिक्षण विभागाने रात्रशाळांचे निकष जाहीर होत नाही, तोपर्यंत रात्रशाळांची संचमान्यता करू नये, अशी मागणीही शिक्षक परिषदेने केली आहे.