शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘नीट’चे परीक्षा केंद्र प्रत्येक जिल्हा मुख्यालयी असावे

By admin | Updated: January 8, 2017 20:59 IST

राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेचे केंद्र प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी असावे

ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 8 : राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेचे (नीट) केंद्र प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी असावे, अशा मागणीचे निवेदन राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. जिल्हा मुख्यालयी परीक्षा केंद्र दिल्यानंतर विद्यार्थ्यांना सहज व सुलभतेने परीक्षा केंद्रावर पोहचता येईल, असेही खा. चव्हाण यांनी केंद्रीय मानव विकास व संशोधन मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. नीट परीक्षेचे आॅनलाईन अर्ज जानेवारी महिन्यात भरले जाणार आहेत. तत्पूर्वी नवीन परीक्षा केंद्रांची निर्मिती करुन राज्यातील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.

राज्यभरातील लाखो विद्यार्थी दरवर्षी एमबीबीएस, बीडीएस व तत्सम वैद्यकीय शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश पात्रता परीक्षेला बसतात. ही परीक्षा यापूर्वी राज्यपातळीवर होत होती. या परीक्षेचे केंद्र जिल्ह्याचे मुख्यालय होते. त्या ठिकाणच्या विविध शाळा, महाविद्यालयात परीक्षा घेतल्या जात होत्या. परंतु या वर्षी पहिल्यांदाच एचएच.सीईटी ऐवजी नीट म्हणजेच राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद व कोल्हापूर हे सहा परीक्षा केंद्र निश्चित केले आहेत.

परिणामी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी निश्चित स्थळी पोहचण्यास वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करुन सुमारे तीन ते चारशे किलोमीटरचे अंतर पार पाडावे लागणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या वेळेचा अपव्यय होवून मानसिक व शारीरिक त्रास होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या सहा केंद्रा व्यतिरिक्त प्रत्येक जिल्हा मुख्यालयी किंवा शक्य नसेल तर दोन किंवा तीन जिल्हा मुख्यालय एकत्र करुन परीक्षा केंद्र देण्यात यावे, अशी मागणीही खा. चव्हाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)