शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

‘नीट’चे परीक्षा केंद्र प्रत्येक जिल्हा मुख्यालयी असावे

By admin | Updated: January 8, 2017 20:59 IST

राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेचे केंद्र प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी असावे

ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 8 : राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेचे (नीट) केंद्र प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी असावे, अशा मागणीचे निवेदन राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. जिल्हा मुख्यालयी परीक्षा केंद्र दिल्यानंतर विद्यार्थ्यांना सहज व सुलभतेने परीक्षा केंद्रावर पोहचता येईल, असेही खा. चव्हाण यांनी केंद्रीय मानव विकास व संशोधन मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. नीट परीक्षेचे आॅनलाईन अर्ज जानेवारी महिन्यात भरले जाणार आहेत. तत्पूर्वी नवीन परीक्षा केंद्रांची निर्मिती करुन राज्यातील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.

राज्यभरातील लाखो विद्यार्थी दरवर्षी एमबीबीएस, बीडीएस व तत्सम वैद्यकीय शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश पात्रता परीक्षेला बसतात. ही परीक्षा यापूर्वी राज्यपातळीवर होत होती. या परीक्षेचे केंद्र जिल्ह्याचे मुख्यालय होते. त्या ठिकाणच्या विविध शाळा, महाविद्यालयात परीक्षा घेतल्या जात होत्या. परंतु या वर्षी पहिल्यांदाच एचएच.सीईटी ऐवजी नीट म्हणजेच राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद व कोल्हापूर हे सहा परीक्षा केंद्र निश्चित केले आहेत.

परिणामी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी निश्चित स्थळी पोहचण्यास वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करुन सुमारे तीन ते चारशे किलोमीटरचे अंतर पार पाडावे लागणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या वेळेचा अपव्यय होवून मानसिक व शारीरिक त्रास होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या सहा केंद्रा व्यतिरिक्त प्रत्येक जिल्हा मुख्यालयी किंवा शक्य नसेल तर दोन किंवा तीन जिल्हा मुख्यालय एकत्र करुन परीक्षा केंद्र देण्यात यावे, अशी मागणीही खा. चव्हाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)