शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

ऐन पावसाळ्यात नीरा नदी कोरडी

By admin | Updated: August 3, 2016 01:00 IST

आता सुकाळ यणार, या आशेवर असणाऱ्या नीरा नदीकाठच्या गावांना मात्र ऐन पावसाळ्यात दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे

वालचंदनगर : दुष्काळाची भयाण दाहकता दाखवणारे उन्हाळ्याचे दिवस सरले, पावसाळा सुरू झाला. आता सुकाळ यणार, या आशेवर असणाऱ्या नीरा नदीकाठच्या गावांना मात्र ऐन पावसाळ्यात दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे. अवैध वाळू व्यावसायिकांच्या लचकेतोडीमुळे आपले अस्तित्व जपत असलेल्या नीरा नदीचे दु:खाश्रू मात्र संपता संपेनात.सर्वत्र मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. इंदापूर तालुक्यात मात्र ढगाळ वातावरण असतानाही पावसाचे थेंबही टिपकत नसल्याने चार वर्षांपासून तालुका दुष्काळाच्या खाईत आहे. येथील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली नीरा नदी कोरडी ठणठणीत आहे, तर नदीवरील सात कोल्हापूरी बंधारे श्वास रोखल्याने हजारो शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. नीरा नदीला पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल; मात्र वाळू तस्करांनी नीरा नदीची चाळण केल्याने नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुणे, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या नीरा नदीचे पात्रात आॅगस्ट महिना सुरू झालेला असला तरी थेंब पाणी नसल्याने कोरडे ठणठणीत आहे. या नीरा नदीवर तीन जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांच्या जमिनीचे भवितव्य अवलंबून आहे. तालुक्यातील ओढेनाले चार वर्षांपासून कोरडे असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीने फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठला होता. (वार्ताहर)>गावाला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या सार्वजनिक विहिरी कोरड्या पडल्याने पाणीपुरवठा सहा महिन्यांपासून थांबला आहे. दोन राजकारणी माणसांच्या हट्टाने शेटफळ हवेली येथील तळ्यात पाणी सोडले जात आहे.जनावरांचा व शेतीचा विचार करून पाठबंधारे विभागाने नीरा नदीच्या पात्रात पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.