शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ऐन पावसाळ्यात नीरा नदी कोरडी

By admin | Updated: August 3, 2016 01:00 IST

आता सुकाळ यणार, या आशेवर असणाऱ्या नीरा नदीकाठच्या गावांना मात्र ऐन पावसाळ्यात दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे

वालचंदनगर : दुष्काळाची भयाण दाहकता दाखवणारे उन्हाळ्याचे दिवस सरले, पावसाळा सुरू झाला. आता सुकाळ यणार, या आशेवर असणाऱ्या नीरा नदीकाठच्या गावांना मात्र ऐन पावसाळ्यात दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे. अवैध वाळू व्यावसायिकांच्या लचकेतोडीमुळे आपले अस्तित्व जपत असलेल्या नीरा नदीचे दु:खाश्रू मात्र संपता संपेनात.सर्वत्र मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. इंदापूर तालुक्यात मात्र ढगाळ वातावरण असतानाही पावसाचे थेंबही टिपकत नसल्याने चार वर्षांपासून तालुका दुष्काळाच्या खाईत आहे. येथील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली नीरा नदी कोरडी ठणठणीत आहे, तर नदीवरील सात कोल्हापूरी बंधारे श्वास रोखल्याने हजारो शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. नीरा नदीला पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल; मात्र वाळू तस्करांनी नीरा नदीची चाळण केल्याने नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुणे, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या नीरा नदीचे पात्रात आॅगस्ट महिना सुरू झालेला असला तरी थेंब पाणी नसल्याने कोरडे ठणठणीत आहे. या नीरा नदीवर तीन जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांच्या जमिनीचे भवितव्य अवलंबून आहे. तालुक्यातील ओढेनाले चार वर्षांपासून कोरडे असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीने फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठला होता. (वार्ताहर)>गावाला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या सार्वजनिक विहिरी कोरड्या पडल्याने पाणीपुरवठा सहा महिन्यांपासून थांबला आहे. दोन राजकारणी माणसांच्या हट्टाने शेटफळ हवेली येथील तळ्यात पाणी सोडले जात आहे.जनावरांचा व शेतीचा विचार करून पाठबंधारे विभागाने नीरा नदीच्या पात्रात पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.