शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात नीरा नदी कोरडी

By admin | Updated: August 3, 2016 01:00 IST

आता सुकाळ यणार, या आशेवर असणाऱ्या नीरा नदीकाठच्या गावांना मात्र ऐन पावसाळ्यात दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे

वालचंदनगर : दुष्काळाची भयाण दाहकता दाखवणारे उन्हाळ्याचे दिवस सरले, पावसाळा सुरू झाला. आता सुकाळ यणार, या आशेवर असणाऱ्या नीरा नदीकाठच्या गावांना मात्र ऐन पावसाळ्यात दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे. अवैध वाळू व्यावसायिकांच्या लचकेतोडीमुळे आपले अस्तित्व जपत असलेल्या नीरा नदीचे दु:खाश्रू मात्र संपता संपेनात.सर्वत्र मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. इंदापूर तालुक्यात मात्र ढगाळ वातावरण असतानाही पावसाचे थेंबही टिपकत नसल्याने चार वर्षांपासून तालुका दुष्काळाच्या खाईत आहे. येथील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली नीरा नदी कोरडी ठणठणीत आहे, तर नदीवरील सात कोल्हापूरी बंधारे श्वास रोखल्याने हजारो शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. नीरा नदीला पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल; मात्र वाळू तस्करांनी नीरा नदीची चाळण केल्याने नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुणे, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या नीरा नदीचे पात्रात आॅगस्ट महिना सुरू झालेला असला तरी थेंब पाणी नसल्याने कोरडे ठणठणीत आहे. या नीरा नदीवर तीन जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांच्या जमिनीचे भवितव्य अवलंबून आहे. तालुक्यातील ओढेनाले चार वर्षांपासून कोरडे असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीने फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठला होता. (वार्ताहर)>गावाला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या सार्वजनिक विहिरी कोरड्या पडल्याने पाणीपुरवठा सहा महिन्यांपासून थांबला आहे. दोन राजकारणी माणसांच्या हट्टाने शेटफळ हवेली येथील तळ्यात पाणी सोडले जात आहे.जनावरांचा व शेतीचा विचार करून पाठबंधारे विभागाने नीरा नदीच्या पात्रात पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.