शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
2
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
3
आरक्षण मर्यादा ओलांडल्याने सुप्रिम कोर्ट संतप्त, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी
4
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
5
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
6
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
7
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
8
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
9
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
10
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
11
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
12
Delhi Blast: ‘बूट सुसाइड बॉम्बर’च्या तंत्रामुळे गुप्तचर-तपास यंत्रणा झाली सतर्क!
13
‘श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष’ दररोज म्हणता का? कालातीत लाभ होतात, स्वामी कायम कृपा करतात!
14
Shubman Gill Medical Update : गिल टीम इंडियासोबत गुवाहटीला जाणार का? BCCI नं माहिती दिली, पण अर्धवट
15
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
16
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
17
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
18
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
19
NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला
20
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
Daily Top 2Weekly Top 5

‘नीरा डावा’ आवर्तनाचा फज्जा

By admin | Updated: March 4, 2017 01:00 IST

नीरा डाव्या कालव्याच्या वितरिका ५७ वर असणाऱ्या दारे सातमधील शेकडो लाभधारक शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्याच्या आवर्तनाचा फज्जा उडाला

निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यांतील नीरा डाव्या कालव्याच्या वितरिका ५७ वर असणाऱ्या दारे सातमधील शेकडो लाभधारक शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्याच्या आवर्तनाचा फज्जा उडाला आहे. केवळ शाखाधिकारी व बीटधारक यांच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणीवाटपाचा फज्जा उडाला आहे. याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी इंदापूर पंचायत समितीचे सभापती विलासराव वाघमोडे, इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक बबनराव देवकर, विकास संस्थेचे अध्यक्ष शांतिलाल देवकर यांनी केली आहे.पुणे पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत इंदापूर तालुक्यांतील गावांना पाणी मिळते. वितरिका ५७ वरील सातवे दारेपर्यंत पाणी गेलेच नाही. काही वेळ शेतक ऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी शाखा अधिकारी लक्ष्मणराव सुद्रिक यांनी हे दार सुरू केले.तसेच, लगेच बंद केले. या भागातील शेतकऱ्यांनी त्रागा व्यक्त केल्याने पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याचे चक्क लेखी आश्वासन दिले. शेतकऱ्यांना सिंचन पूर्ण करण्यासाठी जबाबदारी माझी आहे, असेही लेखी शेतकऱ्यांना शाखाधिकारी यांनी दिले. मात्र, बोराटवाडी, खोरोची, रेडणी या भागात नियम मोडून पाणी शाखाधिकारी यांनी सोडले. त्यामुळे काटी, जाधववाडी, सराफवाडी, रेडा, यादववाडी परिसरातील शेकडो लाभधारक शेतकरी पाण्यासाठी पोरके राहिले.या भागात मका, ऊस, ज्वारी, गहू, हरभरा अशी पिके पाण्यावाचून अखेरच्या घटका मोजत आहेत. तरीही पाटबंधारे विभागाच्या अधिकारीवर्गाच्या लक्षात येत नाही. खासगी शेतकऱ्यांची शेततळी, विहिरी हे अधिकारी पैसे घेऊन भरतात. मात्र आमच्या हक्काचे पाणी का मिळत नाही? हे पाणी कोणाला विकले. कोणाची शेततळी भरली याचा जाब शेतकरी विचारणार आहोत. वेळप्रसंगी न्यायालयात जाऊ, मात्र पाटबंधारे विभागाच्या कामचुकारपणा करणाऱ्यांविरोधात जनआंदोलन उभारू, असा इशारा सभापती वाघमोडे, खरेदी-विक्री संघाचे संचालक देवकर व किसन इनामे, मधुकर इनामे यांनी दिला आहे. (वार्ताहर)>शेतकऱ्यांना वारंवार आवाहन करूनही ते पाणी अर्ज करीत नाहीत. आम्ही आता वरिष्ठांना विचारणा केली. तर तेही आम्हाला पाणी अर्ज आहे का असल्यास कळवा, असे म्हणत पाणी सोडण्यासाठी अपेक्षित मागणी नाही, असे सांगतात. जर आम्ही तरीही पाणी खाली सोडण्याचा प्रयत्न केल्यास कालव्याच्या वरील बाजूचे शेतकरी आक्रमक होतात. पाण्याचे फाटे फोडण्याचा इशारा देतात. रब्बीच्या सुरुवातीला पाणी अर्ज करा, असे प्रकटन आपण देत असतो. मात्र, त्याकडे शेतकरी दुर्लक्ष करतात.- लक्ष्मणराव सुद्रिक, शाखाधिकारी