शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

‘नीरा डावा’ आवर्तनाचा फज्जा

By admin | Updated: March 4, 2017 01:00 IST

नीरा डाव्या कालव्याच्या वितरिका ५७ वर असणाऱ्या दारे सातमधील शेकडो लाभधारक शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्याच्या आवर्तनाचा फज्जा उडाला

निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यांतील नीरा डाव्या कालव्याच्या वितरिका ५७ वर असणाऱ्या दारे सातमधील शेकडो लाभधारक शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्याच्या आवर्तनाचा फज्जा उडाला आहे. केवळ शाखाधिकारी व बीटधारक यांच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणीवाटपाचा फज्जा उडाला आहे. याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी इंदापूर पंचायत समितीचे सभापती विलासराव वाघमोडे, इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक बबनराव देवकर, विकास संस्थेचे अध्यक्ष शांतिलाल देवकर यांनी केली आहे.पुणे पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत इंदापूर तालुक्यांतील गावांना पाणी मिळते. वितरिका ५७ वरील सातवे दारेपर्यंत पाणी गेलेच नाही. काही वेळ शेतक ऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी शाखा अधिकारी लक्ष्मणराव सुद्रिक यांनी हे दार सुरू केले.तसेच, लगेच बंद केले. या भागातील शेतकऱ्यांनी त्रागा व्यक्त केल्याने पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याचे चक्क लेखी आश्वासन दिले. शेतकऱ्यांना सिंचन पूर्ण करण्यासाठी जबाबदारी माझी आहे, असेही लेखी शेतकऱ्यांना शाखाधिकारी यांनी दिले. मात्र, बोराटवाडी, खोरोची, रेडणी या भागात नियम मोडून पाणी शाखाधिकारी यांनी सोडले. त्यामुळे काटी, जाधववाडी, सराफवाडी, रेडा, यादववाडी परिसरातील शेकडो लाभधारक शेतकरी पाण्यासाठी पोरके राहिले.या भागात मका, ऊस, ज्वारी, गहू, हरभरा अशी पिके पाण्यावाचून अखेरच्या घटका मोजत आहेत. तरीही पाटबंधारे विभागाच्या अधिकारीवर्गाच्या लक्षात येत नाही. खासगी शेतकऱ्यांची शेततळी, विहिरी हे अधिकारी पैसे घेऊन भरतात. मात्र आमच्या हक्काचे पाणी का मिळत नाही? हे पाणी कोणाला विकले. कोणाची शेततळी भरली याचा जाब शेतकरी विचारणार आहोत. वेळप्रसंगी न्यायालयात जाऊ, मात्र पाटबंधारे विभागाच्या कामचुकारपणा करणाऱ्यांविरोधात जनआंदोलन उभारू, असा इशारा सभापती वाघमोडे, खरेदी-विक्री संघाचे संचालक देवकर व किसन इनामे, मधुकर इनामे यांनी दिला आहे. (वार्ताहर)>शेतकऱ्यांना वारंवार आवाहन करूनही ते पाणी अर्ज करीत नाहीत. आम्ही आता वरिष्ठांना विचारणा केली. तर तेही आम्हाला पाणी अर्ज आहे का असल्यास कळवा, असे म्हणत पाणी सोडण्यासाठी अपेक्षित मागणी नाही, असे सांगतात. जर आम्ही तरीही पाणी खाली सोडण्याचा प्रयत्न केल्यास कालव्याच्या वरील बाजूचे शेतकरी आक्रमक होतात. पाण्याचे फाटे फोडण्याचा इशारा देतात. रब्बीच्या सुरुवातीला पाणी अर्ज करा, असे प्रकटन आपण देत असतो. मात्र, त्याकडे शेतकरी दुर्लक्ष करतात.- लक्ष्मणराव सुद्रिक, शाखाधिकारी