शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
2
"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय
3
सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार....
4
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
5
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
6
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
7
राज ठाकरे सहकुटुंब पोहचले मातोश्रीवर; चर्चा राजकीय? निमित्त स्नेहभोजनाचे, तीन महिन्यात दोघांची सातवी भेट 
8
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...
9
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
10
अत्यंत लाजिरवाणी घटना, भारताच्या भूमीत हे घडावे...?
11
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
12
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
13
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
14
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
15
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
16
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
17
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
18
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
19
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
20
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल

जलयुक्त शिवार योजनेची गरज

By admin | Updated: May 18, 2016 01:23 IST

राज्य शासनाने पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ योजनेची गरज आहे

आळंदी : राज्यातील पाणीटंचाईची परिस्थिती विचारात घेऊन राज्य शासनाने पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ योजनेची गरज आहे. या योजनेमागचा हेतू उदात्त असला तरी आळंदीत ही योजना होत नसल्याचे दिसून येत आहे. खेड उपविभागातील प्रशासकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे आळंदी परिसरात यातील कामे न घेतल्याने हा परिसर जलयुक्त शिवारच्या कामापासून वंचित राहिला आहे. यातून येथील पाझरतळी, ओढे, नाले खोलीकरण-रुंदीकरण अभावी तसेच वापराविना पडून आहेत.राज्य शासनाने हाती घेतलेला हा स्तुत्य उपक्रम प्रभावी कामकाजापासून वंचित राहात आहे. यात आळंदी मंडल परिसरात फारशी कामे प्रस्तावितदेखील केली नसल्याने नागरिकांतून नाराजी वाढली आहे. जलयुक्त शिवाराच्या कामातून या परिसरातील भूजल पातळी उंचावण्यात मदत होणार होती. शासनाने टंचाई परिस्थिती जाहीर केलेल्या अनेक गावांतून हे अभियान प्राधान्याने राबविण्यात येत आहे. मात्र आळंदी परिसरातदेखील उर्वरित भागात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यावरही भर दिला जाण्याची गरज असताना याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.जलयुक्त शिवारला शक्ती मिळण्यासाठी या उपक्रमात अशासकीय संस्था, कंपन्या आणि लोकसहभागावर विशेष लक्ष केंद्रित केल्यास आळंदी परिसरातील गायरान जागेतदेखील शेत शिवार हिरवेगार होण्यास मदत होणार आहे. बंधारे आणि धरणांच्या पाण्यामध्ये होणारी घट, कमी होत चाललेले जलस्रोत यामुळे जिल्ह्यात येत्या काळात पाण्याचा प्रश्न गंभीर होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत. पिण्याच्या पाणीप्रश्नामुळे अनेक आंदोलनेही झाली आहेत. मात्र, या समस्येवर उपाय जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ योजनांच्या कामाला गती आणि प्रभावी कार्यवाही करणे गरजेचे आहे. आळंदी परिसरातील आदिवासी भागातील नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत नसल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी नागरिकांची पायपीट करावी लागत आहे. यासाठी राज्य शासनाने जलसंधारणासाठी जलयुक्त शिवाराची कामे हाती घेतली आहेत. त्याप्रमाणे आळंदी परिसरात कामे सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे. जलयुक्त शिवारच्या कामामुळे काही ठिकाणी पाणीसाठा झाल्याने पाणीटंचाईवर मात करण्यास मदत झाली आहे. पावसाळ्यात या ठिकाणी अधिकचा पाणीसाठा होणार आहे. यामुळे येत्या उन्हाळ्यात याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त होताना दिसत आहे. काही ठिकाणी नियोजनाअभावी कामे रखडली आहेत.(वार्ताहर)आळंदी मंडळ परिसरातील प्रस्ताव प्राप्त नाही, मंडळ विभागातून प्रस्ताव आल्यास तत्काळ कामकाज सुरु करण्यात येईल. येत्या महिना भरात यावर योग्य आढावा घेण्याात येईल. -हिम्मतराव खराडे, प्रांत अधिकारीखेडमधील आळंदी मंडल कार्यक्षेत्रात ११च्यावर गावे आणि अनेक ठिकाणी पाझर तलाव, ओढे-नाले, नदी किनाऱ्यालगत खोलीकरण जलयुक्त शिवार अभियानात घेण्यात आली नाहीत. अनेक ठिकाणी शेत शिवार रस्ते, पाणंद रस्ते, शिव रस्तेदेखील प्रभावी कामकाजापासून वंचित असल्याने आळंदी परिसरात वाहतुकीची कोंडीने नागरिक-भाविक त्रस्त आहेत. प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास आणि कामात प्रशासनाने लोकसहभाग घेतल्यास आळंदी परिसर विकासापासून वंचित राहणार नाही अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.