शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

‘कामगारांच्या अस्तित्वासाठी एकजुटीच्या लढ्याची गरज’

By admin | Updated: August 1, 2016 02:24 IST

देशातील कामगार चळवळीने संघर्ष करून जे कामगार हक्काचे कायदे करून घेतले, ते कामगार कायदे सुधारणेच्या नावाखाली बदलण्यात येत आहेत.

 

मुंबई : देशातील कामगार चळवळीने संघर्ष करून जे कामगार हक्काचे कायदे करून घेतले, ते कामगार कायदे सुधारणेच्या नावाखाली बदलण्यात येत आहेत. गेल्या ७० वर्षांत जे काही मिळविले ते आता भांडवलदारधार्जिणे सरकार काढून घेत आहे. त्यामुळे कामगारांच्या अस्तित्वासाठी एकजुटीने लढण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड. एस.के. शेट्ये यांनी व्यक्त केले.मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अ‍ॅण्ड जनरल एम्प्लॉईज युनियन, ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड डॉक वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट इंजिनीअर्स गिल्ड, फ्लोटिला वर्कर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गोदीत आंबेडकर भवन येथे निदर्शने केली. त्या वेळी शेट्ये बोलत होते. शेट्ये म्हणाले की, ३१ डिसेंबर रोजी बंदर व गोदी कामगारांच्या वेतन कराराची मुदत संपत असून, १ जानेवारी २०१७पासून नवीन वेतन करार लागू होणार आहे. त्यासाठी बंदरातील मान्यताप्राप्त पाच महासंघांनी १० जून २०१६ रोजी सर्व बंदरांतील चेअरमन, इंडियन पोर्ट असोसिएशन व केंद्रीय वाहतूक, नौकानयन मंत्रालयाला संयुक्तपणे मागणीपत्र दिले आहे. केंद्र सरकारने पगारवाढीच्या वाटाघाटीसाठी ताबडतोब द्विपक्षीय वेतन सुधार समिती नेमावी, समझोता करारानुसार गणेशचतुर्थीपूर्वी कामगारांना बोनस द्यावा, कंत्राट पद्धत बंद करावी, मुंबई बंदराच्या जागेच्या विकासातून पोर्ट ट्रस्टला उत्पन्न मिळावे अशा मागण्या केल्या आहेत. (प्रतिनिधी)