शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

शिवरायांचा इतिहास समजून घेण्याची आवश्यकता

By admin | Updated: February 1, 2017 02:47 IST

हल्ली विद्यार्थी, युवक विघातक हिंसक वृत्तीकडे वळत आहेत. त्यांना विधायक वृत्तीकडे वळविण्यासाठी आपल्या संस्कृतीची खरी ओळख झाली पाहिजे. छत्रपती शिवरायांचा

वैभववाडी : हल्ली विद्यार्थी, युवक विघातक हिंसक वृत्तीकडे वळत आहेत. त्यांना विधायक वृत्तीकडे वळविण्यासाठी आपल्या संस्कृतीची खरी ओळख झाली पाहिजे. छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यांच्या कार्याची व्याप्ती खूप मोठी आहे. ती सर्वांनी समजून घेतली पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन उद्घाटक खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केले. कोकण इतिहास परिषदेचे सातव्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ. चंद्रकांत काकडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून, प्रास्ताविकात सिंधुदुर्ग जिल्ह्याची सविस्तर माहिती सांगून, अधिवेशनाचा उद्देश कथन केला. यंदाचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार राज्याच्या दप्तरखान्याचे संचालक अशोक खराटे यांना संभाजीराजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. खराटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, मी तीस वर्षे पुराभिलेख संशोधनासाठी वेचली. तो काळ मला कुटुंबीयांसाठी देता आला नाही. तरीही माझे उर्वरित आयुष्यही संशोधनासाठी लागावे, असा आशावाद व्यक्त केला. (वार्ताहर)समतेच्या लढ्याचा इतिहास शिकवाराजा दीक्षित यांनी विचार मांडताना, आपण भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास वर्षानुवर्षे शिकवत आहोत. त्याचबरोबर, समतेच्या लढ्याचा इतिहास शिकविला पाहिजे. इतिहास हा आपल्या अस्तित्वाची ओळख आहे. त्याचे चिंतन करणे गरजेचे आहे. ज्यांना विद्यापीठापर्यंत पोहोचता येत नाही, त्यांच्याजवळ विद्यापीठाने पोहोचले पाहिजे. आपण संशोधनाच्या जगात आहोत. बदलत्या वेगाबरोबर आपण पुढील वाटचाल केली पाहिजे. आपल्याकडे ऐतिहासिक साक्षरता कमी आहे. गावकुसाबाहेरच्या वस्तीची मानसिकता बदलली पाहिजे. जातिभेद न मानणारा इतिहास असला पाहिजे, असे स्पष्ट केले.