शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

शिवरायांचा इतिहास समजून घेण्याची आवश्यकता

By admin | Updated: February 1, 2017 02:47 IST

हल्ली विद्यार्थी, युवक विघातक हिंसक वृत्तीकडे वळत आहेत. त्यांना विधायक वृत्तीकडे वळविण्यासाठी आपल्या संस्कृतीची खरी ओळख झाली पाहिजे. छत्रपती शिवरायांचा

वैभववाडी : हल्ली विद्यार्थी, युवक विघातक हिंसक वृत्तीकडे वळत आहेत. त्यांना विधायक वृत्तीकडे वळविण्यासाठी आपल्या संस्कृतीची खरी ओळख झाली पाहिजे. छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यांच्या कार्याची व्याप्ती खूप मोठी आहे. ती सर्वांनी समजून घेतली पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन उद्घाटक खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केले. कोकण इतिहास परिषदेचे सातव्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ. चंद्रकांत काकडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून, प्रास्ताविकात सिंधुदुर्ग जिल्ह्याची सविस्तर माहिती सांगून, अधिवेशनाचा उद्देश कथन केला. यंदाचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार राज्याच्या दप्तरखान्याचे संचालक अशोक खराटे यांना संभाजीराजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. खराटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, मी तीस वर्षे पुराभिलेख संशोधनासाठी वेचली. तो काळ मला कुटुंबीयांसाठी देता आला नाही. तरीही माझे उर्वरित आयुष्यही संशोधनासाठी लागावे, असा आशावाद व्यक्त केला. (वार्ताहर)समतेच्या लढ्याचा इतिहास शिकवाराजा दीक्षित यांनी विचार मांडताना, आपण भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास वर्षानुवर्षे शिकवत आहोत. त्याचबरोबर, समतेच्या लढ्याचा इतिहास शिकविला पाहिजे. इतिहास हा आपल्या अस्तित्वाची ओळख आहे. त्याचे चिंतन करणे गरजेचे आहे. ज्यांना विद्यापीठापर्यंत पोहोचता येत नाही, त्यांच्याजवळ विद्यापीठाने पोहोचले पाहिजे. आपण संशोधनाच्या जगात आहोत. बदलत्या वेगाबरोबर आपण पुढील वाटचाल केली पाहिजे. आपल्याकडे ऐतिहासिक साक्षरता कमी आहे. गावकुसाबाहेरच्या वस्तीची मानसिकता बदलली पाहिजे. जातिभेद न मानणारा इतिहास असला पाहिजे, असे स्पष्ट केले.