शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

शाश्वत सिंचन देण्याची गरज

By admin | Updated: January 18, 2016 03:45 IST

कोकणातील जलसमस्या सोडवायची असेल तर सर्वांचाच पुढाकार आवश्यक आहे. नदी-नाल्यांचे पुनरुज्जीवन करून शाश्वत सिंचन देण्याची आज खरी आवश्यकता आहे.

खेड (जि.रत्नागिरी) : कोकणातील जलसमस्या सोडवायची असेल तर सर्वांचाच पुढाकार आवश्यक आहे. नदी-नाल्यांचे पुनरुज्जीवन करून शाश्वत सिंचन देण्याची आज खरी आवश्यकता आहे. त्यासाठी नियोजन हवे, आवश्यकता पडल्यास लागेल तेवढा निधी देऊ आणि कोकणाबरोबरच अवघा महाराष्ट्र येत्या पाच वर्षांमध्ये दुष्काळमुक्त करू, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेड येथे व्यक्त केला.खेड तालुक्यातील महाळुंगे गावातील जगबुडी नदी येथे फडणवीस यांच्या हस्ते जलचेतना परिषद व जलोपासना अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांच्यासह राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, संपर्कमंत्री प्रकाश मेहता, भटक्या विमुक्त जमातीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते व अन्य मान्यवर उपस्थित होते.डॉ. राजेंद्रसिंह यांनी कोकणाला लक्ष्मी अशी उपमा दिली. कोकण हे सुख आणि समृद्धीचे माहेर असल्याचे सांगत ते म्हणाले, नियोजनाअभावी कोकण मागासला आहे. कोकणात मोठी धरणे नको, पण लहान बंधारे बांधून हे पाणी अडविण्यावर भर दिला पाहिजे. पाणी अडविण्याची योजना ही कोकणातच तयार होऊ शकते. पाणी अडविण्याचे कोकण हेच मॉडेल अवघ्या जगात दिशादर्शक ठरू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम, पालकमंत्री रवींद्र वायकर, तसेच केंद्रीय मंत्री अनंत गीते हे अनुपस्थित राहिले. (प्रतिनिधी) नदीचे पुनरुज्जीवन आणि जलसमृद्धी यासाठी डॉ. राजेंद्रसिंह यांनी मांडलेले तीन मुद्देनैसर्गिक साधनसामग्रीचे नियोजन आणि पाणी जोरात वाहण्याच्या प्रक्रियेला आळा घालण्यासाठी काही मापदंड लावणे.कोकणाला महाराष्ट्राचा विशेष दर्जा द्यावा आणि कोकणातील पाणी, जमीन आणि तरुण यांना कोकणातच थांबविण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही करणे.नदीकिनारी नवे हॉटेल, उद्योग तसेच पर्यटन केंद्रे उभारण्यास मनाई करणे.