शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

शाश्वत सिंचन देण्याची गरज

By admin | Updated: January 18, 2016 03:45 IST

कोकणातील जलसमस्या सोडवायची असेल तर सर्वांचाच पुढाकार आवश्यक आहे. नदी-नाल्यांचे पुनरुज्जीवन करून शाश्वत सिंचन देण्याची आज खरी आवश्यकता आहे.

खेड (जि.रत्नागिरी) : कोकणातील जलसमस्या सोडवायची असेल तर सर्वांचाच पुढाकार आवश्यक आहे. नदी-नाल्यांचे पुनरुज्जीवन करून शाश्वत सिंचन देण्याची आज खरी आवश्यकता आहे. त्यासाठी नियोजन हवे, आवश्यकता पडल्यास लागेल तेवढा निधी देऊ आणि कोकणाबरोबरच अवघा महाराष्ट्र येत्या पाच वर्षांमध्ये दुष्काळमुक्त करू, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेड येथे व्यक्त केला.खेड तालुक्यातील महाळुंगे गावातील जगबुडी नदी येथे फडणवीस यांच्या हस्ते जलचेतना परिषद व जलोपासना अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांच्यासह राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, संपर्कमंत्री प्रकाश मेहता, भटक्या विमुक्त जमातीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते व अन्य मान्यवर उपस्थित होते.डॉ. राजेंद्रसिंह यांनी कोकणाला लक्ष्मी अशी उपमा दिली. कोकण हे सुख आणि समृद्धीचे माहेर असल्याचे सांगत ते म्हणाले, नियोजनाअभावी कोकण मागासला आहे. कोकणात मोठी धरणे नको, पण लहान बंधारे बांधून हे पाणी अडविण्यावर भर दिला पाहिजे. पाणी अडविण्याची योजना ही कोकणातच तयार होऊ शकते. पाणी अडविण्याचे कोकण हेच मॉडेल अवघ्या जगात दिशादर्शक ठरू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम, पालकमंत्री रवींद्र वायकर, तसेच केंद्रीय मंत्री अनंत गीते हे अनुपस्थित राहिले. (प्रतिनिधी) नदीचे पुनरुज्जीवन आणि जलसमृद्धी यासाठी डॉ. राजेंद्रसिंह यांनी मांडलेले तीन मुद्देनैसर्गिक साधनसामग्रीचे नियोजन आणि पाणी जोरात वाहण्याच्या प्रक्रियेला आळा घालण्यासाठी काही मापदंड लावणे.कोकणाला महाराष्ट्राचा विशेष दर्जा द्यावा आणि कोकणातील पाणी, जमीन आणि तरुण यांना कोकणातच थांबविण्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही करणे.नदीकिनारी नवे हॉटेल, उद्योग तसेच पर्यटन केंद्रे उभारण्यास मनाई करणे.