शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

सहकार चळवळ बळकट करण्याची गरज

By admin | Updated: January 16, 2017 06:01 IST

देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचे योगदान मोठे असून, सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी संस्कारक्षम नेतृत्वाबरोबरच कुशल मन्युष्यबळाची आवश्यकता आहे

पुणे : देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचे योगदान मोठे असून, सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी संस्कारक्षम नेतृत्वाबरोबरच कुशल मन्युष्यबळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी रविवारी येथे केले.दिवंगत वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ को-आॅपरेटिव्ह मॅनेजमेंट संस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते म्हणाले, शेती हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा असून, शेती व्यवसाय सहकार चळवळीवर अवलंबून आहे. त्यामुळे सहकार चळवळ अधिकाधिक सक्षम करण्याची गरज आहे. गेल्या ७० वर्षांत गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत झाले आहेत. मात्र, गरिबांना श्रीमंतांच्या बरोबरीने घेऊन जाण्यासाठी केंद्र शासनातर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.कृषी क्षेत्रात सुधारणेसाठी पारंपरिक पद्धतीऐवजी ठिबक व तुषार सिंचनावर भर देण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. जगातील कोणताच देश पूर्णपणे कॅशलेस होऊ शकत नाही. देशात पूर्णपणे कॅशलेस व्यवहार होणार नाहीत, परंतु कमीत कमी रोकडवर आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सहकार क्षेत्रानेही त्यात मोठे योगदान देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ व राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष चंद्रपाल सिंह यादव म्हणाले, ‘तरुणांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून देशाच्या विकासाला हातभार लावण्याची गरज आहे.’ (प्रतिनिधी)