शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

३७६ प्रकल्पांसाठी ८५ हजार कोटींची गरज!

By admin | Updated: May 15, 2016 05:35 IST

राज्यात सिंचनावर ७० हजार कोटी रुपये खर्च झाल्याचा गवगवा झाला असला तरी प्रत्यक्षात हा आकडा ४५ हजार कोटींच्या वर गेलेला नाही.

अतुल कुलकर्णी, मुंबई राज्यात सिंचनावर ७० हजार कोटी रुपये खर्च झाल्याचा गवगवा झाला असला तरी प्रत्यक्षात हा आकडा ४५ हजार कोटींच्या वर गेलेला नाही. तरीही अजून ३७६ प्रकल्प शिल्लकच आहेत आणि त्यासाठी आणखी ८५ हजार कोटींची गरज आहे. ‘राज्यपालांचे निर्देश’ या नावाखाली समन्यायी वाटप करण्याची भूमिका घेत अनेक वर्षे बागेत पाणी शिंपडल्यासारखा निधी देत गेल्याने ही अवस्था आहे. हीच वृत्ती यापुढेही राहिल्यास आणखी २५ वर्षे यातील एकही प्रकल्प पूर्ण होणार नाही, हे वास्तव आजच्या जलसंपदा दिनानिमित्ताने समोर आले आहे.गावात एकच केशकर्तनालय असेल, तर तो एकाची अर्धी दाढी करतो, एकाची अर्धी मिशी काढतो, असे करत करत अर्ध्या गावाची दाढी कटिंग होईपर्यंत त्या पहिल्याची दाढी वाढलेली असते... याच पद्धतीने अनेक वर्षे जलसंपदा विभागाचे काम चालू आहे. मिळणाऱ्या ७ हजार कोटींतून जे प्रकल्प नव्याने सुरू झाले, त्यांनाही १० रुपये आणि जे प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आहेत त्यांनाही १० रुपयेच असे सांगायचे. परिणामी, एकही प्रकल्प पूर्ण नाही. यासाठी कठोर इच्छाशक्तीची गरज आहे. या वर्षी देवेंद्र फडणवीस सरकारने इच्छाशक्ती दाखवली व २६ प्रकल्प पूर्ण झाले. याचे श्रेय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही जाते. त्यांनी जलसंपदा विभागाला २०१५-१६साठीचा संपूर्ण निधी देऊन टाकला. गेल्या ५० वर्षांत असे कधीही घडले नव्हते. मात्र हीच भूमिका पुढच्या काळात कायम राहणार की नाही हे स्पष्ट नाही. जलसंपदा विभागाला भ्रष्टाचाराने पोखरले, असे सांगून मध्यंतरी एआयबीपीच्या योजनांमधून मिळणाऱ्या निधीत केंद्राने आखडता हात घेतला आणि आता मोदी सरकारने १० टक्के मदत देऊ केली आहे.मोठ्या, मध्यम अशा ३७६ प्रकल्पांसाठी लागणारे ८४,४२९.४२ कोटी रुपये एका वर्षात उभे होणार नाहीत. जलसंपदा विभागाला दरवर्षी ७ हजार कोटी रुपये मिळतात. या न्यायाने ३७६ प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किमान १२ वर्षे लागतील, दरवर्षी प्रकल्पांच्या किमती महागाईमुळे १० टक्क्यांनी वाढतात. अशा स्थितीत एकही प्रकल्प कधीच पूर्ण होणार नाही. पुढच्या १० वर्षांनीही अशाच बातम्या लिहिल्या जातील. ही राजकीय उदासीनता असून, गेल्या दोन वर्षांत (२०१४ ते २०१६) राज्याने ३४२० कोटींची मागणी केल्यावर केंद्राने ३४० कोटी म्हणजे १० टक्के रक्कम दिली आहे. याउलट २००५ ते २०१४मध्ये आघाडी सरकारने केंद्राकडे १७२८५ कोटींची मागणी केली; आणि केंद्राने १०२१६ कोटी म्हणजे मागणीच्या ६० टक्के रक्कम दिली होती. मध्यंतरी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ही आकडेवारी पाहून चक्रावून गेले. एवढे कमी पैसे मिळणार असतील, तर राज्यातील धरणे पूर्ण कशी होतील, असा सवाल त्यांनी उमा भारतींनाच केला.