मुंबई : देशामध्ये न्यायव्यवस्थेत ब:याच सुधारणा करण्याची आवश्यकता असून, त्या कामात भारतीय जनता पक्षाचा लीगल सेल मदत करू शकतो, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले. भाजपाच्या प्रदेश लीगल सेलतर्फे आयोजित राज्यस्तरीय बैठकीचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी लीगल सेलचे राष्ट्रीय संयोजक राघवेंद्रसिंह व प्रदेश संयोजक आशिषसिंग उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण नऊ टक्के इतके कमी आहे. पकडलेल्या शंभर आरोपींपैकी 91 जण सुटत असतील तर गुन्हेगारांना कायद्याचे भय राहणार नाही. 199क् साली दाखल फौजदारी खटल्यात अजूनही आरोप निश्चित होत नाहीत. दिवाणी खटल्यांचा निकाल लागायला तीन पिढय़ा जातात. अशा स्थितीत न्यायालयीन व्यवस्थेत बदलाची गरज आहे. सरकारी वकिलांच्या कामगिरीतही सुधारणोला वाव आहे, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
न्यायव्यवस्थेत सुधारणांची गरज - फडणवीस
By admin | Updated: June 29, 2014 00:40 IST