शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळासाठी तिजोरी उघडण्याची गरज

By admin | Updated: September 2, 2015 23:40 IST

जयंत पाटील : कानडवाडीमध्ये विकासकामांचा प्रारंभ, महामंडळाकडून पाणी देण्याचा प्रयत्न

कुपवाड : राज्यावर सध्या दुष्काळाचे भयंकर सावट आहे. राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी सरकारने तिजोरी उघडी करणे गरजेचे आहे. मात्र, सरकार मोजूनमापून आवश्यक असेल तेथेच निधी खर्च करीत आहे. दुष्काळग्रस्तांसाठीच्या उपाययोजनाही हे शासन करताना दिसून येत नाही. त्यांना मदत करण्याची इच्छा शासनाकडे दिसून येत नसून, दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबले जात आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी केले. कानडवाडी (ता. मिरज) येथील विविध विकास कामांच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, कानडवाडीचे नेते अनिल शेगुणसे प्रमुख उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले की, सध्या केंद्र शासनाची मानसिकता ही काळजीची बाब निर्माण झाली आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळावा, असे सरकारला वाटत नाही. दर पडल्याशिवाय महागाई कमी होत नाही, अशी धारणा या सरकारची आहे. कांद्याचा दर कमी होता, त्यावेळी शेतकऱ्यांनी मागणी करूनही विरोधी धोरण अवलंबले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याकडे पाठ फिरविली. कांद्याच्या किमती वाढल्यावर केंद्र शासनाने परदेशातून कांदा आयात केला. त्यामुळे कांद्याच्या किमती पडल्या. साखरेबाबतीतही केंद्र शासनाची हीच भूमिका आहे. त्यामुळे सरकार हे देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा परदेशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत आहे. यावेळी लिंबाजी पाटील, मनोज शिंदे, राजू माळी यांची भाषणे झाली. कानडवाडी गावातील विकास कामांसाठी सहकार्य करण्याची मागणी अनिल शेगुणसे यांनी केली. भालचंद्र खोत-गुरूजी यांनी स्वागत केले. जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, नगरसेवक विष्णू माने, संजय बजाज, उद्योजक भालचंद्र पाटील, राहुल पवार, शेडजी मोहिते, नानासाहेब लवटे, प्रकाश व्हनकडे, दिलीप तांबडे, सोसायटीचे अध्यक्ष शिवगोंडा कोथळे, सरपंच रुक्साना मुजावर, उपसरपंच शीतल भोरे, अनुपकुमार खोत, सुदर्शन हेरले आदी उपस्थित होते. (वार्ताहर) कानडवाडीकरांना दिलासाकानडवाडीसह सात गावांची पाणीपुरवठा योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसे पत्रही कानडवाडी गावाला आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी कानडवाडी गावाला महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या घोषणेमुळे कानडवाडीकरांना दिलासा मिळाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. कांद्याच्या किमती वाढल्यावर केंद्र शासनाने परदेशातून कांदा आयात केला. त्यामुळे कांद्याच्या किमती पडल्या. साखरेबाबतीतही केंद्र शासनाची हीच भूमिका असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.