शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

दुष्काळासाठी तिजोरी उघडण्याची गरज

By admin | Updated: September 2, 2015 23:40 IST

जयंत पाटील : कानडवाडीमध्ये विकासकामांचा प्रारंभ, महामंडळाकडून पाणी देण्याचा प्रयत्न

कुपवाड : राज्यावर सध्या दुष्काळाचे भयंकर सावट आहे. राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी सरकारने तिजोरी उघडी करणे गरजेचे आहे. मात्र, सरकार मोजूनमापून आवश्यक असेल तेथेच निधी खर्च करीत आहे. दुष्काळग्रस्तांसाठीच्या उपाययोजनाही हे शासन करताना दिसून येत नाही. त्यांना मदत करण्याची इच्छा शासनाकडे दिसून येत नसून, दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबले जात आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी केले. कानडवाडी (ता. मिरज) येथील विविध विकास कामांच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, कानडवाडीचे नेते अनिल शेगुणसे प्रमुख उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले की, सध्या केंद्र शासनाची मानसिकता ही काळजीची बाब निर्माण झाली आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळावा, असे सरकारला वाटत नाही. दर पडल्याशिवाय महागाई कमी होत नाही, अशी धारणा या सरकारची आहे. कांद्याचा दर कमी होता, त्यावेळी शेतकऱ्यांनी मागणी करूनही विरोधी धोरण अवलंबले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याकडे पाठ फिरविली. कांद्याच्या किमती वाढल्यावर केंद्र शासनाने परदेशातून कांदा आयात केला. त्यामुळे कांद्याच्या किमती पडल्या. साखरेबाबतीतही केंद्र शासनाची हीच भूमिका आहे. त्यामुळे सरकार हे देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा परदेशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत आहे. यावेळी लिंबाजी पाटील, मनोज शिंदे, राजू माळी यांची भाषणे झाली. कानडवाडी गावातील विकास कामांसाठी सहकार्य करण्याची मागणी अनिल शेगुणसे यांनी केली. भालचंद्र खोत-गुरूजी यांनी स्वागत केले. जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, नगरसेवक विष्णू माने, संजय बजाज, उद्योजक भालचंद्र पाटील, राहुल पवार, शेडजी मोहिते, नानासाहेब लवटे, प्रकाश व्हनकडे, दिलीप तांबडे, सोसायटीचे अध्यक्ष शिवगोंडा कोथळे, सरपंच रुक्साना मुजावर, उपसरपंच शीतल भोरे, अनुपकुमार खोत, सुदर्शन हेरले आदी उपस्थित होते. (वार्ताहर) कानडवाडीकरांना दिलासाकानडवाडीसह सात गावांची पाणीपुरवठा योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसे पत्रही कानडवाडी गावाला आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी कानडवाडी गावाला महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या घोषणेमुळे कानडवाडीकरांना दिलासा मिळाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. कांद्याच्या किमती वाढल्यावर केंद्र शासनाने परदेशातून कांदा आयात केला. त्यामुळे कांद्याच्या किमती पडल्या. साखरेबाबतीतही केंद्र शासनाची हीच भूमिका असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.