शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत कांदा विक्री केंद्रांची गरज

By admin | Updated: August 23, 2015 00:37 IST

दोन वर्षांपूर्वी कांदा व भाजीचे दर गगनाला भिडल्यानंतर आघाडी सरकारने मुंबईमध्ये १००पेक्षा जास्त स्वस्त भाजीविक्री केंद्रे सुरू केली होती. त्यामुळे महागाई नियंत्रणात येण्यास मदत झाली.

- नामदेव मोरे,  नवी मुंबईदोन वर्षांपूर्वी कांदा व भाजीचे दर गगनाला भिडल्यानंतर आघाडी सरकारने मुंबईमध्ये १००पेक्षा जास्त स्वस्त भाजीविक्री केंद्रे सुरू केली होती. त्यामुळे महागाई नियंत्रणात येण्यास मदत झाली. युती शासनाने त्याच धर्तीवर कांदा व डाळी विक्री केंद्रे सुरू केली तरच ग्राहकांना दिलासा मिळेल, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. कांदा व डाळींचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. मुंबई, नवी मुंबईमध्ये कांदा ७० रुपये किलो दराने विकला जात आहे. तूरडाळ १७० रुपये दर, मूगडाळ, मसुरडाळीच्या किमतीही १२० रुपयांवर गेल्या आहेत. चनाडाळ कोणत्याही क्षणी शंभरी गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तिचे दर १००पर्यंत गेलेही आहेत. पहिल्यांदाच सर्व डाळींच्या किमतीने शंभरी ओलांडली आहे. आतापर्यंत फळे व भाजीपाला परवडत नसणाऱ्या सामान्य नागरिकांना डाळी खरेदी करणेही परवडेनासे झाले आहे. पूर्वी रेशनिंगवर तूरडाळ उपलब्ध होत होती. परंतु तीही आता मिळत नाही. सामान्य नागरिकांसमोर घर चालवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधात असताना महागाईविरोधात काँगे्रस आघाडी सरकारवर टीका करणारे शिवसेना व भाजपाचे सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र महागाई कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. दोन वर्षांपूर्वी काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रस सरकारने मुंबईत तब्बल ११० स्वस्त भाजीपाला केंद्रे सुरू केली होती. तत्कालीन पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निर्णय घेतला होता. मुंबई एपीएमसीमधील भाजीपाला महासंघ, भाजी मार्केटचे संचालक शंकर पिंगळे, उपसचिव अविनाश पाटील यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली होती. या केंद्रांमुळे बाजारभाव कमी करण्यात आले होते. किरकोळ मार्केटमध्ये ७० रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा स्वस्त भाजीपाला केंद्रांमध्ये ४० ते ५० रुपयांना उपलब्ध करून दिला होता. याच धर्तीवर आता शासनाने मुंबईसह राज्यात स्वस्त भाजी व कांदा विक्री केंद्रे सुरू करण्याची मागणी केली जात आहे. रेशनवर मिळाव्या डाळीराज्यात शहर ते गावपातळीपर्यंत सर्व ठिकाणी रेशनिंग दुकाने आहेत. महागाईपासून त्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी रेशनिंगवर स्वस्त दरात तूरडाळ, मूगडाळ, मसुरडाळ व चनाडाळ उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. दोन वर्षांपूर्वी शासनाने स्वस्त भाजीपाला विक्री केंद्रे सुरू केली होती. त्याच धर्तीवर मुंबईत कांदा व डाळी विक्री केंद्रे सुरू करण्याची गरज आहे. स्वस्त विक्री केंद्रे सुरू केल्यानंतरच महागाई नियंत्रणात येईल. - अशोक वाळुंज, माजी संचालक, एपीएमसी