शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

मुंबईत कांदा विक्री केंद्रांची गरज

By admin | Updated: August 23, 2015 00:37 IST

दोन वर्षांपूर्वी कांदा व भाजीचे दर गगनाला भिडल्यानंतर आघाडी सरकारने मुंबईमध्ये १००पेक्षा जास्त स्वस्त भाजीविक्री केंद्रे सुरू केली होती. त्यामुळे महागाई नियंत्रणात येण्यास मदत झाली.

- नामदेव मोरे,  नवी मुंबईदोन वर्षांपूर्वी कांदा व भाजीचे दर गगनाला भिडल्यानंतर आघाडी सरकारने मुंबईमध्ये १००पेक्षा जास्त स्वस्त भाजीविक्री केंद्रे सुरू केली होती. त्यामुळे महागाई नियंत्रणात येण्यास मदत झाली. युती शासनाने त्याच धर्तीवर कांदा व डाळी विक्री केंद्रे सुरू केली तरच ग्राहकांना दिलासा मिळेल, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. कांदा व डाळींचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. मुंबई, नवी मुंबईमध्ये कांदा ७० रुपये किलो दराने विकला जात आहे. तूरडाळ १७० रुपये दर, मूगडाळ, मसुरडाळीच्या किमतीही १२० रुपयांवर गेल्या आहेत. चनाडाळ कोणत्याही क्षणी शंभरी गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तिचे दर १००पर्यंत गेलेही आहेत. पहिल्यांदाच सर्व डाळींच्या किमतीने शंभरी ओलांडली आहे. आतापर्यंत फळे व भाजीपाला परवडत नसणाऱ्या सामान्य नागरिकांना डाळी खरेदी करणेही परवडेनासे झाले आहे. पूर्वी रेशनिंगवर तूरडाळ उपलब्ध होत होती. परंतु तीही आता मिळत नाही. सामान्य नागरिकांसमोर घर चालवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधात असताना महागाईविरोधात काँगे्रस आघाडी सरकारवर टीका करणारे शिवसेना व भाजपाचे सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र महागाई कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. दोन वर्षांपूर्वी काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रस सरकारने मुंबईत तब्बल ११० स्वस्त भाजीपाला केंद्रे सुरू केली होती. तत्कालीन पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निर्णय घेतला होता. मुंबई एपीएमसीमधील भाजीपाला महासंघ, भाजी मार्केटचे संचालक शंकर पिंगळे, उपसचिव अविनाश पाटील यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली होती. या केंद्रांमुळे बाजारभाव कमी करण्यात आले होते. किरकोळ मार्केटमध्ये ७० रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा स्वस्त भाजीपाला केंद्रांमध्ये ४० ते ५० रुपयांना उपलब्ध करून दिला होता. याच धर्तीवर आता शासनाने मुंबईसह राज्यात स्वस्त भाजी व कांदा विक्री केंद्रे सुरू करण्याची मागणी केली जात आहे. रेशनवर मिळाव्या डाळीराज्यात शहर ते गावपातळीपर्यंत सर्व ठिकाणी रेशनिंग दुकाने आहेत. महागाईपासून त्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी रेशनिंगवर स्वस्त दरात तूरडाळ, मूगडाळ, मसुरडाळ व चनाडाळ उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. दोन वर्षांपूर्वी शासनाने स्वस्त भाजीपाला विक्री केंद्रे सुरू केली होती. त्याच धर्तीवर मुंबईत कांदा व डाळी विक्री केंद्रे सुरू करण्याची गरज आहे. स्वस्त विक्री केंद्रे सुरू केल्यानंतरच महागाई नियंत्रणात येईल. - अशोक वाळुंज, माजी संचालक, एपीएमसी