शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

संस्कारी पिढीची देशाला गरज

By admin | Updated: October 24, 2016 00:50 IST

ज्ञानाच्या अंधकारात असणाऱ्या मुलांना ज्ञानाच्या प्रकाशात आणण्याचे काम गुरुकुल करीत आहे. अत्याधुनिक शिक्षणाप्रमाणेच मुलांवर चांगले संस्कार होणेदेखील महत्त्वाचे आहे

पिंपरी : ज्ञानाच्या अंधकारात असणाऱ्या मुलांना ज्ञानाच्या प्रकाशात आणण्याचे काम गुरुकुल करीत आहे. अत्याधुनिक शिक्षणाप्रमाणेच मुलांवर चांगले संस्कार होणेदेखील महत्त्वाचे आहे. अशी संस्कारी पिढी तयार करण्याची देशाला गरज असल्याचे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले. चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला आज त्यांनी भेट दिली. या वेळी समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी गुरुकुलमची माहिती दिली. या वेळी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अनंत कोऱ्हाळे, गिरीश आफळे, अ‍ॅड. सतीश गोरडे, मुख्याध्यापिका पूनम गुजर, रवी नामदे, विलास लांडगे, नितीन बारणे, गतीराम भोईर, शकुंतला बन्सल, मधुसूदन जाधव उपस्थित होते.पाटील म्हणाल्या, ‘‘स्वातंत्र्यानंतर देशामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यात आला. त्या वेळी शिक्षणाची टक्केवारी कमी होती. ही टक्केवारी वाढवण्यासाठी शासनाने अनेक शाळा, महाविद्यालये सुरू केली. या ठिकाणी हजारो, लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे देशाचे प्रश्न सुटतील असे वाटले होते; पण आपण केवळ बेरोजगार पिढी तयार करीत आहोत. शिक्षणामुळे अत्याधुनिक पद्धतीकडे आपण गेलो. परंतु शिकून बाहेर पडणाऱ्या पिढीच्या हाताला आणि मेंदूला काम दिले गेले पाहिजे. परंतु त्यांना जेवढ्या संधी प्राप्त करून द्यायला हव्या होत्या, तेवढ्या प्राप्त करून देऊशकलो नाही. त्यांना संधी उपलब्ध करून देण्याची सध्या गरज आहे. शिक्षण तज्ज्ञांच्या मते शिक्षण भरपूर दिले जात आहे. तंत्रज्ञ निर्माण करतोय, शास्त्रज्ञ निर्माण करतोय, सर्व काही देतोय; पण मूल्यांवर आधारित शिक्षण दिले गेले पाहिजे. या वेळी गिरीश आफळे यांनी मनोगत व्यक्त केले. कल्पना बिचकुले हिने सूत्रसंचालन केले, तर सचिन राठोड यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)