शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाच्या हितासाठी मानवी पुनर्वसनाची गरज - गोव्याच्या कुलगुरूंचे भाष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2016 15:16 IST

बदलत्या व बिघडत चाललेल्या पर्यावरणाचे प्रश्न हे केवळ स्थानिक पातळीवर राहिलेले नाहीत. ते प्रश्न वैश्विक स्तरावर पोहचलेले आहेत.

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २६ - बदलत्या व बिघडत चाललेल्या पर्यावरणाचे प्रश्न हे केवळ स्थानिक पातळीवर राहिलेले नाहीत. ते प्रश्न वैश्विक स्तरावर पोहचलेले आहेत. अंतराळापर्यंत त्यांची झेप गेली आहे. केवळ तंत्रज्ञानाचाच वापर करून हे प्रश्न सोडविता येतील असे नाही तर तंत्रज्ञानापलिकडे जाऊन संस्थात्मक बदलांद्वारे तसेच सामाजिक फेररचना व मानवी वर्तनामधील सुधारणांद्वारे पर्यावरणाचे प्रश्न हाताळले जायला हवेत, असे निवेदन गोवा विद्यापीठाचे नवे कुलगुरू प्रा. वरूण साहनी यांनी शुक्रवारी केले. प्रसंगी मानवी पुनर्वसनही गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
येथील कला अकादमी संकुलात कलाकृती संस्थेतर्फे गोवा पर्यावरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी वन व पर्यावरण खात्याचे मंत्री  राजेंद्र आर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी साहनी बोलत होते. साहनी म्हणाले, की देशाच्या पश्मिच किनारपट्टीतील राज्यांमधील विद्यापीठांनी पर्यावरणाच्या विषयावर जागृती करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. गोवा विद्यापीठ स्वत: नागरी समाजाच्या सहभागाने पर्यावरण जागृतीच्या कामात योगदान देईलच. पर्यावरणाच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी केवळ तंत्रज्ञानआधारित रणनीतीवरच अवलंबून राहून चालणार नाही. तंत्रज्ञानापलिकडे जाऊन सामाजिक रचना बदलावी लागेल. प्रत्येक स्तरावरून पर्यावरणाच्या समस्यांविरुद्ध लढावे लागेल. पर्यावरणाचे प्रश्न हे मोठे आव्हान आहे. 
साहनी म्हणाले, की आताच्या नव्या पिढीला पर्यावरणविषयक प्रश्नांची जाण आहे. मात्र पर्यावरणाचे प्रश्न हे विविध पटीने वाढत असल्याने प्रत्येकालाच त्याविरुद्ध लढावे लागेल. दिल्लीचा मी रहिवासी आहे. तिथे प्रदुषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न झाले तरी देखील हवा प्रदूषण वाढतेय. औद्योगिक क्रांती ज्या पिढीने पाहिली त्या पिढीचा आम्ही आता शेवटचा टप्पा आहोत. यापुढे कदाचित प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी व पाण्याच्यी तीव्रतेसारख्या समस्या टाळण्यासाठी मानवी वस्तींचे स्थलांतर व पुनर्वसन घडवून आणणोही गरजेचे ठरेल. हा विषय मन दुखविणारा असला तरी, त्यासाठी धोरण ठरवावे लागेल.
संदीप आजरेकर यांचा गौरव
पर्यावरण रक्षण आणि वन क्षेत्रंचा सांभाळ व्हावा म्हणून न्यायालयार्पयत धाव घेऊन लढणारे कार्यकर्ते म्हणून संदीप आजरेकर यांना निसर्ग मित्र पुरस्कार देऊन यावेळी मंत्री आर्लेकर व साहनी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दहा हजार रुपये व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. केपे व बेतोडा येथील बरीच हेक्टर वन जमीन वाचविणो आजरेकर यांच्यामुळे शक्य झाले आहे, असे आयोजकांनी सांगितले.
मंत्री आर्लेकर यांनीही यावेळी विचार मांडले. निसर्गाच्याविरुद्ध असलेली जीवनशैली बाजूला ठेवून निसर्गाशी मैत्री करणारीच जीवनशैली प्रत्येकाने अंगिकारावी, असे आवाहन आर्लेकर यांनी केले. यावेळी अॅड. सतिश सोनक, प्रेरणा पावस्कर व पर्यावरणविषयक मासिकाच्या संपादक रिटा मोदी जोशी व्यासपीठावर होत्या. सोनक यांनीही विचार मांडले. पणजी, म्हापसा, मिरामार अशा ठिकाणच्या रोटरी क्लबांचा यावेळी गौरव करण्यात आला.
(खास प्रतिनिधी)