शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पर्यावरणाच्या हितासाठी मानवी पुनर्वसनाची गरज - गोव्याच्या कुलगुरूंचे भाष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2016 15:16 IST

बदलत्या व बिघडत चाललेल्या पर्यावरणाचे प्रश्न हे केवळ स्थानिक पातळीवर राहिलेले नाहीत. ते प्रश्न वैश्विक स्तरावर पोहचलेले आहेत.

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २६ - बदलत्या व बिघडत चाललेल्या पर्यावरणाचे प्रश्न हे केवळ स्थानिक पातळीवर राहिलेले नाहीत. ते प्रश्न वैश्विक स्तरावर पोहचलेले आहेत. अंतराळापर्यंत त्यांची झेप गेली आहे. केवळ तंत्रज्ञानाचाच वापर करून हे प्रश्न सोडविता येतील असे नाही तर तंत्रज्ञानापलिकडे जाऊन संस्थात्मक बदलांद्वारे तसेच सामाजिक फेररचना व मानवी वर्तनामधील सुधारणांद्वारे पर्यावरणाचे प्रश्न हाताळले जायला हवेत, असे निवेदन गोवा विद्यापीठाचे नवे कुलगुरू प्रा. वरूण साहनी यांनी शुक्रवारी केले. प्रसंगी मानवी पुनर्वसनही गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
येथील कला अकादमी संकुलात कलाकृती संस्थेतर्फे गोवा पर्यावरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी वन व पर्यावरण खात्याचे मंत्री  राजेंद्र आर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी साहनी बोलत होते. साहनी म्हणाले, की देशाच्या पश्मिच किनारपट्टीतील राज्यांमधील विद्यापीठांनी पर्यावरणाच्या विषयावर जागृती करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. गोवा विद्यापीठ स्वत: नागरी समाजाच्या सहभागाने पर्यावरण जागृतीच्या कामात योगदान देईलच. पर्यावरणाच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी केवळ तंत्रज्ञानआधारित रणनीतीवरच अवलंबून राहून चालणार नाही. तंत्रज्ञानापलिकडे जाऊन सामाजिक रचना बदलावी लागेल. प्रत्येक स्तरावरून पर्यावरणाच्या समस्यांविरुद्ध लढावे लागेल. पर्यावरणाचे प्रश्न हे मोठे आव्हान आहे. 
साहनी म्हणाले, की आताच्या नव्या पिढीला पर्यावरणविषयक प्रश्नांची जाण आहे. मात्र पर्यावरणाचे प्रश्न हे विविध पटीने वाढत असल्याने प्रत्येकालाच त्याविरुद्ध लढावे लागेल. दिल्लीचा मी रहिवासी आहे. तिथे प्रदुषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न झाले तरी देखील हवा प्रदूषण वाढतेय. औद्योगिक क्रांती ज्या पिढीने पाहिली त्या पिढीचा आम्ही आता शेवटचा टप्पा आहोत. यापुढे कदाचित प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी व पाण्याच्यी तीव्रतेसारख्या समस्या टाळण्यासाठी मानवी वस्तींचे स्थलांतर व पुनर्वसन घडवून आणणोही गरजेचे ठरेल. हा विषय मन दुखविणारा असला तरी, त्यासाठी धोरण ठरवावे लागेल.
संदीप आजरेकर यांचा गौरव
पर्यावरण रक्षण आणि वन क्षेत्रंचा सांभाळ व्हावा म्हणून न्यायालयार्पयत धाव घेऊन लढणारे कार्यकर्ते म्हणून संदीप आजरेकर यांना निसर्ग मित्र पुरस्कार देऊन यावेळी मंत्री आर्लेकर व साहनी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दहा हजार रुपये व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. केपे व बेतोडा येथील बरीच हेक्टर वन जमीन वाचविणो आजरेकर यांच्यामुळे शक्य झाले आहे, असे आयोजकांनी सांगितले.
मंत्री आर्लेकर यांनीही यावेळी विचार मांडले. निसर्गाच्याविरुद्ध असलेली जीवनशैली बाजूला ठेवून निसर्गाशी मैत्री करणारीच जीवनशैली प्रत्येकाने अंगिकारावी, असे आवाहन आर्लेकर यांनी केले. यावेळी अॅड. सतिश सोनक, प्रेरणा पावस्कर व पर्यावरणविषयक मासिकाच्या संपादक रिटा मोदी जोशी व्यासपीठावर होत्या. सोनक यांनीही विचार मांडले. पणजी, म्हापसा, मिरामार अशा ठिकाणच्या रोटरी क्लबांचा यावेळी गौरव करण्यात आला.
(खास प्रतिनिधी)