शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

पर्यावरणाच्या हितासाठी मानवी पुनर्वसनाची गरज - गोव्याच्या कुलगुरूंचे भाष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2016 15:16 IST

बदलत्या व बिघडत चाललेल्या पर्यावरणाचे प्रश्न हे केवळ स्थानिक पातळीवर राहिलेले नाहीत. ते प्रश्न वैश्विक स्तरावर पोहचलेले आहेत.

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २६ - बदलत्या व बिघडत चाललेल्या पर्यावरणाचे प्रश्न हे केवळ स्थानिक पातळीवर राहिलेले नाहीत. ते प्रश्न वैश्विक स्तरावर पोहचलेले आहेत. अंतराळापर्यंत त्यांची झेप गेली आहे. केवळ तंत्रज्ञानाचाच वापर करून हे प्रश्न सोडविता येतील असे नाही तर तंत्रज्ञानापलिकडे जाऊन संस्थात्मक बदलांद्वारे तसेच सामाजिक फेररचना व मानवी वर्तनामधील सुधारणांद्वारे पर्यावरणाचे प्रश्न हाताळले जायला हवेत, असे निवेदन गोवा विद्यापीठाचे नवे कुलगुरू प्रा. वरूण साहनी यांनी शुक्रवारी केले. प्रसंगी मानवी पुनर्वसनही गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
येथील कला अकादमी संकुलात कलाकृती संस्थेतर्फे गोवा पर्यावरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी वन व पर्यावरण खात्याचे मंत्री  राजेंद्र आर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी साहनी बोलत होते. साहनी म्हणाले, की देशाच्या पश्मिच किनारपट्टीतील राज्यांमधील विद्यापीठांनी पर्यावरणाच्या विषयावर जागृती करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. गोवा विद्यापीठ स्वत: नागरी समाजाच्या सहभागाने पर्यावरण जागृतीच्या कामात योगदान देईलच. पर्यावरणाच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी केवळ तंत्रज्ञानआधारित रणनीतीवरच अवलंबून राहून चालणार नाही. तंत्रज्ञानापलिकडे जाऊन सामाजिक रचना बदलावी लागेल. प्रत्येक स्तरावरून पर्यावरणाच्या समस्यांविरुद्ध लढावे लागेल. पर्यावरणाचे प्रश्न हे मोठे आव्हान आहे. 
साहनी म्हणाले, की आताच्या नव्या पिढीला पर्यावरणविषयक प्रश्नांची जाण आहे. मात्र पर्यावरणाचे प्रश्न हे विविध पटीने वाढत असल्याने प्रत्येकालाच त्याविरुद्ध लढावे लागेल. दिल्लीचा मी रहिवासी आहे. तिथे प्रदुषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न झाले तरी देखील हवा प्रदूषण वाढतेय. औद्योगिक क्रांती ज्या पिढीने पाहिली त्या पिढीचा आम्ही आता शेवटचा टप्पा आहोत. यापुढे कदाचित प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी व पाण्याच्यी तीव्रतेसारख्या समस्या टाळण्यासाठी मानवी वस्तींचे स्थलांतर व पुनर्वसन घडवून आणणोही गरजेचे ठरेल. हा विषय मन दुखविणारा असला तरी, त्यासाठी धोरण ठरवावे लागेल.
संदीप आजरेकर यांचा गौरव
पर्यावरण रक्षण आणि वन क्षेत्रंचा सांभाळ व्हावा म्हणून न्यायालयार्पयत धाव घेऊन लढणारे कार्यकर्ते म्हणून संदीप आजरेकर यांना निसर्ग मित्र पुरस्कार देऊन यावेळी मंत्री आर्लेकर व साहनी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दहा हजार रुपये व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. केपे व बेतोडा येथील बरीच हेक्टर वन जमीन वाचविणो आजरेकर यांच्यामुळे शक्य झाले आहे, असे आयोजकांनी सांगितले.
मंत्री आर्लेकर यांनीही यावेळी विचार मांडले. निसर्गाच्याविरुद्ध असलेली जीवनशैली बाजूला ठेवून निसर्गाशी मैत्री करणारीच जीवनशैली प्रत्येकाने अंगिकारावी, असे आवाहन आर्लेकर यांनी केले. यावेळी अॅड. सतिश सोनक, प्रेरणा पावस्कर व पर्यावरणविषयक मासिकाच्या संपादक रिटा मोदी जोशी व्यासपीठावर होत्या. सोनक यांनीही विचार मांडले. पणजी, म्हापसा, मिरामार अशा ठिकाणच्या रोटरी क्लबांचा यावेळी गौरव करण्यात आला.
(खास प्रतिनिधी)