शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

दलित चळवळींना योग्य दिशा देण्याची गरज

By admin | Updated: January 5, 2015 04:34 IST

शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी दलित चळवळी योग्य दिशेने घेऊन जाण्याची गरज आहे़ दलिताची व्याख्या एका जातीपुरती मर्यादित नाही़

भारत दाढेल, नांदेडशोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी दलित चळवळी योग्य दिशेने घेऊन जाण्याची गरज आहे़ दलिताची व्याख्या एका जातीपुरती मर्यादित नाही़ सर्व घटकांना सोबत घेऊन जावे लागेल, त्यातच मानवतेची कल्पना आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत डॉ़ माधव गादेकर यांनी रविवारी केले़ ३२व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दलितांच्या सांस्कृतिक व राजकीय चळवळी दिशाहीन झाल्या आहेत, या विषयावर परिसंवाद झाला़ अध्यक्षस्थानी डॉ़ कृष्णा किरवले होते़ डॉ़ मा़ प़ थोरात, डॉ़ के़ के़ अहिरे, प्रा़ सुधीर अनवले, डॉ़ माधव गादेकर, अमर हबीब, डॉ़ गोपाल उपाध्ये, प्रा़ रामनाथ चव्हाण यांनी सहभाग घेतला़डॉ़ गादेकर म्हणाले, की डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आदर्श दिले आहेत, ते चळवळीत दिसत नाहीत़ १९६० नंतरच्या दलित चळवळी मानवतेचा संदेश देण्यासाठी रूढ झाल्या होत्या़ मात्र आता या चळवळीचे रूप हिडीस दिसत आहे़ ज्या चळवळीतून प्रबोधन होणे गरजेचे होते, ते होताना दिसून येत नाही़ डॉ़ बाबासाहेबांनी जी चळवळ उभी केली होती, ती आता दिसत नाही़ जयंतीच्या माध्यमातून पूर्वी व्याख्यानाचे, शाहिरीचे कार्यक्रम होत असत़ आता ते ऐकण्याची मानसिकता राहिली नाही़ ते समजून सांगितले पाहिजे़ डॉ़ रामनाथ चव्हाण म्हणाले, दलित म्हणजे बौद्ध का? दलित शब्दाच्या व्याख्येत आणखी कोण कोण आहेत? बौद्धेतर जे दलित आहेत ते हिंदू म्हणून जगत आहेत़ त्यांच्या चळवळीविषयी आपण का बोलत नाही़ त्यांची चळवळ कुठे आहे, या प्रश्नांचा शोध घेतला पाहिजे़ डॉ़ के़ के़ अहिरे यांनी दलित संस्कृती खऱ्या अर्थाने बौद्ध संस्कृती असल्याचे सांगितले़ डॉ़ मा़ प़ थोरात म्हणाले, जोपर्यंत आपण ब्राह्मणी संस्कृती सोडणार नाही तोपर्यंत आपण मानवतावादी संस्कृती रुजवू शकणार नाही़ अध्यक्षीय समारोपात कृष्णा किरवले म्हणाले, मानवी जीवनाला आकार देणारी सर्वमान्य झालेली विचारसरणी म्हणजे संस्कृती़ तेव्हा आपले चांगले काय आहे, हे सांगण्यासाठी वेळ खर्च करावा़ ब्राह्मणांवर टीका, टिंगलटवाळी करण्याऐवजी आपल्या चांगल्या गोष्टींचा प्रसार करावा़, असेही त्यांनी आवर्जून सांगितले़ (प्रतिनिधी)