शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सृजनवाटा मोकळ्या करणारी बांधिलकी हवी - निशिकांत ठकार

By admin | Updated: August 27, 2016 15:59 IST

बांधिलकीच ठेवायची असेल तर ती सृजनाच्या वाटा मोकळ्या करणारी असणे आवश्यक आहे असं मत प्रा. निशिकांत ठकार यांनी व्यक्त केलं आहे

- ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 27 - चांगल्या लेखकाची विचारसरणी विचारसरणीशी नसली पाहिजे. ती सृजनाशी असायला हवी. बांधिलकीच ठेवायची असेल तर ती सृजनाच्या वाटा मोकळ्या करणारी असणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत प्रसिध्द प्रसिध्द अनुवादक, समीक्षक प्रा. निशिकांत ठकार यांनी आज येथे व्यक्त केले. 
डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित एक दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रा. ठकार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर सुशीला आबुटे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार, संमलनाचे प्रमुख दत्ता गायकवाड, प्रतिष्ठानचे सदस्य प्रा. विलास बेत, बाबुराव मैंदर्गीकर, कवी अविनाश बनसोडे मंचावर होते. 
प्रा. ठकार म्हणाले, साहित्य आणि जीवनातही आपण नेहमीच नव्याचे शोध घेत असतो. मराठी साहित्यात नवीन काय आहे, याचा शोध घेताना जुने सर्वच टाकाऊ नसते, याचे भान ठेवले पाहिजे. जुन्यातूनच नव्या वाटा मिळू शकतात. साहित्यामध्ये नेहमीच बांधिलकीची चर्चा होते. हल्ली ती सर्वांनाच मान्य असल्यामुळे तिची फारसा विचार होत नाही; पण बांधिलकीमुळे साहित्याच्या वाटा चाकोरीच्या होतात. चांगल्या लेखकाची बांधिलकी विचारसरणीशी असली पाहिजे; तरच नवीन वाटा सापडतील. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी नवीन वाटा बंद करून चालणार नाही, तसे झाल्यास मोठे नुकसान होईल. सध्या सर्वच व्यवस्थेत आपत्ती निवारण्याचे काम सुरू आहे. सांस्कृतिक जीवनातही आपत्ती येतात; पण साहित्य हा मानवी संस्कृतीतील संकटकालीन मार्ग आहे, असेही ते म्हणाले. 
अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर आबुटे म्हणाल्या, साहित्यामुळे नेहमीच जीवनाला ऊर्जा मिळते. त्यामुळेच सर्वांनी साहित्याशी मैत्री केली पाहिजे. सोलापूर स्मार्ट होऊ पाहात आहे. स्मार्ट सिटीमध्ये हे स्मार्ट संमेलन आयोजित केले आहे. प्रारंभी प्रा. बेत यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ममता बोल्ली यांनी सूत्रसंचालन केले. मैंदर्गीकर यांनी आभार मानले. 
 
भाषा आणि ज्ञानभाषा 
भाषा अभिजात झाली तरच ती ज्ञानभाषा होईल काय? असा प्रश्न उपस्थित करून प्रा. निशिकांत ठकार म्हणाले, भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतील. भाषांमध्ये निर्माण होणारे साहित्य ज्ञानभाषेसाठी जमीन तयार करण्याचे काम करते, असेही ते म्हणाले.