शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

सृजनवाटा मोकळ्या करणारी बांधिलकी हवी - निशिकांत ठकार

By admin | Updated: August 27, 2016 15:59 IST

बांधिलकीच ठेवायची असेल तर ती सृजनाच्या वाटा मोकळ्या करणारी असणे आवश्यक आहे असं मत प्रा. निशिकांत ठकार यांनी व्यक्त केलं आहे

- ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 27 - चांगल्या लेखकाची विचारसरणी विचारसरणीशी नसली पाहिजे. ती सृजनाशी असायला हवी. बांधिलकीच ठेवायची असेल तर ती सृजनाच्या वाटा मोकळ्या करणारी असणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत प्रसिध्द प्रसिध्द अनुवादक, समीक्षक प्रा. निशिकांत ठकार यांनी आज येथे व्यक्त केले. 
डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित एक दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रा. ठकार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर सुशीला आबुटे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार, संमलनाचे प्रमुख दत्ता गायकवाड, प्रतिष्ठानचे सदस्य प्रा. विलास बेत, बाबुराव मैंदर्गीकर, कवी अविनाश बनसोडे मंचावर होते. 
प्रा. ठकार म्हणाले, साहित्य आणि जीवनातही आपण नेहमीच नव्याचे शोध घेत असतो. मराठी साहित्यात नवीन काय आहे, याचा शोध घेताना जुने सर्वच टाकाऊ नसते, याचे भान ठेवले पाहिजे. जुन्यातूनच नव्या वाटा मिळू शकतात. साहित्यामध्ये नेहमीच बांधिलकीची चर्चा होते. हल्ली ती सर्वांनाच मान्य असल्यामुळे तिची फारसा विचार होत नाही; पण बांधिलकीमुळे साहित्याच्या वाटा चाकोरीच्या होतात. चांगल्या लेखकाची बांधिलकी विचारसरणीशी असली पाहिजे; तरच नवीन वाटा सापडतील. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी नवीन वाटा बंद करून चालणार नाही, तसे झाल्यास मोठे नुकसान होईल. सध्या सर्वच व्यवस्थेत आपत्ती निवारण्याचे काम सुरू आहे. सांस्कृतिक जीवनातही आपत्ती येतात; पण साहित्य हा मानवी संस्कृतीतील संकटकालीन मार्ग आहे, असेही ते म्हणाले. 
अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर आबुटे म्हणाल्या, साहित्यामुळे नेहमीच जीवनाला ऊर्जा मिळते. त्यामुळेच सर्वांनी साहित्याशी मैत्री केली पाहिजे. सोलापूर स्मार्ट होऊ पाहात आहे. स्मार्ट सिटीमध्ये हे स्मार्ट संमेलन आयोजित केले आहे. प्रारंभी प्रा. बेत यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ममता बोल्ली यांनी सूत्रसंचालन केले. मैंदर्गीकर यांनी आभार मानले. 
 
भाषा आणि ज्ञानभाषा 
भाषा अभिजात झाली तरच ती ज्ञानभाषा होईल काय? असा प्रश्न उपस्थित करून प्रा. निशिकांत ठकार म्हणाले, भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतील. भाषांमध्ये निर्माण होणारे साहित्य ज्ञानभाषेसाठी जमीन तयार करण्याचे काम करते, असेही ते म्हणाले.