शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रयत्नांची गरज : व्यंकय्या नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 03:21 IST

संपूर्ण जगात दरवर्षी कुष्ठरोगाची अडीच लाख नवी प्रकरणे समोर येतात. त्यातील ६० टक्के भारतातील असतात. भारताने कुष्ठरोगाच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष पुरवायला हवे.

वर्धा/सेवाग्राम : संपूर्ण जगात दरवर्षी कुष्ठरोगाची अडीच लाख नवी प्रकरणे समोर येतात. त्यातील ६० टक्के भारतातील असतात. भारताने कुष्ठरोगाच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष पुरवायला हवे. समाजात जागरुकता निर्माण करावी लागेल. कुष्ठरोगाच्या समूळ निर्मूलनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांवर भर द्यावा, असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे व्यक्त केले.महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालय येथे डॉ. एम.डी. गुप्ते व डॉ. अतुल शहा यांना कुष्ठरोग निर्मूलन कार्यातील उल्लेखनीय सेवेबद्दल गांधी मेमोरिअल लेप्रसी फाउंडेशनचा आंतरराष्ट्रीय गांधी कुष्ठरोग सेवा पुरस्कार २०१७ नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उपराष्ट्रपती म्हणाले की, मानवसेवा हीच माधवसेवा अर्थात ईश्वरसेवा असल्याची गांधीजींची शिकवण होती. गांधीजींचे विचार आजही सुसंगत ठरतात. खादी स्वावंलबन व साधेपणाचे प्रतीक आहे, असे स्वदेशीबाबत शिकवण देताना गांधीजींनी सांगितले होते. त्यामुळे खादी उत्पादन मनरेगाशी जोडण्याची संकल्पना उपयुक्त ठरू शकते.१९५० मध्ये स्थापन गांधी मेमोरियल लेप्रसी फाउंडेशनने या रोगाच्या निर्मूलनासाठी चांगली कामगिरी करीत हा एक कलंक असल्याची समाजातील कल्पना दूर केली. या फाउंडेशनने कुष्ठरोग्यांवर उपचार केले. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही केले. २०१२-१३ या काळात कुष्ठरोग्यांची संख्या ८३ हजार होती व त्यांचे प्रमाण १० हजार लोकसंख्येत ०.६८ टक्के होते. २०१२ पर्यंत देशातील ६४० जिल्ह्यांपैकी ५४२ जिल्ह्यांतून या रोगाचा समूळ नायनाट करण्यात यश आले असले तरी नवी प्रकरणे पुढे येत आहे, याबाबत नायडू यांनी चिंता व्यक्त केली. उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. रामदास तडस, खा.डॉ. विकास महात्मे, संस्थेचे अध्यक्ष धिरू मेहता, जे. के. बांठिया, डॉ. बी.एस. गर्ग, पी.एल. तापडिया आदींची प्रमुख उपस्थिती होती.सेवाग्राम आश्रमाला भेट : नायडू यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधीजींच्या आश्रमाला भेट दिली. प्रथम त्यांनी आदी निवासाला भेट दिली. त्यानंतर बापू कुटी व आश्रमातील सर्व परिसराची पाहणी केली. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी सुतमाळ व पुस्तक देऊन उपराष्ट्रपतींचे स्वागत केले. बापू कुटीमध्ये सर्वधर्म प्रार्थना, एकादश व्रत व भजन झाले. त्यानंतर बापू कुटीसमोर वºहांड्यातील चरखाची माहिती त्यांनी जाणून घेतली. येथे काम करणा-या महिलांशी त्यांनी संवाद साधला. महादेव कुटीतील कापूस ते कापड हा आश्रमचा उपक्रम त्यांनी समजावून घेत पाहणी केली.मनरेगाद्वारे खादीला प्रोत्साहन देण्याची मागणीआश्रमचे मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी चरखा आणि विणाईला मनरेगात समाविष्ट केले तर ग्रामीण भागात रोजगाराची संधी निर्माण होईल आणि खादीला प्रोत्साहन मिळेल. यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी करीत निवेदन दिले. यावर उपराष्ट्रपतींनी सकारात्मक प्रतिसाद देत पंतप्रधानांना शिफारस केली जाईल, अशी ग्वाही दिली.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू