शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

चर्चा हवी की कर्जमाफी, सभागृहात काँग्रेस गोंधळली

By admin | Updated: December 9, 2015 01:24 IST

विधानसभेवर आज प्रचंड मोर्चा नेऊन कर्जमाफीसाठी एल्गार करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे याच मुद्यावर विधानसभेतील फ्लोअर मॅनेजमेंट आज चुकले.

नागपूर : विधानसभेवर आज प्रचंड मोर्चा नेऊन कर्जमाफीसाठी एल्गार करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे याच मुद्यावर विधानसभेतील फ्लोअर मॅनेजमेंट आज चुकले. आधी कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चेची मागणी करणाऱ्या काँग्रेसने ती मान्य होताच ‘चर्चा नको, कर्जमाफीची घोषणा करा’असे नारे देत गदारोळ केला. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी, ‘राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून बाकीचे कामकाज बाजूला ठेवून त्यावर आधी चर्चा करा, अशी मागणी केली. कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही, असे ते म्हणाले. त्या पाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणा द्यायला सुरुवात केली. अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कोणी दाद देत नव्हते. या गदारोळात महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी, सर्व कामकाज बाजूला ठेवून दुष्काळावर चर्चेची सरकारची तयारी आहे, आता चर्चा सुरू करा, असे सांगितले. माजी वित्तमंत्री राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनीही चर्चेचा आग्रह धरला. शिवसेना सरकारला सहकार्य करेल की नाही असे शंकायुक्त वातावरण सध्या असताना शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. आज काँग्रेसचा मोर्चा असल्याने त्यांना दुष्काळाचे राजकारण करायचे आहे. दुष्काळाची एवढीच चिंता असेल तर आधी चर्चेत सहभागी व्हा, असे आव्हान त्यांनी दिले. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कांद्याचे निर्यातमूल्य कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत प्रयत्न करावा. तसे झाले तर कांद्याच्या भावातील सध्याची घसरण थांबेल, अशी मागणी केली. दुष्काळावरील चर्चेची मागणी सरकारने मान्य करूनही काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी, फलक फडकविणे, कागदाचे तुकडे हवेत भिरकवणे सुरूच ठेवले. त्यामुळे काँग्रेसला नेमके काय म्हणायचे आहे या बाबत गोंधळ निर्माण झाला. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी, चर्चेपेक्षा कर्जमाफीची घोषणा करा, अशी मागणी केली. गदारोळातच अध्यक्ष बागडे यांनी कामकाज दोनवेळा तहकूब केले. ते पुन्हा सुरू झाल्यानंतर, ‘चर्चा नको, घोषणा करा’, अशा घोषणा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सुरू केल्या. गोंधळातच सभागृहाचे काम रेटण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)