शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

चर्चा हवी की कर्जमाफी, सभागृहात काँग्रेस गोंधळली

By admin | Updated: December 9, 2015 01:24 IST

विधानसभेवर आज प्रचंड मोर्चा नेऊन कर्जमाफीसाठी एल्गार करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे याच मुद्यावर विधानसभेतील फ्लोअर मॅनेजमेंट आज चुकले.

नागपूर : विधानसभेवर आज प्रचंड मोर्चा नेऊन कर्जमाफीसाठी एल्गार करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे याच मुद्यावर विधानसभेतील फ्लोअर मॅनेजमेंट आज चुकले. आधी कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चेची मागणी करणाऱ्या काँग्रेसने ती मान्य होताच ‘चर्चा नको, कर्जमाफीची घोषणा करा’असे नारे देत गदारोळ केला. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी, ‘राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून बाकीचे कामकाज बाजूला ठेवून त्यावर आधी चर्चा करा, अशी मागणी केली. कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही, असे ते म्हणाले. त्या पाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणा द्यायला सुरुवात केली. अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कोणी दाद देत नव्हते. या गदारोळात महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी, सर्व कामकाज बाजूला ठेवून दुष्काळावर चर्चेची सरकारची तयारी आहे, आता चर्चा सुरू करा, असे सांगितले. माजी वित्तमंत्री राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनीही चर्चेचा आग्रह धरला. शिवसेना सरकारला सहकार्य करेल की नाही असे शंकायुक्त वातावरण सध्या असताना शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. आज काँग्रेसचा मोर्चा असल्याने त्यांना दुष्काळाचे राजकारण करायचे आहे. दुष्काळाची एवढीच चिंता असेल तर आधी चर्चेत सहभागी व्हा, असे आव्हान त्यांनी दिले. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कांद्याचे निर्यातमूल्य कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत प्रयत्न करावा. तसे झाले तर कांद्याच्या भावातील सध्याची घसरण थांबेल, अशी मागणी केली. दुष्काळावरील चर्चेची मागणी सरकारने मान्य करूनही काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी, फलक फडकविणे, कागदाचे तुकडे हवेत भिरकवणे सुरूच ठेवले. त्यामुळे काँग्रेसला नेमके काय म्हणायचे आहे या बाबत गोंधळ निर्माण झाला. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी, चर्चेपेक्षा कर्जमाफीची घोषणा करा, अशी मागणी केली. गदारोळातच अध्यक्ष बागडे यांनी कामकाज दोनवेळा तहकूब केले. ते पुन्हा सुरू झाल्यानंतर, ‘चर्चा नको, घोषणा करा’, अशा घोषणा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सुरू केल्या. गोंधळातच सभागृहाचे काम रेटण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)